Bharat Ratna 2024: उत्साहात पार पडला भारतरत्न पुरस्कार प्रदान सोहळा

Share

चौधरी चरणसिंग, पीव्ही नरसिंह राव, एमएस स्वामीनाथन, कर्पूरी ठाकूर यांचा मरणोत्तर सन्मान

लालकृष्ण अडवाणी यांना घरी जाऊन करणार सन्मानित

नवी दिल्ली : दिल्ली येथे आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ( President Droupadi Murmu) यांच्या हस्ते दोन माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (LK Advani) यांच्यासह पाच प्रतिष्ठित व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार (Bharat Ratna 2024) प्रदान करण्यात आले.

भारतरत्न देण्यात येणाऱ्या पाच व्यक्तिमत्त्वांमध्ये माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्यासह माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग (Chaudhary Charan Singh), पीव्ही नरसिंह राव (PV Narasimha Rao), प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन (MS Swaminathan) आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर (Karpoori Thakur) यांचा समावेश आहे. अडवाणी वगळता इतर चौघांना हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला. त्यांच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपतींकडून सन्मान स्वीकारला. लालकृष्ण अडवाणी यांनाही भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार होते, मात्र आज ते राष्ट्रपती भवनात हजर राहिले नसून ३१ मार्च रोजी राष्ट्रपती त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही काळापूर्वीच पोस्ट केले होते की, आज हे सांगण्यास आनंद होत आहे की, आपले माजी पंतप्रधान दिवंगत पी.व्ही. नरसिंह राव यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांनी एक प्रतिष्ठित विद्वान आणि राजकारणी म्हणून, नरसिंह राव गरू यांनी विविध पदांवर भारताची मोठ्या प्रमाणावर सेवा केली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि अनेक वर्षे संसद आणि विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी केलेल्या कार्यासाठी ते तितकेच स्मरणात आहेत. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने भारताला आर्थिकदृष्ट्या प्रगत बनवण्यात आणि देशाची समृद्धी आणि विकास यांचा भक्कम पाया रचण्यात मोलाचा वाटा उचलला.

चौधरी चरणसिंग यांच्या सन्मानाची घोषणा करताना, “देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येत आहे हे आमच्या सरकारचे भाग्य आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले होते. असे पंतप्रधानांनी ट्विट केले होते.

पीएम मोदींनी कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न देण्याची घोषणाही केली होती. ही घोषणा करताना त्यांनी म्हटले होते की, सरकार एमएस स्वामिनाथन जी यांना भारतरत्न प्रदान करत आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे, त्यांनी आपल्या राष्ट्रासाठी कृषी आणि शेतकरी कल्याणात केलेल्या अतुलनीय योगदानाची दखल घेत भारताला आत्मनिर्भर होण्यासाठी मदत करण्यात मोलाची भूमिका बजावली. आव्हानात्मक काळात शेतीवर अवलंबून राहणे आणि भारतीय शेतीच्या आधुनिकीकरणासाठी उत्कृष्ट प्रयत्न केले,” असे पंतप्रधानांनी म्हटले.

Recent Posts

मंत्री पियुष गोयल यांनी घोषणा केली; पण खरंच अतिक्रमण झालेल्या मुंबईतील ११ तलावांचे पुनरुज्जीवन होईल?

मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…

1 hour ago

Rajeshwari Kharat Religion : फॅण्ड्री फेम ‘शालू’ने धर्म बदलून केला ‘या’ धर्माचा स्वीकार!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…

1 hour ago

धक्कादायक! हा अपघात की अनास्थेचा मृत्यू? उन्हाळी शिबिरांची जबाबदारी नक्की कोण घेणार? आणि मृत्यूचे मोल कोण मोजणार?

जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…

2 hours ago

चर्चकडून पगार न घेणारे, पाच लक्झरी कारसह १३७ कोटींच्या संपत्तीचे मालक होते पोप फ्रान्सिस

व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…

2 hours ago

Shivneri Fort : शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांचा पाचव्यांदा पर्यटकांवर हल्ला!

पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…

2 hours ago

पोप फ्रान्सिस ८८ व्या वर्षी ख्रिस्तवासी

व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…

3 hours ago