धोनी समजून गेला होता की क्रिकेट त्याच्यासाठी सर्वस्व नाही, कारण...IPL आधी झहीर खान का म्हणाला असं?

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबाबत मोठे विधान केले आहे. झहीर खानने म्हटले की एमएस धोनीसाठी क्रिकेट महत्त्वाचे आहे मात्र सर्वस्व नाही, हे त्याला खूप आधीच समजले होते.


आपल्या नेतृत्वात भारताला त्याने आयसीसीच्या तीन ट्रॉफी जिंकून देणाऱ्या ४२ वर्षीय एमएस धोनी आयपीएल २०२४च्या आगामी हंगामात चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व सांभाळत आहे. धोनीने चार वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले होते.


झहीर खानने धोनीवर बनलेल्या एका एपिसोडमध्ये म्हटले, एमएस धोनीला खूप आधी समजले होते की त्यांच्यामध्ये क्रिकेटप्रती प्रेम आहे आणि हे त्याच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र क्रिकेट हे सर्वस्व नाही.


भारताला टी-२०, वनडे वर्ल्डकप जिंकवणे तसेच टेस्ट रँकिंगमध्ये नंबर वनपर्यंत पोहोचण्याशिवाय धोनीने आपल्या नेतृत्वात सीएसकेला पाचवेळा आयपीएलचा खिताब जिंकून दिला आहे. तो २००८ मध्ये पहिल्या हंगामात सीएसकेचा कर्णधार होता. झहीर याबाबत म्हणाला, जेव्हा तुम्ही खेळत असता तेव्हा खेळातून स्विच ऑफ होणे महत्त्वपूर्ण असते. क्रिकेटच सर्वस्व नसते. प्रत्येक क्रिकेटरला याचा सामना करावा लागतो.


जेव्हा तुम्ही खेळापासून वेगळे होता तेव्हा खूप पर्याय नसतात. आम्ही अनेक खेळाडूंना रिटायर झाल्यानंतर संघर्ष करताना पाहिले आहे कारण ते आपलं सर्वस्व खेळासाठी अर्पण करतात आणि जेव्हा ते खेळापासून वेगळे होतात तेव्हा त्याला समजत नाही की पुढे काय करायचे. धोनी खेळांशिवाय इतरही गोष्टी करतो. त्याला बाईकचा शौक आहे आणि त्यावर रिसर्च करत राहतो.

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण