Zeeshan Siddiqui : झिशान सिद्दीकी यांची मुंबई युथ काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी!

आता झिशान सिद्दीकी देखील घेणार काँग्रेस सोडण्याचा निर्णय?


मुंबई : मुंबईच्या वांद्रे परिसरातील मातब्बर नेत्यांपैकी एक असलेले बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांनी नुकताच काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Ajit Pawar NCP) प्रवेश केला. त्यांच्यासह त्यांचे पुत्र आणि राजकारणात प्रचंड सक्रिय असलेले झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddiqui) देखील काँग्रेस (Congress) सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, सध्या तसा कोणताही विचार नसल्याचे झिशान सिद्दीकी यांनी स्पष्ट केले होते.


असं असतानाही झिशान सिद्दीकी यांची मुंबई युथ काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्या जागी काँग्रसने अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता नाराज होऊन झिशान सिद्दीकी देखील काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतील, अशा चर्चा रंगल्या आहेत.


झिशान सिद्दीकी हे वांद्रे परिसरातील अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम या मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. झिशान हे महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांची अध्यक्षपदावरुन हकालपट्टी केल्याने आता ते नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


मागच्याच महिन्यात बाबा सिद्दीकींसह काँग्रेसच्या तीन महत्त्वपूर्ण नेत्यांनी महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला. मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. यानंतर आता झिशान सिद्दीकी यांनी देखील काँग्रेसला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला तर ऐन निवडणुकीच्या वेळी काँग्रेससाठी तो एक मोठा धक्का असेल.

Comments
Add Comment

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील

मुंबईत महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून केले अभिनंदन

राज्यभरातील २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीच अव्वल मुंबई : अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक ठरलेल्या मुंबई