निवडणुकीच्या निकालाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्र्यांकडून मागितला पुढील ५ वर्षांचा रोडमॅप

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या(loksabha election) घोषणेच्या एका दिवसानंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) रविवारी कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. यात त्यांनी आपल्या मंत्र्यांना नव्या सरकारच्या पुढील १०० दिवसांसाठीची कार्ययोजना आणि पुढील पाच वर्षांसाठीचा रोडमॅप तयार करण्याचे आदेश दिले.


पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना सांगितले की ते आपल्या अधिकारी तसेच सचिवांकडून मंत्रालयाच्या नव्या सरकारच्या निर्मितीआधी १०० दिवस आणि पुढील ५ वर्षांचा रोडमॅप तयार करून घ्या.


पंतप्रधान मोदींनी बैठकीत सांगितले की हे सरकार पुन्हा सत्तेत येत आहे यासाठी विकासाची कामे सातत्याने करत राहायला हवी. त्यांनी सांगितले की सरकार बनल्यानंतर पहिल्या १०० दिवसांचा तसेच ५ वर्षांचा अजेंडा काय असेल याचा रोडमॅप तयार केला जावा.


बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी आपल्या मंत्र्यांना पुढील पाच वर्षांच्या रोडमॅपसोबत पुढील १०० दिवसांसाठी प्रमुख पैलू आणि डिलिव्हरेबल्सची रूपरेखा तयार करण्याचे काम सोपवले. कॅबिनेटची बैठक ही लोकसभा निवडणुकीच्या घोषणेच्या ठीक एक दिवसांनी झाली. शनिवारी निवडणूक आयोगाने ७ टप्प्यात निवडणुकीची घोषणा केली. याचे निकाल ४ जूनला घोषित केले जातील.


देशातील ५४३ जागांवर लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. यातील पहिला टप्पा १९ एप्रिलला, दुसरा टप्पा २६ एप्रिलला, तिसरा टप्पा ७ मेला, चौथा टप्पा १३ मेला, पाचवा टप्पा २० मेला, सहावा टप्पा २५ मेला, सातवा टप्पा १ जूनला होणार आहे.

Comments
Add Comment

फेसबुक वापरल्याच्या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या!

हाजीपूर, बिहार: बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील बिदुपूर पोलीस स्टेशन हद्दीत एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश; २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून

भारताला सागरी रोजगाराचे जागतिक केंद्र बनवणार!

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला इंडिया मेरीटाईम वीकमध्ये विश्वास नवी दिल्ली : केंद्रीय

बिहारला ‘जंगलराज’ पासून वाचवा!

गृहमंत्री शहा आणि नड्डा यांचा बिहारच्या मतदारांना इशारा पाटणा: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे

२६/११ आरोपी 'राणा'चे पाकिस्तान कनेक्शन तपासा!

राष्ट्रीय तपास संस्थेकडूनअमेरिकेकडे विशिष्ट माहितीची मागणी; मोठी चौकशी सुरू नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास