Airtelचा ग्राहकांना जोरदार झटका! महाग केले हे रिचार्ज प्लान

मुंबई: एअरटेलने ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. कंपनीने आपले दोन रिचार्ज प्लान महाग केले आहेत. हे दोन्ही प्रीपेड प्लान आहेत. एअरटेलने ११८ रूपये आणि २८९ रूपयांच्या प्रीपेड प्लानच्या किंमतीत वाढ केली आहे. हे ४जी डेटा वाऊचक प्लान आहेत. अशातच आता ११८ रूपयांच्या प्लानसाठी तुम्हाला १२९ रूपये द्यावे लागतील. तर २८९ रूपयांच्या प्रीपेड प्लानसाठी तुम्हाला ३२९ रूपये द्यावे लागतील.



का वाढवली किंमत?


एअरटेलला आपल्या अॅव्हरेज रेव्हेन्यू पर युजर्स म्हणजेच ARPUमध्ये वाढ करायची आहे. याच कारणामुळे चांगले रिटर्न मिळण्यासाठी एअरटेल आपल्या प्लानवर काम करत आहे. या योजनेंतर्गत एअरटेलने आपल्या दोन प्लानच्या किंमतीत वाढ केली आहे.



Airtelचा ३२९ रूपयांचा प्लान


या प्लानची व्हॅलिडिटी ३५ दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्सला ४ जीबी डेटा ऑफर केला जाईल. सोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि ३०० एसएमएस मिळतील.



Airtel चा १२९ रूपयांचा प्लान


या प्लानमध्ये एकूण १२ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय या प्लानमध्ये इतर कोणतेही जसे कॉलिंग आणि मेसेजिंगची सुविधा मिळत नाही.

Comments
Add Comment

आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

विशेष बाब म्हणून पुणे महानगरपालिकेत सामावून घेण्याचा निर्णय मुंबई : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी

मध्य रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन होळीसाठी मध्य रेल्वे द्वारा १८६ विशेष गाड्या ज्यामध्ये ९४ होळी विशेष व ९२ विशेष गाड्यांची सेवा

मुंबई : मुंबई – नागपूर/सावंतवाडी रोड / बनारस /गोरखपूर / समस्तीपूर /दानापूर तसेच पुणे – नागपूर /हजरत निजामुद्दीन /

भविष्यातील मुंबईसाठी ४८ हजार कोटींचा 'पाया'!

'एमएमआरडीए'चा अर्थसंकल्प सादर; मेट्रो, भुयारी मार्ग आणि 'मुंबई ३.०'वर भर, ८७ टक्के तरतूद पायाभूत

एमएमआरडीएचा २०१७–१८ नंतर प्रथमच अधिशेष अर्थसंकल्प

₹४८,०७२.५७ कोटींच्या आराखड्यामुळे आर्थिक परिवर्तनाचा नवा टप्पा आणि पायाभूत सुविधांना गती प्रकल्पांसाठी ८७%

Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ चे वेळापत्रक जाहीर; 'या' दिवशी सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प!

मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाच्या २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची अधिकृत दिनदर्शिका जाहीर झाली आहे. हे

प्रवासी आणि पादचाऱ्यांसाठी अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करणार; मंत्री मंगलप्रभात लोढा

याबाबत कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पश्चिम रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक विजय कुमार यांची घेतली भेट मुंबई