Ajit Pawar : काँग्रेसचे ७ तर शरद पवार गटाचे ५ आमदार अजितदादांच्या संपर्कात!

अमोल मिटकरींचा दावा; म्हणाले, युगेंद्र, जोगेंद्र कोणीही येऊ देत...


मुंबई : लोकसभा निवडणूक (Loksabha Election) जवळ आलेली असताना महाविकास आघाडी (MVA) मात्र अत्यंत दुबळी बनत चालली आहे. गेल्या काही दिवसांत मविआच्या अनेक बड्या बड्या नेत्यांनी महायुतीत (Mahayuti) सामील होण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे मविआ पार खिळखिळी झाली आहे. त्यातच आता मविआतील आणखी काही आमदार महायुतीच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला आहे. आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अनेक खुलासे केले.


अमोल मिटकरी म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होईल. काँग्रेस आणि शरद पवार गटाचे काही आमदार राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाच्या संपर्कात आहेत. काही आमदारांनी अजित पवारांची भेटही घेतली आहे. यामध्ये काँग्रेसच्या ७ तर शरद पवार गटाच्या ५ आमदारांचा समावेश आहे, असं मिटकरी म्हणाले.



युगेंद्र, जोगेंद्र कोणीही येऊ देत आम्हाला फरक पडत नाही : अमोल मिटकरी


अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र पवार (Yugendra Pawar) याने शरद पवारांना साथ देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आता पुन्हा काका-पुतण्याची जोडी राजकारणात काय खळबळ माजवणार याची चर्चा सुरु आहे. त्यावर भाष्य करताना अमोल मिटकरी यांनी युगेंद्र पवारांवर निशाणा साधला. ते म्हणाले, आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात कोणताही उमेदवार रिंगणात उतरवावा. पण त्याचा फायदा होणार नाही. अनिल तटकरे येऊ देत किंवा कोणी युगेंद्र-जोगेंद्र येऊ दे, आम्हाला फरक पडत नाही, असं अमोल मिटकरी म्हणाले.

Comments
Add Comment

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या