Airtelचा ग्राहकांना जोरदार झटका! महाग केले हे रिचार्ज प्लान

मुंबई: एअरटेलने ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. कंपनीने आपले दोन रिचार्ज प्लान महाग केले आहेत. हे दोन्ही प्रीपेड प्लान आहेत. एअरटेलने ११८ रूपये आणि २८९ रूपयांच्या प्रीपेड प्लानच्या किंमतीत वाढ केली आहे. हे ४जी डेटा वाऊचक प्लान आहेत. अशातच आता ११८ रूपयांच्या प्लानसाठी तुम्हाला १२९ रूपये द्यावे लागतील. तर २८९ रूपयांच्या प्रीपेड प्लानसाठी तुम्हाला ३२९ रूपये द्यावे लागतील.



का वाढवली किंमत?


एअरटेलला आपल्या अॅव्हरेज रेव्हेन्यू पर युजर्स म्हणजेच ARPUमध्ये वाढ करायची आहे. याच कारणामुळे चांगले रिटर्न मिळण्यासाठी एअरटेल आपल्या प्लानवर काम करत आहे. या योजनेंतर्गत एअरटेलने आपल्या दोन प्लानच्या किंमतीत वाढ केली आहे.



Airtelचा ३२९ रूपयांचा प्लान


या प्लानची व्हॅलिडिटी ३५ दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्सला ४ जीबी डेटा ऑफर केला जाईल. सोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि ३०० एसएमएस मिळतील.



Airtel चा १२९ रूपयांचा प्लान


या प्लानमध्ये एकूण १२ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय या प्लानमध्ये इतर कोणतेही जसे कॉलिंग आणि मेसेजिंगची सुविधा मिळत नाही.

Comments
Add Comment

'इंडिगो'ची सर्व उड्डाणे रद्द; प्रवाशांचे हाल, इतर विमानांचे दर दुप्पट

नवी दिल्ली : इंडिगो कंपनीने अचाकन आपल्या फ्लाईट रद्द केल्याने देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळाची अवस्था बस

वरळीत शिउबाठाची दादागिरी; भाजपच्या कामगार संघटनेचा फलक लावण्यास विरोध

मुंबई : विधानसभा निवडणुकीत वरळीची जागा कशीबशी जिंकलेल्या शिउबाठाला अद्याप राजकीय स्थितीचे भान आलेले दिसत नाही.

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या'

मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी

१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरू

गडकरी यांची लोकसभेत माहिती मुंबई : देशातील वाहनचालकांना आणि प्रवाशांना मोठी दिलासा देणारी घोषणा केंद्रीय