पोपटांचे बस तिकीट चक्क ४४४ रुपये! पोपटांसोबतचा बसप्रवास आजीला पडला महाग

बंगळुरु : आजकाल अनेकजणांच्या घरात त्यांच्या आवडीनुसार प्राणी, पक्षी पाळले जातात. पाळीव प्राणी किंवा पक्ष्यांचे पालकत्व स्वीकारुन कुटुंबाचा हिस्सा बनवतात. लोकांना प्राण्यांची योग्य काळजी घेणे तसेच त्यांच्यासोबत प्रवास कसा करावा? असा प्रश्न असतो. आज सोशल मीडियावर अशीच एक गमतीदार पोस्ट व्हायरल होत आहे. एक आजी आणि तिच्या नातीला त्यांच्या पोपटांना घेऊन बसमधून प्रवास करणं महागात पडलं आहे.


एक आजी आणि तिची नात बंगळुरुहून म्हैसूर प्रवासासाठी बसमध्ये चढली. कर्नाटक सरकारच्या शक्ती योजने अंतर्गत मोफत बस प्रवासासाठी पात्र असल्याने त्यांना तिकीट खरेदी करण्याची गरज नव्हती. परंतु, बस कंडक्टरने महिला आणि तिच्या नातीबरोबर पिंजऱ्यात असणाऱ्या चार पोपटांना पाहिलं तेव्हा मात्र कंडक्टरने पोपटांचे तिकीट आकारण्याचा निर्णय घेतला. कंडक्टरने प्रत्येक पोपटाचे १११ रुपये म्हणजेच चार पोपटांचे ४४४ रुपयांचे प्रवाशाला तिकीट काढावे लागले. या घटनेमुळे इतर प्रवाशांचाही गोंधळ उडाला. अशी गमतीशीर पोस्ट बसमधील एका प्रवाशाने त्याच्या कॅमेरामध्ये कैद करुन सोशल मीडियावर @TeluguScribe या अकाउंटवरून शेअर केले आहे.


कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ शहर, उपनगर आणि ग्रामीण मार्गांसह नॉन-एसी बसेसमध्ये पाळीव प्राण्यांबरोबर प्रवास करण्याची परवानगी देतात. याव्यतिरिक्त कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ (KSRTC) अधिकाऱ्यांनी असा इशाराही दिला आहे की, जे प्रवासी त्यांच्या पाळीव प्राण्यांसाठी तिकीट काढत नाहीत त्यांना प्रवासाच्या तिकीट किमतीच्या १० टक्के दंड आकारला जातो. तसेच जर कंडक्टर पाळीव प्राण्यांसाठी अर्ध (Half) तिकिटे देत नसतील, तर त्यांच्यावर फिर्याद दाखल केली जाऊ शकते आणि कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ निधीच्या गैरवापरासाठी त्यांना स्थगितदेखील केले जाऊ शकते. त्यामुळे कंडक्टरने महिलेला या चार पोपटांचे तिकीट काढण्यास सांगितले.




Comments
Add Comment

रेल्वेतून उतरल्यानंतर घरी जाण्यासाठी ई - बाईक !

रेल्वेची रस्त्यावरही सेवा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने काही प्रमुख स्थानकांवर ई-बाईक भाड्याने देण्याची सेवा

राज्यात थंडीच्या कडाक्यात वाढ

मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला यलो अलर्ट नवी दिल्ली : उत्तरेकडून शीत लहरी महाराष्ट्राकडे वेगाने येत

राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित

काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठकांना वारंवार गैरहजर नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरम येथील

‘मनरेगा’ नव्हे, आता ‘पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना’

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत ग्रामीण रोजगाराबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेताना

देशात २०२७ मध्ये डिजीटल जनगणना

११ हजार ७१८ कोटी रुपयांची तरतूद दोन टप्प्यांत होणार जनगणना एप्रिल ते डिसेंबर सात महिन्यांचा कालावधी

धीरेंद्र शास्त्री करणार भुतांवर पीएचडी ; भुतांवर उच्च शिक्षणाची दारे खुली ?

बागेश्वर धाम : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी उच्च शिक्षणाची इच्छा व्यक्त करत