मराठा आरक्षण, विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाकडे साऱ्यांचे लक्ष

मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावरील तोडग्यासाठी आज म्हणजेच मंगळवारी राज्य विधिमंडळाचे एकदिवसीय विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षण लागू करण्याबाबतचा कायदा करण्यात येणार आहे.


मराठा समाजास नोकरी तसेच शिक्षणामध्ये १० टक्के स्वतंत्र आरक्षण देणारे विधेयक मंजूर केले जाणार आहे. तसेच ओबीसीप्रमाणेच इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.


गेल्या आठवड्याभरापासून मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. २६ फेब्रुवारीपासून विधिमंडळाचे नियोजित अधिवेशन सुरू होणार आहे. मात्र त्यापूर्वीच मंगळवारी एकदिवसीय अधिवेशन बोलावण्यात आले आहे.


सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. त्यापूर्वी १० वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. नवीन वर्षातील हे पहिलेच अधिवेशन आहे त्यामुळे याची सुरूवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होईल.


राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांनी मराठा समाजाच्या मागासलेपणाबद्दलचा अहवाल सरकारला सादर केला आहे. याआधीही दोनदा मराठा आरक्षणाचा कायदा न्यायालयात टिकू शकला नव्हता. त्यामुळे हा कायदा टिकवण्याचे मोठे आव्हान महायुतीसमोर आहे.

Comments
Add Comment

Jalgaon Railway : रेल्वे प्रवाशांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली; ‘कोयंबतूर–जयपूर’ एसी एक्स्प्रेस पुन्हा धावणार; जळगावकरांना रेल्वेचा दिलासा

Jalgaon Railway : जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एसी

Dhule News : शिरपूर-चोपडा मार्गावर भीषण अपघात; दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Dhule News : धुळे जिल्ह्यातुन एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील शिरपूर-चोपडा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात

Tiranga Rally : भाजप प्रत्येक जिल्ह्यात काढणार 'तिरंगा रॅली'

- ९ ते १७ ऑगस्टदरम्यान आयोजन; १० ऑगस्टला मुंबईत २५ हजार तरुणांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार मुंबई :

Rickshaw-Taxi Driver : 15 ऑगस्टनंतर 'या' रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाईची शक्यता; मुदतवाढ मिळणार नाही

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाची

Ahilyanagar : शेततळ्यात बुडून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एक मन हेलावणारी घटना घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील बाहदराबाद

Pune News : हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक 100 हून अधिक NSG कमांडो, नेमकं काय आहे प्रकरण?

पुणे : पुण्यातील हिंजवडी आयटी (IT Park) पार्कमध्ये बुधवारी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आणि नॅशनल सिक्युरिटी