BCCIने कसोटी क्रिकेटर्सची वाढवली सॅलरी, आता एका सामन्यासाठी मिळणार इतके लाख रूपये

  83

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचा पगार वाढवण्याचा प्लान केला आहे. बोर्डाने कसोटी खेळाडूंसाठी इन्सेटिव्ह स्कीम लागू केली आहे. आता एका हंगामात ७५ टक्के कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूला एका सामन्यासाठी तब्बल ४५ लाख रूपये मिळतील. तर एका हंगामात ५० ते ७४ टक्के सामने खेळणाऱ्या खेळाडूला प्रति सामन्यासाठी ३० लाख रूपये मिळतील.


धरमशाला कसोटीत टीम इंडियाच्या विजयानंतर सचिव जय शाह यांनी ही घोषणा केली. एका कसोटी खेळाडूला जो हंगामात १० कसोटी सामन्यात भाग घेत असेल तर त्याला प्रोत्साहन म्हणून ४.५० कोटी रूपयांची मोठी रक्कम मिळेल. सोबतच वरिष्ठ क्रिकेटर्सना वार्षिक केंद्रीय कराराअंतर्गत रिटेनर फीही मिळेल.


अनुभवी क्रिकेटर चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादव यांना या वर्षी कॉन्ट्रॅक्ट मिळालेले नाही तर त्यांना गेल्या सत्रासाठी प्रोत्साहन राशी दिली जाईल. जय शाह म्हणाले मंडळ २०२२-२३ आणि २०२३-२४ साठी तब्बल ४५ कोटी रूपये खर्च करणार आहे.


बीसीसीआय सचिव जय शाह यांनी पत्रकारांशी बातचीत करताना म्हटले की या योजनेमुळे खेळाडूंची इंडियन प्रीमियर लीगच्या कॉन्ट्रॅक्टपेक्षा अधिक कमाई होईल. आयपीएल हे महत्त्वाचे आहेच मात्र द्विपक्षीय क्रिकेटही तितकेच महत्त्वाचे आहे. यात एकूण ४५ कोटी रूपये खर्च होतील.


उदाहरणार्थ, भारताचा कर्णधार रोहित शर्माने २०२३-२४ या हंगामात सर्व १० कसोटी सामने खेळले आहेत त्यामुळे टेस्ट क्रिकेटला प्राथमिकता देण्यासाठी १.५ कोटी रूपये मॅच फीमिळेल. सोबतच त्याला ४.५ कोटी रूपयेही मिळतील. अशातच कसोटी क्रिकेटमधून त्याची कमाई ६ कोटी रूपये झाली. सोबतच त्याची वार्षिक कमाई ७ कोटी रूपये यात जोडल्यास एकूण कमाई १३ कोटी रूपये होईल.

Comments
Add Comment

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा