भारताच्या या ५ क्रिकेटर्सनी एकाच वेळी केली निवृत्तीची घोषणा

मुंबई: भारताचे हे ५ क्रिकेटर आता खेळाच्या मैदानावर खेळताना दिसणार नाहीत. या पाच खेळाडूंनी रणजी हंगामाच्या २०२३-३४च्या समापनासह क्रिकेटलाही अलविदा म्हणण्याचा निर्णय घेतला आहे. हे क्रिकेटर आहेत मनोज तिवारी, वरूण एरॉन, धवल कुलकर्णी, सौरभ तिवारी आणि फैज फजल. या खेळाडूंनी केवळ भारतासाठीच कोणत्या ना कोणत्या फॉरमॅटमध्ये प्रतिनिधित्व केले आहे तर डोमेस्टिक स्तरावरही त्यांनी चांगली कामगिरी केली आहे.


बंगालचा दिग्गज मनोज तिवारी, झारंखडचा फलंदाज सौरभ तिवारी आणि वेगवान गोलंदाज वरूण एरॉन, मुंबईचा धवल कुलकर्णी आणि विदर्भचा फैज फजल, यांनी निवृत्ती घेण्याची वेगवेगळी कारणे सांगितली आहेत. यात आयीएलसोबतचा करार नसणे तसेच राष्ट्रीय संघात जागा मिळण्याची आशा संपणे अशी आहेत.


वरूण एरॉन, मनोज तिवारी आणि फैज फजल यांनी त्याच मैदानावर अलविदा म्हटले जिथे त्यांनी आपल्या प्रवासाची सुरूवात केली होती ३८ वर्षीय मनोज तिवारीने सोमवारी बिहारविरुद्ध आपल्या संघाला विजय मिळवून देत अलविदा म्हटले. मनोज तिवारीने भारतासाठी १२ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे.


वेगवान गोलंदाज वरूण एरॉन तसेच सौरभ तिवारीयांनीही निवृत्तीची घोषणा केली आहे. सौरभ १७ वर्षे झारखंड संघाकडून खेळत आहे. त्याने भारतासाठी ३ वनडे सामने खेळले आहेत. तर वरूण एरॉन सातत्याने दुखापतग्रस्त होत असल्यामुळे तो चांगली कामगिरी करू शकत नाही. त्याने भारतासाठी ९ कसोटी आणि तितकेच वनडे सामने खेळलेत. फैज फजल विदर्भकडून खेळला आहे. त्याच्या नेतृत्वात विदर्भने २०१८मध्ये रणजी ट्रॉफी जिंकली होती. भारताकडून त्याने २०१६मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध केवळ एक वनडे सामना खेळला होता.


भारतासाठी १२ वनडे आणि २ टी-२० सामने खेळणारा धवल कुलकर्णीला आपल्या स्विंग मूव्हमेंट, तसेच जबरदस्त गोलंदाजीसाठी ओळखले जाते. मुंबईच्या या खेळाडूने १७ वर्षे डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली.

Comments
Add Comment

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील