Konkan Shimgotsav : चाकरमान्यांका शिमग्याची खुशखबर! कशेडी घाटातील बोगद्याचा एकेरी मार्ग खुला

मुंबई : कोकणातील (Konkan) माणसं नोकरीच्या निमित्ताने मुंबईत राहत असली तरी सणासुदीच्या वेळी त्यांची पावलं आपोआप कोकणातील घराकडे वळतात. त्यातील गणपती (Ganpati) आणि शिमग्याच्या (Shimgotsav) वेळी तर हमखास चाकरमानी कोकणात दाखल झालेले पाहायला मिळतात. यावेळेस गाड्यांना गर्दीही फार असते. मात्र, यावेळी चाकरमान्यांसाठी एक खुशखबर आहे. कोकणात जाताना लागणाऱ्या कशेडी घाटातील बोगद्याचा (Kashedi tunnel) एकेरी मार्ग खुला करण्यात आला आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता आणखी सुखकर होणार आहे.


रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील खेडमधील कशेडी घाटातील बोगद्याचा कोकणात येण्यासाठीचा एकेरी मार्ग कालपासून सुरू करण्यात आला आहे. सद्यस्थितीत मुंबईकडे जाण्यासाठी कशेडी घाटाचाच वापर करावा लागत असला तरी, दुसऱ्या बोगद्यातील कामही अंतिम टप्प्यात आले असल्याने मार्चपर्यंत तो बोगदाही सुरू केला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने दिलेल्या या खुशखबरीमुळे शिमगोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.



दुतर्फा वाहतुकीसाठी बोगदा मार्च अखेरपर्यंत सुरु होणार


कशेडी बोगदा दुतर्फा वाहतुकीसाठी मार्च महिन्याच्या अखेरपर्यत खुला होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून प्रलंबित कामांना गती देण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील गणेशोत्सवात सुरू झालेल्या एकेरी मार्गिकेच्या वाहतुकीला अवघ्या १८ दिवसानंतर लागलेला ब्रेक आज मितीसही कायम असून बोगदा खुला होण्याची वाहन चालकांना प्रतीक्षा लागली आहे. मार्च अखेरपर्यंत बोगद्यातील दुतर्फा वाहतूक खुली होण्याचे संकेत मिळत आहेत.



चार वर्षांची प्रतीक्षा संपणार!


रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते २०१९ साली कंपनीने या बोगद्याच्या कामाला सुरुवात केली. जवळपास चार वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर आता बोगद्याचे काम आता पूर्णत्वास येत आहे. मागील काही वर्ष मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यातच डिसेंबर २०२४ ही चौपदरीकरण पूर्ण करण्याची डेडलाईन असून कंपनी ठेकेदार आणि संबंधित प्रशासन दिवस रात्र काम करून या मार्गावरील चौपदरीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी प्रयत्नशील आहेत.

Comments
Add Comment

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात