Double Murder: उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये दोन मुलांची हत्या, आरोपीचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू

लखनऊ: उत्तर प्रदेशातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एका बाबा कॉलनीमध्ये एका व्यक्तीने दोन मुलांची हत्या केली. यानंतर तो फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच आरोपीचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर त्याने गोळीबार केला. यावेळी पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरादाखल गोळीबारत आरोपी ठार झाला.


या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहो. पोलीस आणि प्रशासनाने शांततेचे आवाहान केले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार त्यांना मंडी समिती चौकीजवळ बाबा कॉलनीमध्ये एका घरात घुसून व्यक्तीने ११ आणि ६ वर्षांच्या दोन छोट्या मुलांची हत्या केली. यानंतर लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. लोकांना शांतता राखण्यास सांगितले. दोन्ही मुलांचे मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले. आतापर्यंत हत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार झाला. प्रकरणाचा तपास केला जात आहे.


या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. आरोपी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी पोलिसांना पाहताच त्याने गोळीबार सुरू केला. यावेळी पोलिसांनीही त्याला प्रत्युत्तर दिले. यात तो मारला गेला. आरोपीचे वय २५ ते ३० वय यादरम्यान होते. या हल्ल्यात दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. एक मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत