निवडणुकीच्या निकालाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्र्यांकडून मागितला पुढील ५ वर्षांचा रोडमॅप

  75

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या(loksabha election) घोषणेच्या एका दिवसानंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) रविवारी कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. यात त्यांनी आपल्या मंत्र्यांना नव्या सरकारच्या पुढील १०० दिवसांसाठीची कार्ययोजना आणि पुढील पाच वर्षांसाठीचा रोडमॅप तयार करण्याचे आदेश दिले.


पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना सांगितले की ते आपल्या अधिकारी तसेच सचिवांकडून मंत्रालयाच्या नव्या सरकारच्या निर्मितीआधी १०० दिवस आणि पुढील ५ वर्षांचा रोडमॅप तयार करून घ्या.


पंतप्रधान मोदींनी बैठकीत सांगितले की हे सरकार पुन्हा सत्तेत येत आहे यासाठी विकासाची कामे सातत्याने करत राहायला हवी. त्यांनी सांगितले की सरकार बनल्यानंतर पहिल्या १०० दिवसांचा तसेच ५ वर्षांचा अजेंडा काय असेल याचा रोडमॅप तयार केला जावा.


बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी आपल्या मंत्र्यांना पुढील पाच वर्षांच्या रोडमॅपसोबत पुढील १०० दिवसांसाठी प्रमुख पैलू आणि डिलिव्हरेबल्सची रूपरेखा तयार करण्याचे काम सोपवले. कॅबिनेटची बैठक ही लोकसभा निवडणुकीच्या घोषणेच्या ठीक एक दिवसांनी झाली. शनिवारी निवडणूक आयोगाने ७ टप्प्यात निवडणुकीची घोषणा केली. याचे निकाल ४ जूनला घोषित केले जातील.


देशातील ५४३ जागांवर लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. यातील पहिला टप्पा १९ एप्रिलला, दुसरा टप्पा २६ एप्रिलला, तिसरा टप्पा ७ मेला, चौथा टप्पा १३ मेला, पाचवा टप्पा २० मेला, सहावा टप्पा २५ मेला, सातवा टप्पा १ जूनला होणार आहे.

Comments
Add Comment

फास्टॅग वार्षिक पासला देशभरातून प्रचंड प्रतिसाद, चार दिवसांत तब्बल इतक्या लोकांनी केला बुक

नवी दिल्ली: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) नुकत्याच सुरू केलेल्या फास्टॅग

उपराष्ट्रपती निवडणुकीत इंडिया आघाडी भाजपला देणार टक्कर? तामिळनाडूच्या खासदाराचे नाव चर्चेत

नवी दिल्ली: उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्याकरिता'इंडिया' आघाडीच्या वतीने

ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, दिली ही खास भेटवस्तू

नवी दिल्ली: भारताचे पहिले अंतराळवीर म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेले ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला

Airtel Down: एअरटेल सेवा बंद! कॉल आणि इंटरनेट सेवेवरही परिणाम

मुंबई: एअरटेल डाउन डिटेक्टरनुसार देशभरातील एअरटेल ग्राहकांना गेल्या काही तासांपासून नेटवर्क आणि इंटरनेट

राज्यपालांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, २१ ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी दाखल करणार उमेदवारी अर्ज

नवी दिल्ली: एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आज दिल्लीत पोहोचले

चीनचे परराष्ट्र मंत्री आजपासून भारत दौऱ्यावर, सीमावाद आणि द्विपक्षीय संबंधांवर होणार चर्चा

नवी दिल्ली: चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आजपासून (सोमवार, १८ ऑगस्ट) तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. या