LPG Price Hike: मार्चच्या पहिल्याच दिवशीच झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ

नवी दिल्ली: मार्च महिन्याची सुरूवात झाली आहे आणि महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १ मार्चला एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. म्हणजेच १ मार्च २०२४ ला सिलेंडर महाग झाला आहे. दरम्यान, ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी किंमतीतील ही वाढ कर्मशियल गॅस सिलेंडरच्या दरात केली आहे. दिल्लीमध्ये २५ रूपये तर मुंबईमध्ये सिलेंडरच्या किंमतीत २६ रूपयांनी वाढ झाली आहे.

ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी सलग दुसऱ्या महिन्यात १९ किलोच्या सिलेंडरच्या किंमतीत वाढ करत महागाईचा आणखी एक झटका दिला आहे. गेल्या महिन्यात बजेटच्या दिवशी १ फेब्रुवारी २०२४ला १४ रूपयांची वाढ केली होती. त्यानंतर आता २५ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. IOCL च्या वेबसाईटवर बदललेले दर जाहीर करण्यात आले आहेत. १ मार्च २०२४ म्हणजेच आजपासून हे नवे दर लागू आहेत.

नव्या दरानुसार राजधानी दिल्लीत कर्मशियल सिलेंडर १७९५रूपयांना मिळेल. तर कोलकातामध्ये हा सिलेंडर १९११ रूपयांना मिळेल. मुंबईमध्ये कमर्शियल सिलेंडरची किंमत वाढून १७४९ रूपये तर चेन्नईमध्ये १९६०.५० रूपये झाली आहे.

फेब्रुवारीमध्ये होती इतकी किंमत


याआधी या बदलाआधी दिल्लीमध्ये १९किलोच्या कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत १७५५.५० रूपयांनी वाढून १७६९.५० रूपये झाली होती. इतर महानगरांमध्ये बोलायचे झाल्यास कोलकातामध्ये एका सिलेंडरची १८६९ वरून १८८७ रूपये झाली होती. मुंबईमध्ये आधी जो कमर्शियल सिलेंडर १७०८ रूपयांना मिळत होता तो १७२३ रूपये झाला होता. तर चेन्नईमध्ये याची किंमत १९२४.५० रूपयांवरून १९३७ रूपये झाली होती.
Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे