Zeeshan Siddiqui : झिशान सिद्दीकी यांची मुंबई युथ काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी!

आता झिशान सिद्दीकी देखील घेणार काँग्रेस सोडण्याचा निर्णय?


मुंबई : मुंबईच्या वांद्रे परिसरातील मातब्बर नेत्यांपैकी एक असलेले बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांनी नुकताच काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Ajit Pawar NCP) प्रवेश केला. त्यांच्यासह त्यांचे पुत्र आणि राजकारणात प्रचंड सक्रिय असलेले झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddiqui) देखील काँग्रेस (Congress) सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, सध्या तसा कोणताही विचार नसल्याचे झिशान सिद्दीकी यांनी स्पष्ट केले होते.


असं असतानाही झिशान सिद्दीकी यांची मुंबई युथ काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्या जागी काँग्रसने अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता नाराज होऊन झिशान सिद्दीकी देखील काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतील, अशा चर्चा रंगल्या आहेत.


झिशान सिद्दीकी हे वांद्रे परिसरातील अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम या मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. झिशान हे महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांची अध्यक्षपदावरुन हकालपट्टी केल्याने आता ते नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


मागच्याच महिन्यात बाबा सिद्दीकींसह काँग्रेसच्या तीन महत्त्वपूर्ण नेत्यांनी महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला. मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. यानंतर आता झिशान सिद्दीकी यांनी देखील काँग्रेसला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला तर ऐन निवडणुकीच्या वेळी काँग्रेससाठी तो एक मोठा धक्का असेल.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.