Kangana Ranaut : काँग्रेसच्या नेत्यांना कंगना चोख उत्तर देईल!

कंगनाच्या राजकारणातील एन्ट्रीवर हेमामालिनी यांची प्रतिक्रिया


मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रानौतला (Kangana Ranaut) भाजपाने (BJP) हिमाचल प्रदेशच्या (Himachal Pradesh) मंडी मतदारसंघातून लोकसभेचं (Loksabha) तिकीट दिलं आहे. तेव्हापासून कंगना प्रचंड चर्चेत आली आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी कंगनाला लक्ष्य करत तिच्याविरोधी भूमिका घेतली. कंगनाही त्यावर सातत्याने पलटवार करते. दरम्यान, बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि लोकसभा खासदार हेमामालिनी (Hema Malini) यांनी कंगनाच्या राजकारणातील एन्ट्रीवर भाष्य केलं आहे. 'काँग्रेसच्या नेत्यांना कंगना चोख उत्तर देईल', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


हेमामलिनी या २०१४ पासून भाजपा पक्षातून लोकसभेत मथुरा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना कंगनाबाबत आपलं मत व्यक्त केलं. कंगना राजकारणात आल्याबद्दल त्यांनी तिचं अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


हेमामलिनी म्हणाल्या, "कंगना रानौत ही एक चांगली अभिनेत्री आहे आणि गुणी मुलगी आहे. आपल्या हक्कासाठी ती पूर्ण इंडस्ट्रीसोबत लढली. मला खात्री आहे की, ती राजकारणातही चांगली कामगिरी करेल. काँग्रेसच्या नेत्यांनी तिच्याबद्दल जे काही सांगितले ते पूर्णपणे चुकीचं आहे. कंगना त्यांना चोख पद्धतीनं उत्तर देईल", असं हेमामलिनी म्हणाल्या.




Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च