Electoral bonds : निवडणूक रोख्यांचे नंबरही उघड करा!

सर्वोच्च न्यायालयाचे स्टेट बँकेला निर्देश


नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme court) आज निवडणूक रोख्यांसंबंधी (Electoral bonds) सुनावणी सुरू आहे. यावेळी सरन्यायाधीशांनी एसबीआयला (State Bank of India) इलेक्टोरल बाँड्सचे नंबरही उघड करण्याबाबत निर्देश दिले आहेत. SBI ने आतापर्यंत बाँड्सची खरेदी कोणी केली, आणि कोणत्या पक्षाला किती रक्कम मिळाली याची माहिती दिली आहे. मात्र कोणी कोणत्या पक्षाला रक्कम दिली हे आतापर्यंत समोर आलं नव्हतं. बाँड्सचे नंबर उघड केल्यानंतर ही माहिती देखील समोर येण्याची शक्यता आहे.


स्टेट बँकेने निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे ३० जूनपर्यंतची मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. मात्र, ही मागणी फेटाळून लावत सुप्रीम कोर्टाने स्टेट बँकेला (SBI) दणका दिला. शिवाय १२ मार्चला निवडणूक रोख्यांची माहिती निवडणूक आयोगाला (Election Commission) देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने स्टेट बँकेला दिले होते.


दरम्यान, निवडणूक आयोगालाही ही माहिती आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यासाठी १५ मार्च ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. यासंबंधी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरु असून निवडणूक रोख्यांचे नंबर उघड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही