Kangana Ranaut : काँग्रेसच्या नेत्यांना कंगना चोख उत्तर देईल!

कंगनाच्या राजकारणातील एन्ट्रीवर हेमामालिनी यांची प्रतिक्रिया


मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रानौतला (Kangana Ranaut) भाजपाने (BJP) हिमाचल प्रदेशच्या (Himachal Pradesh) मंडी मतदारसंघातून लोकसभेचं (Loksabha) तिकीट दिलं आहे. तेव्हापासून कंगना प्रचंड चर्चेत आली आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी कंगनाला लक्ष्य करत तिच्याविरोधी भूमिका घेतली. कंगनाही त्यावर सातत्याने पलटवार करते. दरम्यान, बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि लोकसभा खासदार हेमामालिनी (Hema Malini) यांनी कंगनाच्या राजकारणातील एन्ट्रीवर भाष्य केलं आहे. 'काँग्रेसच्या नेत्यांना कंगना चोख उत्तर देईल', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


हेमामलिनी या २०१४ पासून भाजपा पक्षातून लोकसभेत मथुरा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना कंगनाबाबत आपलं मत व्यक्त केलं. कंगना राजकारणात आल्याबद्दल त्यांनी तिचं अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


हेमामलिनी म्हणाल्या, "कंगना रानौत ही एक चांगली अभिनेत्री आहे आणि गुणी मुलगी आहे. आपल्या हक्कासाठी ती पूर्ण इंडस्ट्रीसोबत लढली. मला खात्री आहे की, ती राजकारणातही चांगली कामगिरी करेल. काँग्रेसच्या नेत्यांनी तिच्याबद्दल जे काही सांगितले ते पूर्णपणे चुकीचं आहे. कंगना त्यांना चोख पद्धतीनं उत्तर देईल", असं हेमामलिनी म्हणाल्या.




Comments
Add Comment

जयपूर SMS हॉस्पिटलच्या ICU मध्ये भीषण आग, ६ रुग्णांचा मृत्यू

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूर येथील सवाई मानसिंह (SMS) हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरच्या न्यूरो आयसीयू (ICU)

दार्जिलिंगमध्ये भूस्खलनाने हाहाकार; २३ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उत्तर बंगालच्या दौऱ्यावर

दार्जिलिंग: पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या भीषण

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन