नागपूर : नागपुरात (Nagpur) महाशिवरात्री निमित्त (Mahashivratri) उपवासात शिंगाड्याचं पीठ खाणाऱ्या भाविकांना विषबाधा (Food poisoning) झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपुरातील हिंगणा, कामठी या दोन तालुक्यातील तब्बल १०० हून अधिक नागरिकांना विषबाधा झाली आहे. या सर्वांना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाने शिंगाड्याच्या पिठाचे नमुने घेतले असून ते पुढील चौकशीसाठी पाठवले आहेत.
शिंगाडा पिठापासून बनविलेले अन्न पदार्थ खाल्याने या नागरिकांना उलट्या, हगवण, पोटदुखी, अंगदुखी सारखी लक्षणे आढळल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या सर्वांनी विकत घेतलेले शिंगाड्याचे पीठ एकाच कंपनीचे असून हे पीठ एक्स्पायर झाल्याचे देखील सांगण्यात येत आहे. मुदत संपल्यांतरही दुकानदारांनी ते पीठ नष्ट न करता विक्री केल्याने हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या नागरिकांनी ज्या दुकानांमधून हे पीठ विकत घेतले होते, त्या दुकानांवर अन्न व औषध प्रशासन काय कारवाई करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या भाविकांनी हे शिंगाड्याचे पीठ खाल्ले, त्याची एक्स्पायरी म्हणजेच मुदत संपली होती. याच शिंगाडाच्या पिठापासून तयार केलेल्या उपवासाच्या फराळाचे पदार्थ खाल्याने नागपूर जिल्ह्यात १०० हून अधिक जणांना अन्नातून विषबाधा झाली. या प्रकारामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. ऐन महाशिवरात्रीच्या दिवशी शहरातल्या विविध भागांमध्ये सीलबंद शिंगाडा पिठाची विक्री करणाऱ्या एकमात्र ब्रँडमुळे हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे. घडलेल्या प्रकारामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केला जात आहे. हा भेसळीचा प्रकार असल्याचा संतापही नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…