Loksabha Election : 'या' दिवसापासून लागू होणार आचारसंहिता 

लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या बैठकीची तारीख ठरली


नवी दिल्ली : देशातील सर्वांच्याच नजरा महत्त्वपूर्ण अशा लोकसभा निवडणुकीकडे (Loksabha Election) लागल्या आहेत. राजकीय पक्षदेखील (Political parties) यासाठी कंबर कसून तयारी करत आहेत. त्यातच आता यासंबंधी निवडणूक आयोगाच्या (Election Commission Of India) महत्त्वाच्या बैठकीची तारीख ठरली आहे. १५ मार्च रोजी ही बैठक पार पडणार असून १८ मार्चनंतर आचारसंहिता (Code of conduct) लागू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर निवडणुका (Lok Sabha Election Date) जाहीर होतील. तसेच १५ मार्चच्या बैठकीमध्ये केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.


देशातील लोकसभेच्या निवडणुका या १८ मार्च किंवा त्यानंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक ही शुक्रवारी १५ मार्च रोजी होणार आहे. त्यानंतर शनिवार आणि रविवारी सुट्टी असून सोमवारी किंवा त्यानंतर म्हणजे १८ मार्चनंतर आचारसंहिता लागू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.



निवडणूक आयुक्तांच्या रिक्त जागा भरणार


निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे यांनी घेतलेली निवृत्ती आणि निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशाच्या निवडणूक आयुक्तांच्या दोन जागा रिक्त झाल्या. या दोन निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती संदर्भात १५ मार्चच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.


केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक आयोगाच्या नियुक्ती संदर्भात समिती स्थापन करण्यात येणार आहे. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी पाच नावांचे दोन स्वतंत्र पॅनेल तयार करण्यात येणार आहे. या समितीमध्ये गृह सचिव आणि कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे (DOPT) सचिव यांचा समावेश असेल. केंद्रीय मंत्री आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते अधीर रंजन चौधरी यांच्यासह पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती, निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्तीसाठी दोन व्यक्तींची नावे देईल. त्यानंतर राष्ट्रपती निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करतील.


Comments
Add Comment

VIRAL VIDEO : सावधान! देवभूमीचा ट्रिप प्लॅन करताय? हा थरारक व्हिडिओ पाहून तुमचेही पाय लटपटतील!

देहराडून : उत्तराखंडमधील प्रसिद्ध सिद्धपीठ माता धारी देवी मंदिराजवळ नदीपात्रात दोन बोटींची समोरासमोर भीषण धडक

India AI Impact Summit 2026 : एआय समिटमध्ये महाराष्ट्राचा डंका! कृषी विकासासाठी 'महाॲग्री एआय' ठरणार गेमचेंजर - मुख्यमंत्री फडणवीस

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे

Nitesh Rane : नवी दिल्लीतील ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये मंत्री नितेश राणे यांचा सहभाग

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'डिजिटल इंडिया'ला आता कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) जोड देऊन

AI Authenticity Label : एआय-निर्मित डिजिटल कंटेंटसाठी ‘ऑथेंटिसिटी लेबल’ आजपासून अनिवार्य

केंद्र सरकारने एआयच्या मदतीने तयार होणाऱ्या डिजिटल कंटेंटबाबत कडक मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. १०

Patna High Court: बिहार विधानसभा अध्यक्षांसह ४२ आमदारांना हायकोर्टाची नोटीस

- निवडणूक प्रतिज्ञापत्रांमध्ये खोटी माहिती दिल्याचा आरोप बिहारच्या राजकारणात एक मोठी कायदेशीर घडामोड समोर आली

चोरीला गेलेले फोन मिळणार परत, दिल्ली पोलिसांचे मिशन रीकनेक्ट ३.० नेमकं आहे तरी काय?

दिल्ली: दिल्लीमध्ये मोबाईल फोन चोरीच्या वाढत्या घटनांमध्ये, दिल्ली पोलिसांच्या ट्रान्सपोर्ट रेंजने मिशन