Loksabha Election : 'या' दिवसापासून लागू होणार आचारसंहिता 

  190

लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या बैठकीची तारीख ठरली


नवी दिल्ली : देशातील सर्वांच्याच नजरा महत्त्वपूर्ण अशा लोकसभा निवडणुकीकडे (Loksabha Election) लागल्या आहेत. राजकीय पक्षदेखील (Political parties) यासाठी कंबर कसून तयारी करत आहेत. त्यातच आता यासंबंधी निवडणूक आयोगाच्या (Election Commission Of India) महत्त्वाच्या बैठकीची तारीख ठरली आहे. १५ मार्च रोजी ही बैठक पार पडणार असून १८ मार्चनंतर आचारसंहिता (Code of conduct) लागू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर निवडणुका (Lok Sabha Election Date) जाहीर होतील. तसेच १५ मार्चच्या बैठकीमध्ये केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.


देशातील लोकसभेच्या निवडणुका या १८ मार्च किंवा त्यानंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक ही शुक्रवारी १५ मार्च रोजी होणार आहे. त्यानंतर शनिवार आणि रविवारी सुट्टी असून सोमवारी किंवा त्यानंतर म्हणजे १८ मार्चनंतर आचारसंहिता लागू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.



निवडणूक आयुक्तांच्या रिक्त जागा भरणार


निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे यांनी घेतलेली निवृत्ती आणि निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशाच्या निवडणूक आयुक्तांच्या दोन जागा रिक्त झाल्या. या दोन निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती संदर्भात १५ मार्चच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.


केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक आयोगाच्या नियुक्ती संदर्भात समिती स्थापन करण्यात येणार आहे. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी पाच नावांचे दोन स्वतंत्र पॅनेल तयार करण्यात येणार आहे. या समितीमध्ये गृह सचिव आणि कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे (DOPT) सचिव यांचा समावेश असेल. केंद्रीय मंत्री आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते अधीर रंजन चौधरी यांच्यासह पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती, निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्तीसाठी दोन व्यक्तींची नावे देईल. त्यानंतर राष्ट्रपती निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करतील.


Comments
Add Comment

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही- पंतप्रधानांची ग्वाही, अमेरिकेच्या ५० टक्के टॅरिफवर व्यक्त केला वज्र निर्धार

अहमदाबाद : शेतकरी, लघु उद्योजक आणि पशुपालकांचे हित हेच माझ्यासाठी सर्वोच्च असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र

पंतप्रधान मोदींची पदवी सार्वजनिक करण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने केले रद्द

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवीची माहिती सार्वजनिक करण्याचे केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी)

भटक्या कुत्र्याचा पाच वर्षांच्या मुलावर हल्ला

नवी दिल्ली : दिल्लीच्या शकरपूर भागात भटक्या कुत्र्याने पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा

जैसलमेरमध्ये खोदकामात आढळले २०१ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या फायटोसॉरचे जीवाश्म

जैसलमेर: राजस्थानमधील एका गावात तलावाजवळ डायनासॉर काळातील जीवाश्म सापडले असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू

संघाची जोधपूरमध्ये ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत

हैदराबादमध्ये क्रौर्याचा कळस! पतीने गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. एका पतीने