Congress : काँग्रेसही फुटणार? महत्त्वाच्या बैठकीला १२ आमदारांची अनुपस्थिती

मुंबई : सध्या सर्वच राजकीय पक्ष (Political Parties) राज्यसभा (RajyaSabha) आणि लोकसभा निवडणुकींची (Loksabha Elections) तयारी करत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील सर्व सहा जागांवरील उमेदवार जाहीर झाले आहेत. काँग्रेसचा उमेदवार (Congress candidate) ठरवण्यासाठी काल विधानभवनात काँग्रेस आमदारांची महत्वाची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, एकूण आमदारांपैकी १२ आमदार बैठकीसाठी उपस्थित नसल्याने काँग्रेसमध्येही फोडाफोडीचा खेळ होणार का? याची चर्चा रंगली आहे.


नुकतीच काँग्रसेच्या मातब्बर नेत्यांपैकी एक असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रसेची अनेक वर्षांची साथ सोडली आणि भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यांच्याबरोबर मराठवाड्यातील काही आमदार देखील काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे. असं झालं तर लोकसभा निवडणुकीपूर्वी हा काँग्रेससाठी प्रचंड मोठा धक्का असणार आहे.


काँग्रसेच्या कालच्या बैठकीला केवळ २५ आमदार उपस्थित होते. राज्यसभेसाठी काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली. २०२२ मध्ये राज्यसभा निवडणुकीतही त्यांनाच उमेदवारी देण्यात आली होती, पण दगाफटका झाल्याने त्यांचा पराभव झाला होता.


दरम्यान, आज देखील काँग्रेस आमदारांची विधानभवनात सकाळी साडेनऊला बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीत, तरी सर्व काँग्रेस आमदार उपस्थित राहतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

Khopoli News : मुलाला शाळेत सोडलं अन्...; नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीवर दिवसाढवळ्या सपासप वार

खोपोली : रायगड जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक केंद्र असलेल्या खोपोली शहरात आज सकाळच्या सुमारास रक्ताचा थरार

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली