Loksabha Election : 'या' दिवसापासून लागू होणार आचारसंहिता 

लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या बैठकीची तारीख ठरली


नवी दिल्ली : देशातील सर्वांच्याच नजरा महत्त्वपूर्ण अशा लोकसभा निवडणुकीकडे (Loksabha Election) लागल्या आहेत. राजकीय पक्षदेखील (Political parties) यासाठी कंबर कसून तयारी करत आहेत. त्यातच आता यासंबंधी निवडणूक आयोगाच्या (Election Commission Of India) महत्त्वाच्या बैठकीची तारीख ठरली आहे. १५ मार्च रोजी ही बैठक पार पडणार असून १८ मार्चनंतर आचारसंहिता (Code of conduct) लागू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर निवडणुका (Lok Sabha Election Date) जाहीर होतील. तसेच १५ मार्चच्या बैठकीमध्ये केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.


देशातील लोकसभेच्या निवडणुका या १८ मार्च किंवा त्यानंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक ही शुक्रवारी १५ मार्च रोजी होणार आहे. त्यानंतर शनिवार आणि रविवारी सुट्टी असून सोमवारी किंवा त्यानंतर म्हणजे १८ मार्चनंतर आचारसंहिता लागू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.



निवडणूक आयुक्तांच्या रिक्त जागा भरणार


निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे यांनी घेतलेली निवृत्ती आणि निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशाच्या निवडणूक आयुक्तांच्या दोन जागा रिक्त झाल्या. या दोन निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती संदर्भात १५ मार्चच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.


केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक आयोगाच्या नियुक्ती संदर्भात समिती स्थापन करण्यात येणार आहे. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी पाच नावांचे दोन स्वतंत्र पॅनेल तयार करण्यात येणार आहे. या समितीमध्ये गृह सचिव आणि कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे (DOPT) सचिव यांचा समावेश असेल. केंद्रीय मंत्री आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते अधीर रंजन चौधरी यांच्यासह पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती, निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्तीसाठी दोन व्यक्तींची नावे देईल. त्यानंतर राष्ट्रपती निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करतील.


Comments
Add Comment

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

Summer Special Train: उन्हाळ्यात घरी परतणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे दरम्यान २१०० हून अधिक विशेष गाड्या धावणार

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने