Sangrur Spurious Liquor Case: पंजाबमधील संगरूरमध्ये विषारी दारू प्यायल्याने २१ जणांचा मृत्यू

चंदिगढ : पंजाब (Panjab) मधील संगरूर (Sangrur) जिल्ह्यात विषारी दारू (Spurious Liquor) प्यायल्याने आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४० जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


संगरूरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) यांनी दिलेल्या माहितीनुसार, इथेनॉलयुक्त मद्य प्राशन केल्यानंतर किमान ४० लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.





यापैकी, बुधवार, २० मार्च रोजी, विषारी मद्य प्राशन केल्याने चार लोकांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी, २१ मार्च रोजी, पटियालाच्या राजिंद्र रुग्णालयात उपचारादरम्यान आणखी चार जणांचा मृत्यू झाला.


तर, शुक्रवार २२ मार्च रोजी ८ लोकांचा मृत्यू झाला. तसेच शनिवारी ५ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण मृतांची संख्या २१ झाली आहे.


पोलिसांनी याप्रकरणी आणखी दोघांना अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणी एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे.


दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीत अटक केलेल्या आरोपींनी एका घरात विषारी दारू तयार होत असल्याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घरावर छापा टाकून २०० लिटर इथेनॉल हे विषारी रसायन जप्त केले.


पोलीस उपमहानिरीक्षक हरचरणसिंग भुल्लर यांनी सांगितले की, या घटनेत आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला असून आम्ही या प्रकरणात दोन नवीन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा आणखी तपास सुरू असून दोषींवर योग्य कारवाई करण्यात येईल.

Comments
Add Comment

Google's doodle : गुगलचं विशेष ‘पाय डे’ डूडल; गणितातील प्रसिद्ध स्थिरांकाला गुगलकडून अनोखा सलाम

मुंबई : गुगलने जगभरातील गणितप्रेमींसाठी १४ मार्च २०२६ रोजी खास डूडल सादर करून ‘पाय डे’ साजरा केला. या विशेष

Operation White Hammer : आंध्र प्रदेशात ४७ कोटींचे अंमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

सिंथेटिक ड्रग्जच्या बेकायदेशीर उत्पादनाविरोधात महत्त्वपूर्ण कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)

फास्टॅग वार्षिक पास १ एप्रिलपासून महाग होणार

नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना थोडा

युद्धामुळे महागणार विमान प्रवास?

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील तणावाचे चटके आता विमान प्रवासालाही बसणार आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात

Dharmantar Bandi Kayda : सावधान! बळजबरीने किंवा आमिषाने धर्मांतर केल्यास...राज्य सरकारचा धर्मांतर बंदी कायद्याचा नवा प्रस्ताव सादर

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सक्तीच्या आणि फसव्या धर्मांतरांना लगाम घालण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.

भारताच्या जहाजांना धोका नाही

इराणकडून मैत्रीचा हात पुढे नवी दिल्ली : पश्चिम आशियात इराण-इस्रायल तणावामुळे जागतिक सागरी व्यापार धोक्यात आला