धोनी समजून गेला होता की क्रिकेट त्याच्यासाठी सर्वस्व नाही, कारण...IPL आधी झहीर खान का म्हणाला असं?

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबाबत मोठे विधान केले आहे. झहीर खानने म्हटले की एमएस धोनीसाठी क्रिकेट महत्त्वाचे आहे मात्र सर्वस्व नाही, हे त्याला खूप आधीच समजले होते.


आपल्या नेतृत्वात भारताला त्याने आयसीसीच्या तीन ट्रॉफी जिंकून देणाऱ्या ४२ वर्षीय एमएस धोनी आयपीएल २०२४च्या आगामी हंगामात चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व सांभाळत आहे. धोनीने चार वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले होते.


झहीर खानने धोनीवर बनलेल्या एका एपिसोडमध्ये म्हटले, एमएस धोनीला खूप आधी समजले होते की त्यांच्यामध्ये क्रिकेटप्रती प्रेम आहे आणि हे त्याच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र क्रिकेट हे सर्वस्व नाही.


भारताला टी-२०, वनडे वर्ल्डकप जिंकवणे तसेच टेस्ट रँकिंगमध्ये नंबर वनपर्यंत पोहोचण्याशिवाय धोनीने आपल्या नेतृत्वात सीएसकेला पाचवेळा आयपीएलचा खिताब जिंकून दिला आहे. तो २००८ मध्ये पहिल्या हंगामात सीएसकेचा कर्णधार होता. झहीर याबाबत म्हणाला, जेव्हा तुम्ही खेळत असता तेव्हा खेळातून स्विच ऑफ होणे महत्त्वपूर्ण असते. क्रिकेटच सर्वस्व नसते. प्रत्येक क्रिकेटरला याचा सामना करावा लागतो.


जेव्हा तुम्ही खेळापासून वेगळे होता तेव्हा खूप पर्याय नसतात. आम्ही अनेक खेळाडूंना रिटायर झाल्यानंतर संघर्ष करताना पाहिले आहे कारण ते आपलं सर्वस्व खेळासाठी अर्पण करतात आणि जेव्हा ते खेळापासून वेगळे होतात तेव्हा त्याला समजत नाही की पुढे काय करायचे. धोनी खेळांशिवाय इतरही गोष्टी करतो. त्याला बाईकचा शौक आहे आणि त्यावर रिसर्च करत राहतो.

Comments
Add Comment

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना

WPL 2026 Final: बंगळूरची विजयी घोडदौड दिल्ली थांबवू शकणार का?

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची स्थगिती कायम, रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली  : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार

IND vs PAK : पाकिस्तान नेहमीप्रमाणे "यू-टर्न" घेईल; सुनील गावस्कर यांची पाकिस्तानवर टीका

मुंबई: टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.