Konkan Shimgotsav : चाकरमान्यांका शिमग्याची खुशखबर! कशेडी घाटातील बोगद्याचा एकेरी मार्ग खुला

  244

मुंबई : कोकणातील (Konkan) माणसं नोकरीच्या निमित्ताने मुंबईत राहत असली तरी सणासुदीच्या वेळी त्यांची पावलं आपोआप कोकणातील घराकडे वळतात. त्यातील गणपती (Ganpati) आणि शिमग्याच्या (Shimgotsav) वेळी तर हमखास चाकरमानी कोकणात दाखल झालेले पाहायला मिळतात. यावेळेस गाड्यांना गर्दीही फार असते. मात्र, यावेळी चाकरमान्यांसाठी एक खुशखबर आहे. कोकणात जाताना लागणाऱ्या कशेडी घाटातील बोगद्याचा (Kashedi tunnel) एकेरी मार्ग खुला करण्यात आला आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता आणखी सुखकर होणार आहे.


रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील खेडमधील कशेडी घाटातील बोगद्याचा कोकणात येण्यासाठीचा एकेरी मार्ग कालपासून सुरू करण्यात आला आहे. सद्यस्थितीत मुंबईकडे जाण्यासाठी कशेडी घाटाचाच वापर करावा लागत असला तरी, दुसऱ्या बोगद्यातील कामही अंतिम टप्प्यात आले असल्याने मार्चपर्यंत तो बोगदाही सुरू केला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने दिलेल्या या खुशखबरीमुळे शिमगोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.



दुतर्फा वाहतुकीसाठी बोगदा मार्च अखेरपर्यंत सुरु होणार


कशेडी बोगदा दुतर्फा वाहतुकीसाठी मार्च महिन्याच्या अखेरपर्यत खुला होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून प्रलंबित कामांना गती देण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील गणेशोत्सवात सुरू झालेल्या एकेरी मार्गिकेच्या वाहतुकीला अवघ्या १८ दिवसानंतर लागलेला ब्रेक आज मितीसही कायम असून बोगदा खुला होण्याची वाहन चालकांना प्रतीक्षा लागली आहे. मार्च अखेरपर्यंत बोगद्यातील दुतर्फा वाहतूक खुली होण्याचे संकेत मिळत आहेत.



चार वर्षांची प्रतीक्षा संपणार!


रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते २०१९ साली कंपनीने या बोगद्याच्या कामाला सुरुवात केली. जवळपास चार वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर आता बोगद्याचे काम आता पूर्णत्वास येत आहे. मागील काही वर्ष मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यातच डिसेंबर २०२४ ही चौपदरीकरण पूर्ण करण्याची डेडलाईन असून कंपनी ठेकेदार आणि संबंधित प्रशासन दिवस रात्र काम करून या मार्गावरील चौपदरीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी प्रयत्नशील आहेत.

Comments
Add Comment

रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

माणगावमध्ये वाहतूककोंडी, ठिकठिकाणी पोलिस तैनात

मुंबईमधून गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली

गणपतीला कोकणात जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकांवर गर्दी

आज रविवार असल्याने गणपतीला कोकणात जाण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील विविध ठिकाणाहून

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल

खेड जवळील मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बसला भीषण आग, प्रवासी थोडक्यात बचावले

खेड मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळ रविवारी (दि. २४) पहाटे २.१० वाजता लक्झरी बसला भीषण आग लागल्याची घटना