Electoral bonds : निवडणूक रोख्यांचे नंबरही उघड करा!

  45

सर्वोच्च न्यायालयाचे स्टेट बँकेला निर्देश


नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme court) आज निवडणूक रोख्यांसंबंधी (Electoral bonds) सुनावणी सुरू आहे. यावेळी सरन्यायाधीशांनी एसबीआयला (State Bank of India) इलेक्टोरल बाँड्सचे नंबरही उघड करण्याबाबत निर्देश दिले आहेत. SBI ने आतापर्यंत बाँड्सची खरेदी कोणी केली, आणि कोणत्या पक्षाला किती रक्कम मिळाली याची माहिती दिली आहे. मात्र कोणी कोणत्या पक्षाला रक्कम दिली हे आतापर्यंत समोर आलं नव्हतं. बाँड्सचे नंबर उघड केल्यानंतर ही माहिती देखील समोर येण्याची शक्यता आहे.


स्टेट बँकेने निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे ३० जूनपर्यंतची मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. मात्र, ही मागणी फेटाळून लावत सुप्रीम कोर्टाने स्टेट बँकेला (SBI) दणका दिला. शिवाय १२ मार्चला निवडणूक रोख्यांची माहिती निवडणूक आयोगाला (Election Commission) देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने स्टेट बँकेला दिले होते.


दरम्यान, निवडणूक आयोगालाही ही माहिती आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यासाठी १५ मार्च ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. यासंबंधी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरु असून निवडणूक रोख्यांचे नंबर उघड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.