PM Narendra Modi : पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी उभारण्यात येणारा सभामंडप कोसळला!

४ कामगार जखमी; यवतमाळमध्ये घडली दुर्घटना


यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) २८ फेब्रुवारीला यवतमाळ (Yavatmal) दौऱ्यावर येणार असून, त्यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र, तत्पूर्वी एक दुर्घटना घडली. या कार्यक्रमासाठी उभारण्यात येणारा सभामंडप आज कोसळला. यात ४ कामगार जखमी झाले आहेत. इतर कामगार सुदैवाने बचावले आहेत. जखमी कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यवतमाळ दौऱ्यासाठी भारी गावात ४५ एकर जागेवर मंडप उभारण्यात येत आहे. मात्र, त्यातील एक डोम उभा करण्याचे काम सुरू असतानाच पिलर जमिनीतून निखळला. त्यामुळे त्याचे खांब खाली क्रेनवर कोसळले. याठिकाणी काही कामगार देखील होते, परंतु कामगार सुदैवाने बचावले असून,चार जण जखमी झाले आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ फेब्रुवारीला यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात ते दोन लाखांहून अधिक बचत गटांच्या महिलांना संबोधीत करणार आहेत. या मेळाव्याची जय्यत तयारी केली जात असतानाच हा अपघात घडला. पंतप्रधान मोदी मागील काही दिवसांपासून सतत महाराष्ट्र राज्याचा दौरा करत असून, ते चौथ्यांदा यवतमाळ जिल्हाच्या दौऱ्यावर येत आहेत.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये