Nitesh Rane : मनोज जरांगे यांची नार्को टेस्ट करा!

फडणवीस साहेबांना अडचणीत आणण्यासाठी १०० जन्म घ्यावे लागतील


नितेश राणे यांनी मनोज जरांगेंना सुनावले खडे बोल


मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर काल मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी प्रचंड आक्रमक होत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. फडणवीसांच्या सागर बंगल्यावर येण्याचीही धमकी दिली. जरांगे यांनी पातळी सोडून भाष्य केल्याने सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र उपसले. भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी देखील मनोज जरांगे यांना धमकीवजा इशारा दिला आहे. मनोज जरांगे यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. शिवाय फडणवीस साहेबांना अडचणीत आणण्यासाठी १०० जन्म घ्यावे लागतील, असंही ते म्हणाले आहेत.


नितेश राणे म्हणाले, सागरला येणं लांबची गोष्ट आहे. आधी आमची भिंत आहे ती पार करणे अवघड आहे. एक व्यक्ती मराठा समाजाची बदनामी करत असेल तर खपवून घेणार नाही. देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी १०० जन्म घ्यावे लागतील. कुणी विनाकारण केसेस अंगावर घेऊ नयेत. जरांगेंचे जुने सहकारी जरांगेंची शरद पवारांशी जवळीक असल्याचे सांगतात. मग हा आवाज तुतारीचा आहे का? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.


नितेश राणे म्हणाले, जरांगे सातत्याने फडणवीस साहेबांवर आरोप करत आहेत, मात्र कोर्टात जेव्हा आरक्षणाची केस जाईल तेव्हा फडणवीस साहेबच मोठ्यातला मोठा तज्ज्ञ वकील उभा करुन आपली बाजू लावून धरणार आहेत. त्यांनी जे २०१४ ते २०१९ मध्ये केलं ते नंतर आलेल्या नालायक उद्धव ठाकरेला जमलं नाही. पण आता फडणवीस साहेबच आपली कायदेशीर बाजू तिथे लावून धरणार आहेत, हे मराठा समाजाने लक्षात घ्यावं, असं नितेश राणे म्हणाले.


पोलीसांवर जो हल्ला झाला त्यामागे जरांगे पाटलांचा हात असल्याचा आरोप त्यांचेच सहकारी करु लागले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले, की जे सहकारी त्या क्षणावेळी आंतरवाली सराटीमध्ये होते, त्या आंदोलनाचे साक्षी होते, ते जर खरं बोलत असतील तर त्यांची नार्को टेस्ट करा. जरांगे पाटलांची देखील नार्को टेस्ट करा. त्यामुळे खरं काय ते कळेल. त्या आंदोलनामुळे उगीच आमच्या पोलिसांची बदनामी झाली की पोलिसांनी चुकीचा लाठीचार्ज केला, तर या गोष्टीची चौकशी झालीच पाहिजे, असं मत नितेश राणे यांनी व्यक्त केलं.



नितेश राणे यांचा संजय राऊतांना टोला


संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही नितेश राणे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, रात्रीची उतरली असेल तर तुम्ही कालपासून कुणाला फोन करताय हे बाहेर येईल. सिल्व्हर ओक, जरांगे पाटील यांच्या जवळच्या लोकांना बोलत असतील याचा सिडीआर कधीतरी बाहेर येईल. जी भाषा पवार, उद्धव ठाकरे बोलतात तीच भाषा जरांगे बोलत आहेत. आम्ही राजकीय आंदोलनाला समर्थन देणार नाही. आम्हाला धमकी देणाऱ्याचे नंबर आमच्याकडे आहेत, आज ना उद्या पोलीस जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला कुणी वाचवणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

Comments
Add Comment

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा

Nagpur News : नागपूरमध्ये २८ वर्षीय एअर होस्टेसची गळफास घेऊन आत्महत्या; मध्यरात्री प्रियकराशी फोनवर बोलली अन्...

नागपूर : नागपूरमधील लकडगंज (Nagrpur News) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. नुकतीच

Pune Accident News : मावळमध्ये दुर्दैवी घटना; बास्केटबॉल खेळताना लोखंडी स्टॅन्ड अंगावर पडला अन् ....

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ (Maval) तालुक्यात घडलेल्या एका दुर्दैवी अपघाताने खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्रात आता 'एआय'साठी स्वतंत्र मंत्रालयीन विभाग

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; महावितरणची आर्थिक पुनर्रचना करणार मुंबई : राज्याच्या प्रशास