Ajit Pawar : काँग्रेसचे ७ तर शरद पवार गटाचे ५ आमदार अजितदादांच्या संपर्कात!

अमोल मिटकरींचा दावा; म्हणाले, युगेंद्र, जोगेंद्र कोणीही येऊ देत...


मुंबई : लोकसभा निवडणूक (Loksabha Election) जवळ आलेली असताना महाविकास आघाडी (MVA) मात्र अत्यंत दुबळी बनत चालली आहे. गेल्या काही दिवसांत मविआच्या अनेक बड्या बड्या नेत्यांनी महायुतीत (Mahayuti) सामील होण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे मविआ पार खिळखिळी झाली आहे. त्यातच आता मविआतील आणखी काही आमदार महायुतीच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला आहे. आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अनेक खुलासे केले.


अमोल मिटकरी म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होईल. काँग्रेस आणि शरद पवार गटाचे काही आमदार राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाच्या संपर्कात आहेत. काही आमदारांनी अजित पवारांची भेटही घेतली आहे. यामध्ये काँग्रेसच्या ७ तर शरद पवार गटाच्या ५ आमदारांचा समावेश आहे, असं मिटकरी म्हणाले.



युगेंद्र, जोगेंद्र कोणीही येऊ देत आम्हाला फरक पडत नाही : अमोल मिटकरी


अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र पवार (Yugendra Pawar) याने शरद पवारांना साथ देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आता पुन्हा काका-पुतण्याची जोडी राजकारणात काय खळबळ माजवणार याची चर्चा सुरु आहे. त्यावर भाष्य करताना अमोल मिटकरी यांनी युगेंद्र पवारांवर निशाणा साधला. ते म्हणाले, आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात कोणताही उमेदवार रिंगणात उतरवावा. पण त्याचा फायदा होणार नाही. अनिल तटकरे येऊ देत किंवा कोणी युगेंद्र-जोगेंद्र येऊ दे, आम्हाला फरक पडत नाही, असं अमोल मिटकरी म्हणाले.

Comments
Add Comment

मराठमोळ्या मुलीशी लग्न करुन आता पत्नीला बुरख्यातच ठेवतो; म्हणाल्या, पुरुष स्त्रियांकडे...

मुंबई: प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अदनान शेख सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४