IND vs ENG: जडेजा, रोहितचे दमदार शतक, सर्फराजचे अर्धशतक, भारत पहिल्या दिवसअखेर ५ बाद ३२६

राजकोट: भारत(india) आणि इंग्लंड(england) यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने पहिल्या दिवसअखेर ५ बाद ३२६ धावा केल्या. रवींद्र जडेजाचे नाबाद शतक, कर्णधार रोहित शर्माची अर्धशतकी खेळी आणि सर्फराज खानचे पदार्पणातील अर्धशतक यांच्या जोरावर भारताने पहिल्या दिवशी तीनशेहून अधिक धावांचा टप्पा गाठला.


पहिल्या दिवसाच्या सुरूवातीलाच ३ बाद ३३ अशी अवस्था असताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी खेळपट्टीवर टिकून राहत भारताला मोठी धावसंख्या गाठून दिली. तब्बल २१८ दिवसांनी रोहित शर्माने कसोटीतील शतक ठोकले.


रोहितने १९६ चेंडूंचा सामना करताना १४ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने १३१ धावा तडकावल्या. रोहितने या सामन्यात षटकार ठोकण्याच्या बाबतीत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीलाही मागे टाकले.


त्याला रवींद्र जडेजाची जबरदस्त साथ लाभली. रवींद्र जडेजाने दिवसअखेर नाबाद ११० धावा केल्यात. या खेळीत जडेजाने आतापर्यंत ९ चौकार आणि २ षटकार ठोकलेत. यासोबतच सर्फराज खाननेही या पदार्पणाच्या सामन्यात ६२ धावांची तुफानी खेळी केली.


सर्फराज खानने ६६ बॉलमध्ये ९चौकार आणि १ षटकार लगावताना ६२ धावा ठोकल्या. त्याचे हे पहिलेच अर्धशतक आहे. भारताचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारत ५ बाद ३२६ धावांवर खेळत होता.


इंग्लंडकडून मार्कवूडने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर टॉम हार्टलेला एक बळी मिळवता आला. जेम्स अँडरसन आणि रेहान अहमद यांना एकही बळी मिळवण्यात यश मिळाले नाही.

Comments
Add Comment

FIFA WORLDCUP 2026 : कॅनडातील वणव्यांचा धूर आणि स्पेनच्या सराव सत्रावर परिणाम

कॅनडातील वणव्यांमुळे निर्माण झालेला विषारी धूर सध्या उत्तर अमेरिकेच्या अनेक भागांत पसरला आहे. या गंभीर हवामान

Football fever in Kolhapur : क्रिकेटच्या देशात फुटबॉलचा थरार; अर्जेंटिनाच्या विजयाने कोल्हापूर झाले 'फुटबॉलमय'!

Kolhapur : भारत हा तसा क्रिकेटवेडा देश, पण कोल्हापूरची गोष्टच न्यारी आहे! 'सॉकर सिटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या

FIFA WORLDCUP 2026 : अर्जेंटिनाच्या टीकाकारांना मेस्सीचे चोख उत्तर: 'आम्हाला काहीही आयते मिळालेले नाही'

लिओनेल मेस्सीने अर्जेंटिनाच्या विश्वचषक प्रवासावर टीका करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. "आम्हाला काहीही फुकट

Major Cricket League : एका सामन्यात ३ शतकं, ५१ सिक्स अन् ५३७ रन; क्रिकेटच्या इतिहासात लिहिला गेला नवा अध्याय

मुंबई : टी-२० क्रिकेटच्या इतिहासात असा सामना पाहायला मिळाला, ज्याने या फॉरमॅटमधील (Format) जवळपास सगळे मोठे विक्रम (Records)

ICC : वर्ल्ड कपमध्ये आयसीसीचा ‘मास्टर प्लॅन’? भारत-पाक सामन्यांसाठी मोठा बदल

मुंबई : क्रिकेट विश्वातील सर्वात चर्चेचा विषय ठरलेला भारत-पाकिस्तान सामना पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.

Rohit Sharma Retirement News : रोहित शर्माच्या निवृत्तीची चर्चा; इंग्लंडविरुद्धचा सामना ठरणार शेवटचा?

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज (Batsman) रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या वनडे (ODI)