Katchatheevu Island: काँग्रेसने भारताचे कच्चाथीवू बेट श्रीलंकेला देऊन टाकले!

  143

भारताची एकता, एकात्मता कमकूवत करणे ही काँग्रेसची नीती; पंतप्रधान मोदी यांचा काँग्रेसवर खोचक टोला


ट्विट करत काय म्हणाले पंतप्रधान?


नवी दिल्ली : १९७० च्या दशकात काँग्रेसकडून कच्चाथीवू (Katchatheevu) बेट श्रीलंकेला देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कच्चाथीवू हे बेट ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तयार झालेले आहे. याठिकाणी एक चर्च आहे. शिवाय, श्रीलंकेचे मच्छिमार याठिकाणी थांबत असतात. याठिकाणी गेलेल्या भारतीय मच्छिमारांना ताब्यात घेण्यात येते. १९७४ मध्ये इंदिरा गांधी यांनी हे बेट श्रीलंकेला दिल्याचं सांगण्यात येतं. यावेळी विरोधकांनी विरोध दर्शवला होता. पण, दोन्ही देशातील संबंधांच्या दृष्टीकोनातून हे बेट श्रीलंकेला देण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. परंतु आता ही घटना पुन्हा उभी राहत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: एक्सवर ट्विट करुन काँग्रेसवर टीका केली आहे.


पंतप्रधान मोदी म्हणाले की, डोळे उघडणारे आणि धक्कादायक नवी तथ्ये समोर आली आहेत. यानुसार काँग्रेसने भारताचे कच्चाथीवू बेट श्रीलंकेला देऊन टाकले आहे. यामुळे भारतीय लोकांमध्ये संताप आहे. आपण काँग्रेसवर विश्वास ठेवू शकत नाही, या गोष्टीवर लोक निश्चित झाली आहेत. भारताची एकता कमकूवत करणे, एकात्मता आणि देशाच्या हिताला प्राधान्य न देणे अशी काँग्रेसची नीती राहिली आहे. गेल्या ७५ वर्षांपासून काँग्रेस हेच करत आली आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.


भारताच्या किनाऱ्यापासून २० किलोमीटर दूर पाल्कच्या सामुद्रधुनीमध्ये १.९ स्क्वेर किलोमीटर क्षेत्रफळाचे एक बेट आहे. हे बेट स्वातंत्र्यापासून भारताचा भाग होता. पण, यावर श्रीलंकेकडून दावा करण्यात आला. शिवाय श्रीलंकेच्या हवाई दलाने या बेटावर युद्धसराव देखील केला. पाल्क सामुद्रधुनीमध्ये मच्छिमारी करणाऱ्या लोकांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे अशी माहिती तामिळनाडू भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के अन्नमलाई यांनी मिळवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटमुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.




Comments
Add Comment

Jagannath Yatra Stampede: जगन्नाथ यात्रेला गालबोट! चेंगराचेंगरीत तीन भाविकांचा मृत्यू, अनेकजण जण जखमी

पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ भीषण चेंगराचेंगरी ओडिशा: पुरी जिल्ह्यातील भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेदरम्यान

प्रवास झाला स्मार्ट ! ‘हायवे यात्रा’ अ‍ॅप सांगणार कमी टोलचा रस्ता

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती नवी दिल्ली : जर तुम्ही अनेकदा राष्ट्रीय महामार्गावर रोड ट्रिप करत असाल तर

उत्तराखंडमध्ये ढगफुटी, अनेक कामगार बेपत्ता

डेहराडून : उत्तराखंडमध्ये शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रौद्र रूप धारण केलेय. राज्याच्या

मोबाईलवरून आता मतदान

ई-मतदानाला परवानगी देणारे बिहार पहिले राज्य मतदान केंद्रांवर पोहोचू न शकणाऱ्या मतदारांसाठी ही सुविधा पाटणा :

प्रवास झाला स्मार्ट ! 'हायवे यात्रा' अ‍ॅप सांगणार कमी टोलचा रस्ता

नवी दिल्ली (प्रतिनिधी): जर तुम्ही अनेकदा राष्ट्रीय महामार्गावर रोड ट्रिप करत असाल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार