निवडणुकीच्या निकालाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्र्यांकडून मागितला पुढील ५ वर्षांचा रोडमॅप

Share

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या(loksabha election) घोषणेच्या एका दिवसानंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) रविवारी कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. यात त्यांनी आपल्या मंत्र्यांना नव्या सरकारच्या पुढील १०० दिवसांसाठीची कार्ययोजना आणि पुढील पाच वर्षांसाठीचा रोडमॅप तयार करण्याचे आदेश दिले.

पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना सांगितले की ते आपल्या अधिकारी तसेच सचिवांकडून मंत्रालयाच्या नव्या सरकारच्या निर्मितीआधी १०० दिवस आणि पुढील ५ वर्षांचा रोडमॅप तयार करून घ्या.

पंतप्रधान मोदींनी बैठकीत सांगितले की हे सरकार पुन्हा सत्तेत येत आहे यासाठी विकासाची कामे सातत्याने करत राहायला हवी. त्यांनी सांगितले की सरकार बनल्यानंतर पहिल्या १०० दिवसांचा तसेच ५ वर्षांचा अजेंडा काय असेल याचा रोडमॅप तयार केला जावा.

बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी आपल्या मंत्र्यांना पुढील पाच वर्षांच्या रोडमॅपसोबत पुढील १०० दिवसांसाठी प्रमुख पैलू आणि डिलिव्हरेबल्सची रूपरेखा तयार करण्याचे काम सोपवले. कॅबिनेटची बैठक ही लोकसभा निवडणुकीच्या घोषणेच्या ठीक एक दिवसांनी झाली. शनिवारी निवडणूक आयोगाने ७ टप्प्यात निवडणुकीची घोषणा केली. याचे निकाल ४ जूनला घोषित केले जातील.

देशातील ५४३ जागांवर लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. यातील पहिला टप्पा १९ एप्रिलला, दुसरा टप्पा २६ एप्रिलला, तिसरा टप्पा ७ मेला, चौथा टप्पा १३ मेला, पाचवा टप्पा २० मेला, सहावा टप्पा २५ मेला, सातवा टप्पा १ जूनला होणार आहे.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

5 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

6 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

6 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

8 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

9 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

9 hours ago