BCCIने कसोटी क्रिकेटर्सची वाढवली सॅलरी, आता एका सामन्यासाठी मिळणार इतके लाख रूपये

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचा पगार वाढवण्याचा प्लान केला आहे. बोर्डाने कसोटी खेळाडूंसाठी इन्सेटिव्ह स्कीम लागू केली आहे. आता एका हंगामात ७५ टक्के कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूला एका सामन्यासाठी तब्बल ४५ लाख रूपये मिळतील. तर एका हंगामात ५० ते ७४ टक्के सामने खेळणाऱ्या खेळाडूला प्रति सामन्यासाठी ३० लाख रूपये मिळतील.


धरमशाला कसोटीत टीम इंडियाच्या विजयानंतर सचिव जय शाह यांनी ही घोषणा केली. एका कसोटी खेळाडूला जो हंगामात १० कसोटी सामन्यात भाग घेत असेल तर त्याला प्रोत्साहन म्हणून ४.५० कोटी रूपयांची मोठी रक्कम मिळेल. सोबतच वरिष्ठ क्रिकेटर्सना वार्षिक केंद्रीय कराराअंतर्गत रिटेनर फीही मिळेल.


अनुभवी क्रिकेटर चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादव यांना या वर्षी कॉन्ट्रॅक्ट मिळालेले नाही तर त्यांना गेल्या सत्रासाठी प्रोत्साहन राशी दिली जाईल. जय शाह म्हणाले मंडळ २०२२-२३ आणि २०२३-२४ साठी तब्बल ४५ कोटी रूपये खर्च करणार आहे.


बीसीसीआय सचिव जय शाह यांनी पत्रकारांशी बातचीत करताना म्हटले की या योजनेमुळे खेळाडूंची इंडियन प्रीमियर लीगच्या कॉन्ट्रॅक्टपेक्षा अधिक कमाई होईल. आयपीएल हे महत्त्वाचे आहेच मात्र द्विपक्षीय क्रिकेटही तितकेच महत्त्वाचे आहे. यात एकूण ४५ कोटी रूपये खर्च होतील.


उदाहरणार्थ, भारताचा कर्णधार रोहित शर्माने २०२३-२४ या हंगामात सर्व १० कसोटी सामने खेळले आहेत त्यामुळे टेस्ट क्रिकेटला प्राथमिकता देण्यासाठी १.५ कोटी रूपये मॅच फीमिळेल. सोबतच त्याला ४.५ कोटी रूपयेही मिळतील. अशातच कसोटी क्रिकेटमधून त्याची कमाई ६ कोटी रूपये झाली. सोबतच त्याची वार्षिक कमाई ७ कोटी रूपये यात जोडल्यास एकूण कमाई १३ कोटी रूपये होईल.

Comments
Add Comment

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना

WPL 2026 Final: बंगळूरची विजयी घोडदौड दिल्ली थांबवू शकणार का?

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची स्थगिती कायम, रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली  : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार

IND vs PAK : पाकिस्तान नेहमीप्रमाणे "यू-टर्न" घेईल; सुनील गावस्कर यांची पाकिस्तानवर टीका

मुंबई: टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.

जोकोविचला नमवत कार्लोसची ऑस्ट्रेलियन ओपनला गवसणी

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन २०२६च्या पुरुष एकेरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या युवा खेळाडू कार्लोस