Ajit Pawar : काँग्रेसचे ७ तर शरद पवार गटाचे ५ आमदार अजितदादांच्या संपर्कात!

Share

अमोल मिटकरींचा दावा; म्हणाले, युगेंद्र, जोगेंद्र कोणीही येऊ देत…

मुंबई : लोकसभा निवडणूक (Loksabha Election) जवळ आलेली असताना महाविकास आघाडी (MVA) मात्र अत्यंत दुबळी बनत चालली आहे. गेल्या काही दिवसांत मविआच्या अनेक बड्या बड्या नेत्यांनी महायुतीत (Mahayuti) सामील होण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे मविआ पार खिळखिळी झाली आहे. त्यातच आता मविआतील आणखी काही आमदार महायुतीच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला आहे. आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अनेक खुलासे केले.

अमोल मिटकरी म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होईल. काँग्रेस आणि शरद पवार गटाचे काही आमदार राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाच्या संपर्कात आहेत. काही आमदारांनी अजित पवारांची भेटही घेतली आहे. यामध्ये काँग्रेसच्या ७ तर शरद पवार गटाच्या ५ आमदारांचा समावेश आहे, असं मिटकरी म्हणाले.

युगेंद्र, जोगेंद्र कोणीही येऊ देत आम्हाला फरक पडत नाही : अमोल मिटकरी

अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र पवार (Yugendra Pawar) याने शरद पवारांना साथ देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आता पुन्हा काका-पुतण्याची जोडी राजकारणात काय खळबळ माजवणार याची चर्चा सुरु आहे. त्यावर भाष्य करताना अमोल मिटकरी यांनी युगेंद्र पवारांवर निशाणा साधला. ते म्हणाले, आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात कोणताही उमेदवार रिंगणात उतरवावा. पण त्याचा फायदा होणार नाही. अनिल तटकरे येऊ देत किंवा कोणी युगेंद्र-जोगेंद्र येऊ दे, आम्हाला फरक पडत नाही, असं अमोल मिटकरी म्हणाले.

Recent Posts

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

11 minutes ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

39 minutes ago

PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…

1 hour ago

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

6 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

7 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

7 hours ago