Uddhav Thackeray : रोज गळ्यात नवा हार, आयडालॉजी तडीपार!

व्यंगचित्रातून भाजपने उद्धव ठाकरेंना लगावली चपराक


मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Elections) सर्वच राजकीय पक्षांनी (Political parties) कंबर कसली आहे. त्यातच आपल्या पक्षाचा प्रभाव वाढवण्यासाठी विरोधी पक्षांवर नेत्यांकडून जोरदार वार प्रतिवार केले जात आहेत. सत्ताधारी व विरोधींनी एकमेकांविरोधात टीकास्त्र उपसले आहे. त्यातच ठाकरे गटाचे (Thackeray Group) मुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपबाबत 'अबकी बार, भाजप तडीपार', अशी टीका केली. त्यांच्या या टीकेला आता भाजपकडून (BJP Party) चोख प्रत्युत्तर मिळाले आहे.


भाजपने आपल्या अधिकृत एक्स (X) अकाऊंटवरुन उद्धव ठाकरेंचे एक व्यंगचित्र (Caricature) शेअर करत ठाकरेंना जोरदार चपराक लगावली आहे. या व्यंगचित्राला 'रोज गळ्यात नवा हार, आयडालॉजी तडीपार!', असं कॅप्शन देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे नेहमी कोणत्या ना कोणत्या पक्षाबाबत बोलतात मात्र त्यांना आता स्वतःची विचारधारा राहिलेली नाही, अशी टीका यातून करण्यात आली आहे.





या व्यंगचित्रात उद्धव ठाकरेंच्या गळ्यात वेगवेगळ्या पक्षांचे हार घातले आहेत, असं दाखवलं आहे. मात्र, त्यांची आयडिऑलॉजी यात तडीपार झाली आहे, अशी टीका भाजपने केली आहे.

Comments
Add Comment

US China : तैवानकडे वाकड्या नजरेने पाहू नका, जिनपिंग यांचा ट्रम्प यांना इशारा

बीजिंग (युएनआय): जगातील दोन महासत्तांचे नेते, डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यात बीजिंगमधील 'ग्रेट हॉल ऑफ द

CNG Price Hike : सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांनी वाढ

मुंबई : मध्य पूर्वेतील तणावामुळे उद्भवलेल्या ऊर्जा संकटाचा फटका आता मुंबईकरांच्या खिशाला बसला आहे. अमूल आणि मदर

Mayor Ritu Tawde : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील नालेसफाईसह रस्ते कामांची महापौरांनी केली पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील नद्या आणि लहान-मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे महानगरपालिका

 नाशिक : भोंदूबाबा खरात प्रकरणात उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांचे निलंबन

 भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील निलंबित -१४३ वेळा कॉल आणि आर्थिक गुंतवणुकीचा

Mumbai : मुंबईतील विविध यंत्रणांच्या ताब्यातील ६,१६० पाण्याच्या टाक्यांची तपासणीच झाली नसल्याचे उघड

डास प्रतिबंधात्मक उपाययोजना करता संयुक्त पाहणी करण्याचे आयुक्तांचे आदेश बांधकामस्थळी ५ हजारांहून अधिक

BCCI SQUAD ANNOUNCE : श्रीलंका दौऱ्यासाठी भारत अ संघाची घोषणा, तिलक वर्मा नवीन कर्णधार !

आयपीएल २०२६ आता अखेरच्या टप्प्यात आहे. २०२६ हंगामाचा अखेरचा सामना ३१ मे रोजी होणार आहे. याच दरम्यान BCCI ने