IPL 2024आधी Actionमध्ये परतला हार्दिक पांड्या

  148

मुंबई: हार्दिक पांड्या वनडे वर्ल्डकप २०२३दरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. भारताच्या या ऑलराऊंडरला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. हा सामना १९ ऑक्टोबरला खेळवण्यात आला होता. आता मैदानावर त्याचे पुनरागमन झाले आहे. यामुळे आयपीएल २०२४ आधी मुंबई इंडियन्स आणि टी-२० वर्ल्डकप २०२४आधी भारतीय क्रिकेट संघासाठी मोठी दिलासादायक बाब आहे. हार्दिकने डीवाय पाटील टी-२० स्पर्धेच्या माध्यमातून तब्बल चार महिन्यांनी पुनरागमन केले आहे.


स्पर्धेत हार्दिक रिलायन्स १चे नेतृत्व करताना दिसला. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडविरुद्ध खेळवल्या गेलेल्या सामन्यात हार्दिकने बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही केली. पहिल्यांदा बॉलिंग करताना त्याने ३ षटकांत २२ धावा देत २ विकेट मिळवल्या. हार्दिकने रिलायन्स १ साठी बॉलिंगची सुरूवात केली.


त्याने पुन्हा बॅटिंग करताना ४ बॉलमध्ये नाबाद ३ धावा केल्या. विशेष म्हणजे हार्दिक १०व्या स्थानावर बॅटिंगसाठी उतरला होता. हार्दिकच्या टीमने १५ षटकांत ८ बाद १२६ धावांचे लक्ष्य गाठले होते. पांड्याच्या बॅटिंग आणि बॉलिंग करण्याने एक गोष्ट तर स्पष्ट झाली की तो पूर्णपणे फिट आहे. तो आयपीएल आणि आगामी टी-२० वर्ल्डकपमध्ये तो पूर्ण क्षमतेने खेळू शकतो.



हार्दिकच्या अनुपस्थितीत सूर्याने केले होते नेतृत्व


हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवने भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व केले होते. हार्दिक गेल्या काही वर्षांपासून भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व करत होता. मात्र त्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवने वर्ल्डकपनंतर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवल्या गेलेल्या मालिकेत भारताचे नेतृत्व केले होते. दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेत रोहित शर्मा भारताचा कर्णधार म्हणून दिसला होता.

Comments
Add Comment

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट