MNS - Mahayuti : मनसेचा दोन जागांचा प्रस्ताव भाजपने फेटाळला! केवळ एकच जागा देणे शक्य

राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात नेमकी काय चर्चा झाली?


नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून राज्यात मनसे (MNS) महायुतीत (Mahayuti) सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिल्लीदरबारी जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. त्यानंतर मनसेला लोकसभेकरता महायुतीत सामील केलं जाणार का, याकडे सर्वांचे डोळे लागले होते. यासंबंधी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मनसेला सादर केलेला दोन जागांचा प्रस्ताव अमित शाह यांनी फेटाळून लावला आहे. केवळ एकच जागा देणं शक्य होईल, असं भाजपकडून मनसेसाठी स्पष्ट करण्यात आलं आहे. शिवाय त्या एका जागेवर लढण्याकरता महायुतीतील एखाद्या पक्षाचं चिन्ह वापरावं लागेल, मनसेचं रेल्वे इंजिन वापरता येणार नाही, अशी अट ठेवण्यात आली आहे.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन जागा दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई मनसेला देण्यात यावी असा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला होता. राज ठाकरेंचा हा प्रस्ताव अमित शहांनी मात्र फेटाळला आहे. केवळ एक जागा देणं निश्चित, पण दुसरी जागा देणं कठीण असल्याचं अमित शाहांनी राज ठाकरेंना सांगितलं. तसेच, राज ठाकरेंनी लोकसभेनंतर कसं पुढे जायचं? या बद्दलही विचारणा केली. त्यावर, या घडीला कुठलीही कमिटमेंट देणं शक्य नाही, असंही अमित शाह राज ठाकरेंना म्हणाले आहेत.



उद्धव ठाकरेंसोबत जे झालं त्याची पुनरावृत्ती नको


विधानसभा देखील एकत्र लढवू पण तेव्हाचं जागावाटप तेव्हा ठरवू असंही अमित शाह म्हणाले. महत्त्वाचं म्हणजे, याआधी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे झालं त्याची पुनरावृत्ती व्हायला नको आणि म्हणूनच आता फक्त लोकसभा निवडणुकांसंदर्भात बोलू, विधानसभेचं विधानसभेला ठरवू अशी स्पष्ट भूमिका भाजप नेते अमित शाहांनी राज ठाकरेंसमोर मांडल्याची माहिती मिळत आहे.



नेमकं काय झालं?


राज ठाकरे दिल्लीत अमित शहांना भेटले त्यापूर्वी त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली होती. आता नेमकं कसं पुढे जायचं याबाबत फडणवीसांसोबतच्या बैठकीत जवळपास निश्चित झालं होतं. हे सर्व ठरल्यानंतरच राज ठाकरे दिल्लीला गेले. तिथे अमित शहांसोबत युतीबाबत आणि आगामी लोकसभा निवडणुकांबाबत चर्चा झाली. सुरुवातीला मनसेनं तीन जागांचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती एबीपी माझाच्या सूत्रांनी दिली आहे. मुंबईतील बैठकीतच राज ठाकरेंना तीन जागांसाठी स्पष्ट नकार देण्यात आला होता. त्यानंतर अमित शहांसोबतच्या बैठकीतही राज ठाकरेंचा हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. तर एक जागा देणं शक्य असल्याचं अमित शहांनी सांगितलं.

Comments
Add Comment

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

मुंबई: नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. व्यंकट बापुराव धुमाळे, शेळगाव

राज्यातील विमानतळांची विकासकामे कालबद्ध गतीने पूर्ण करावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- वाढवण व विरार परिसरात नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्यात येणार मुंबई : आशियातील सर्वात मोठे प्रस्तावित

RO-RO Ferry : मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी 'हाऊसफुल्ल' बुकिंग

- मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ! मुंबई : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने मुंबई ते विजयदुर्ग

Yogesh Kadam : बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध राज्यात कोम्बिंग ऑपरेशन! गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची मोठी घोषणा

मुंबईत 'टास्कफोर्स' तैनात; दाट वस्त्यांमध्ये शोधमोहीम मुंबई : राज्यातील वाढत्या बांगलादेशी घुसखोरांच्या

Modi and Persian scripts : राज्यात मोडी व फारसी लिपी प्रचार-प्रसारासाठी वार्षिक पुरस्कार - मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई : महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व प्रशासकीय वारशाचे जतन करण्यासाठी राज्य शासनाने मोडी व फारसी