Zeeshan Siddiqui : झिशान सिद्दीकी यांची मुंबई युथ काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी!

आता झिशान सिद्दीकी देखील घेणार काँग्रेस सोडण्याचा निर्णय?


मुंबई : मुंबईच्या वांद्रे परिसरातील मातब्बर नेत्यांपैकी एक असलेले बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांनी नुकताच काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Ajit Pawar NCP) प्रवेश केला. त्यांच्यासह त्यांचे पुत्र आणि राजकारणात प्रचंड सक्रिय असलेले झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddiqui) देखील काँग्रेस (Congress) सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, सध्या तसा कोणताही विचार नसल्याचे झिशान सिद्दीकी यांनी स्पष्ट केले होते.


असं असतानाही झिशान सिद्दीकी यांची मुंबई युथ काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्या जागी काँग्रसने अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता नाराज होऊन झिशान सिद्दीकी देखील काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतील, अशा चर्चा रंगल्या आहेत.


झिशान सिद्दीकी हे वांद्रे परिसरातील अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम या मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. झिशान हे महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांची अध्यक्षपदावरुन हकालपट्टी केल्याने आता ते नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


मागच्याच महिन्यात बाबा सिद्दीकींसह काँग्रेसच्या तीन महत्त्वपूर्ण नेत्यांनी महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला. मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. यानंतर आता झिशान सिद्दीकी यांनी देखील काँग्रेसला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला तर ऐन निवडणुकीच्या वेळी काँग्रेससाठी तो एक मोठा धक्का असेल.

Comments
Add Comment

गोरेगाव, सांताक्रूझ दरम्यान रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

'इंडिगो'ची सर्व उड्डाणे रद्द; प्रवाशांचे हाल, इतर विमानांचे दर दुप्पट

नवी दिल्ली : इंडिगो कंपनीने अचाकन आपल्या फ्लाईट रद्द केल्याने देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळाची अवस्था बस

वरळीत शिउबाठाची दादागिरी; भाजपच्या कामगार संघटनेचा फलक लावण्यास विरोध

मुंबई : विधानसभा निवडणुकीत वरळीची जागा कशीबशी जिंकलेल्या शिउबाठाला अद्याप राजकीय स्थितीचे भान आलेले दिसत नाही.

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या'

मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी