Shreyas Talpade : श्रेयस तळपदेच्या 'ही अनोखी गाठ' चित्रपटाच्या तिकीटावर एक खास ऑफर!

उद्यापासून होणार सर्वत्र प्रदर्शित


मुंबई : महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) दिग्दर्शित 'ही अनोखी गाठ' (Hee Anokhi Gath) या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा आहे. याचं कारण म्हणजे नुकताच हृदयविकाराच्या झटक्यातून सावरलेला अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या जोडीला गौरी इंगवले (Gauri Ingawale) प्रमुख भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट उद्यापासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार असून चित्रपटाच्या तिकीटावर एक खास ऑफर देण्यात आली आहे. या चित्रपटाच्या एका तिकीटावर एक तिकीट फ्री देण्यात येणार आहे.


'ही अनोखी गाठ' या चित्रपटामधून गौरी आणि श्रेयसची नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची बरीच उत्सुकता लागून राहिली आहे. शिवाय आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक भन्नाट ऑफरही जाहीर केली आहे. १ मार्चला एकावर एक तिकीट फ्री अशी ऑफर असणार आहे.


बूक माय शोवर HEAGBOGO हा कूपन कोड वापरुन तुम्ही ही ऑफर वापरु शकता. आपल्या माणसांच्या सोबतीने पाहा, 'ही अनोखी गाठ' ची प्रेक्षकांना १ वर १ फ्री ची स्पेशल ऑफर, मग आजच तिकीट बुक करा, असं कॅप्शन त्यांनी या पोस्टवर दिलं आहे.





महेश मांजरेकर मुव्हिज आणि झी स्टुडिओज निर्मित 'ही अनोखी गाठ' या चित्रपटात शरद पोंक्षे, रिषी सक्सेना, दीप्ती लेले, सुरभी भावे हे कलाकार देखील पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाच्या तिकीटावरील ऑफर फक्त १ मार्च या दिवशीच लागू असणार आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये