Loksabha Election : भाजपा देशात ३७७ आणि महाराष्ट्रात ४५ जागा जिंकण्याचा झी मीडिया-मॅट्रिझच्या ओपिनिअन पोलमध्ये अंदाज

Share

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) भाजपाने ‘अबकी बार ४०० पार’चा नारा दिला आहे. तर इकडे महाराष्ट्रातही महायुतीने ४५+ जागा जिंकण्याचा विडा उचलला आहे. यासाठी शिंदे-फडणवीस-पवारांनी अनेक डावपेच आखले आहेत. अनेक जागांवर दिग्गजांना धक्कातंत्र अवलंबण्याची तयारीही झाली आहे. त्यामुळे महायुती हे टार्गेट गाठू शकते, महायुतीचा ४५ जागांवर विजय होऊ शकतो, असा झी मीडिया-मॅट्रिझच्या ओपिनिअन पोलमध्ये अंदाज बांधण्यात आला आहे.

झी मीडिया-मॅट्रिझच्या ओपिनिअन पोलमध्ये भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला देशात ३७७ आणि महाराष्ट्रात ४५ जागा जिंकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर इंडिया आघाडीला देशात ९३ आणि महाराष्ट्रात केवळ तीन जागा जिंकता येऊ शकतात, असाही अंदाज बांधण्यात आला आहे.

देशात भाजपाने ३७० आणि एनडीएने ४००+ जागांवर विजय मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तर महाराष्ट्रात एकूण ४५ जागांचे लक्ष्य ठेवले आहे. हेच लक्ष्य पूर्ण करण्यासाठी भाजपाने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी भाजपाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या २३ जागांवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. आपल्या हक्काच्या २३ जागा पुन्हा काबीज करण्यासाठी भाजपाने निवडणूक निरीक्षकांची नेमणूक केली आहे. विशेष म्हणजे या निवडणूक निरीक्षकामध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून अनेक दिग्गज नेत्यांच्या नावांच्या चर्चा सुरु आहेत. यामध्ये विशेषत: गिरीश महाजन, पंकजा मुंडे, आणि सुधीर मुनगंटीवार यांची नावे अग्रस्थानी असून राज्यातील २३ लोकसभा जागांसाठी निवडणूक निरिक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. यात पंकजा मुंडे यांच्याकडे उत्तर मुंबई, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे उत्तर पूर्व तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बीड लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

राज्यात सध्या महायुतीमध्ये भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. शिंदे यांनी १७ ते १८ जागांवर दावा केला आहे. तर शिंदेंएवढ्याच जागा आपल्याला मिळाव्या असा आग्रह अजित पवार यांनी धरला आहे. त्यामुळे या सगळ्यावर नेमका कसा तोडगा निघतो हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र एनडीएने भारतात ४०० आणि महाराष्ट्रात ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

Recent Posts

sleepwalking : झोपेत चालण्याच्या सवयीने १९ वर्षीय तरुणाने गमावला जीव!

झोपेत चालत थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला मुंबई : झोपेत चालण्याच्या सवयीमुळे (sleepwalking) भायखळा येथील…

5 mins ago

Nagpur Deekshabhoomi : दीक्षाभूमी अंडरग्राऊंड पार्किंगबाबत बौद्ध अनुयायी आक्रमक!

जाळपोळ आणि तोडफोड करत केले आंदोलन नागपूर : जगभरातील बौद्ध अनुयायांसह (Buddhist followers) तमाम भारतीयांचे…

23 mins ago

Tamhini Ghat : नसतं धाडस बेतलं जीवावर! तरुणाने धबधब्यात उडी मारली आणि थेट वाहून गेला…

ताह्मिणी घाटातील धक्कादायक प्रकार पुणे : पावसाळा सुरु होताच अनेकजण पर्यटनाचं (Monsoon picnic) आयोजन करतात.…

2 hours ago

AI voice scam : नोकरी शोधून देता देता छोकरीलाच पटवलं आणि घातला ७ लाखांचा गंडा!

AI च्या किमयेने कट रचला आणि मैत्रिणीने चुना लावला मुंबई : हल्ली एआय तंत्रज्ञानामुळे (AI…

2 hours ago

Pune crime : स्वारगेटच्या मोबाईल चोरट्यांचा पर्दाफाश! तब्बल १२० मोबाईल आणि ३ लॅपटॉप जप्त

प्रवाशांनी सावध राहण्याचे पुणे पोलिसांचे आवाहन पुणे : पुण्यातील धक्कादायक प्रकारांचे सत्र सुरुच असून रोज…

3 hours ago

Rahul Dravid : वर्ल्डकप जिंकल्यानंतर कोच राहुल द्रविड यांची विराट कोहलीकडे ‘ही’ खास मागणी!

म्हणाले, तू सर्व आयसीसी व्हाईट बॉल ट्रॉफी तर जिंकल्यास, पण... मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने…

4 hours ago