PM Narendra Modi : पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी उभारण्यात येणारा सभामंडप कोसळला!

  100

४ कामगार जखमी; यवतमाळमध्ये घडली दुर्घटना


यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) २८ फेब्रुवारीला यवतमाळ (Yavatmal) दौऱ्यावर येणार असून, त्यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र, तत्पूर्वी एक दुर्घटना घडली. या कार्यक्रमासाठी उभारण्यात येणारा सभामंडप आज कोसळला. यात ४ कामगार जखमी झाले आहेत. इतर कामगार सुदैवाने बचावले आहेत. जखमी कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यवतमाळ दौऱ्यासाठी भारी गावात ४५ एकर जागेवर मंडप उभारण्यात येत आहे. मात्र, त्यातील एक डोम उभा करण्याचे काम सुरू असतानाच पिलर जमिनीतून निखळला. त्यामुळे त्याचे खांब खाली क्रेनवर कोसळले. याठिकाणी काही कामगार देखील होते, परंतु कामगार सुदैवाने बचावले असून,चार जण जखमी झाले आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ फेब्रुवारीला यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात ते दोन लाखांहून अधिक बचत गटांच्या महिलांना संबोधीत करणार आहेत. या मेळाव्याची जय्यत तयारी केली जात असतानाच हा अपघात घडला. पंतप्रधान मोदी मागील काही दिवसांपासून सतत महाराष्ट्र राज्याचा दौरा करत असून, ते चौथ्यांदा यवतमाळ जिल्हाच्या दौऱ्यावर येत आहेत.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या