Shreyas Talpade : श्रेयस तळपदेच्या 'ही अनोखी गाठ' चित्रपटाच्या तिकीटावर एक खास ऑफर!

  97

उद्यापासून होणार सर्वत्र प्रदर्शित


मुंबई : महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) दिग्दर्शित 'ही अनोखी गाठ' (Hee Anokhi Gath) या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा आहे. याचं कारण म्हणजे नुकताच हृदयविकाराच्या झटक्यातून सावरलेला अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या जोडीला गौरी इंगवले (Gauri Ingawale) प्रमुख भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट उद्यापासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार असून चित्रपटाच्या तिकीटावर एक खास ऑफर देण्यात आली आहे. या चित्रपटाच्या एका तिकीटावर एक तिकीट फ्री देण्यात येणार आहे.


'ही अनोखी गाठ' या चित्रपटामधून गौरी आणि श्रेयसची नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची बरीच उत्सुकता लागून राहिली आहे. शिवाय आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक भन्नाट ऑफरही जाहीर केली आहे. १ मार्चला एकावर एक तिकीट फ्री अशी ऑफर असणार आहे.


बूक माय शोवर HEAGBOGO हा कूपन कोड वापरुन तुम्ही ही ऑफर वापरु शकता. आपल्या माणसांच्या सोबतीने पाहा, 'ही अनोखी गाठ' ची प्रेक्षकांना १ वर १ फ्री ची स्पेशल ऑफर, मग आजच तिकीट बुक करा, असं कॅप्शन त्यांनी या पोस्टवर दिलं आहे.





महेश मांजरेकर मुव्हिज आणि झी स्टुडिओज निर्मित 'ही अनोखी गाठ' या चित्रपटात शरद पोंक्षे, रिषी सक्सेना, दीप्ती लेले, सुरभी भावे हे कलाकार देखील पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाच्या तिकीटावरील ऑफर फक्त १ मार्च या दिवशीच लागू असणार आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या