मुंबई : सध्या सर्वच राजकीय पक्ष (Political Parties) राज्यसभा (RajyaSabha) आणि लोकसभा निवडणुकींची (Loksabha Elections) तयारी करत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील सर्व सहा जागांवरील उमेदवार जाहीर झाले आहेत. काँग्रेसचा उमेदवार (Congress candidate) ठरवण्यासाठी काल विधानभवनात काँग्रेस आमदारांची महत्वाची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, एकूण आमदारांपैकी १२ आमदार बैठकीसाठी उपस्थित नसल्याने काँग्रेसमध्येही फोडाफोडीचा खेळ होणार का? याची चर्चा रंगली आहे.
नुकतीच काँग्रसेच्या मातब्बर नेत्यांपैकी एक असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रसेची अनेक वर्षांची साथ सोडली आणि भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यांच्याबरोबर मराठवाड्यातील काही आमदार देखील काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे. असं झालं तर लोकसभा निवडणुकीपूर्वी हा काँग्रेससाठी प्रचंड मोठा धक्का असणार आहे.
काँग्रसेच्या कालच्या बैठकीला केवळ २५ आमदार उपस्थित होते. राज्यसभेसाठी काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली. २०२२ मध्ये राज्यसभा निवडणुकीतही त्यांनाच उमेदवारी देण्यात आली होती, पण दगाफटका झाल्याने त्यांचा पराभव झाला होता.
दरम्यान, आज देखील काँग्रेस आमदारांची विधानभवनात सकाळी साडेनऊला बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीत, तरी सर्व काँग्रेस आमदार उपस्थित राहतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई : दहावी आणि बारावीच्या (SSC-HSC Exam) परीक्षेत अनुत्तीर्ण (Fail) झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर…
चिमुकल्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण सांगली : शालेय विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी शालेय पोषण आहार…
मुंबई : सध्या सातत्याने महागाई वाढत चालत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला…
मुंबई: जुलै महिन्याला सुरूवात झाली आहे. जुलै २०२४मध्ये ४ मोठे ग्रह शुक्र, बुध, मंगळ आणि…
मुंबई: भारतीय क्रिकेट संघ अद्याप बार्बाडोसमध्येच अडकला आहे. टीम इंडियाने बार्डाडोसमध्ये फायनल सामना जिंकत टी-२०…
मुंबई:रिलायन्स जिओचे प्लान आजपासून महाग होत आहेत. आता ग्राहकांना रिचार्ज कऱण्यासाठी आधीपेक्षा १२ ते २५…