Nilesh Rane : रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवर केवळ भाजपचाच अधिकार : निलेश राणे

  627

सावंतवाडी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मी आतापर्यंत तीन वेळा निवडणूक लढविली. मात्र यावेळी भारतीय जनता पार्टीला जेवढे पोषक वातावरण आहे तेवढे यापूर्वी कधीही नव्हते. अपक्ष म्हणून निवडणूक लढविताना मी तीन लाख मते घेतली. आता राणे भाजपवासी झाल्यामुळे ती तीन लाख मते भाजपमध्ये जमा झाली आहेत. त्यामुळे बेरीज आमचीच होते. तर उबाठा एकाकी असून त्यांच्यापासून शिवसेना व भाजप बाजूला झाले आहेत. त्यामुळे चारही बाजूने भाजपला पोषक वातावरण असून रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावर यावेळी केवळ भाजपचाच अधिकार आहे, असा दावा माजी खासदार तथा भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ प्रमुख निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज वयाच्या ७३ व्या वर्षी रात्रंदिवस काम करीत आहेत. निवडणुकीच्या दरम्यान एका दिवसात चार राज्यांमध्ये ते प्रचार करताना दिसले. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे देखील रात्रंदिवस अनेक भागात फिरून भारतीय जनता पार्टीच्या मतदारांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचे काम करीत आहेत.


महाराष्ट्र व गोवा राज्याचे संबंध चांगले राहावे यासाठी काम करणारे डॉ. प्रमोद सावंत हे पहिलेच मुख्यमंत्री आहेत. आपल्या लोकसभा मतदारसंघासाठी ते क्लस्टर प्रमुख या नात्याने करीत असलेल्या कामाला येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते नक्कीच समर्थपणे साथ देतील व भाजपच्या ४०० अपेक्षित जागांमध्ये ४०१ वी जागा ही रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाची असेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.


२०१४ नंतर मोदी सरकारच्या काळात अनेक लोकोपयोगी योजना या केंद्र सरकारने राबविल्या असून त्याचा सर्वसामान्य जनतेला फायदा होत आहे. याच योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम आपल्याला करायचे असून या भागातील खासदार हा भाजपचाच निवडून जाण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

Comments
Add Comment

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

गणेशभक्तांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर करा!

खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन विशेष गाड्या,अधिकचे कोच जोडण्याची केली मागणी नवी दिल्ली :

सिंधुदुर्गमध्ये महाराष्ट्राचा पहिला काचेचा पूल सज्ज! नापणे धबधब्यावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण, कोकण पर्यटनाला नवी झळाळी

सिंधुदुर्ग: कोकणच्या निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात, पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे एक महत्त्वाचे

अभय योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा

आयुक्त मंगेश चितळे यांचे आवाहन पनवेल : मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये सवलत देत पनवेल महापालिकेने दिनांक १८ जुलै

Reservation Chart : आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पाहायला मिळणार आरक्षण चार्ट, 'या' दिवसापासून सेवा सुरूवात

मुंबई : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी