Congress : काँग्रेसही फुटणार? महत्त्वाच्या बैठकीला १२ आमदारांची अनुपस्थिती

  539

मुंबई : सध्या सर्वच राजकीय पक्ष (Political Parties) राज्यसभा (RajyaSabha) आणि लोकसभा निवडणुकींची (Loksabha Elections) तयारी करत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील सर्व सहा जागांवरील उमेदवार जाहीर झाले आहेत. काँग्रेसचा उमेदवार (Congress candidate) ठरवण्यासाठी काल विधानभवनात काँग्रेस आमदारांची महत्वाची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, एकूण आमदारांपैकी १२ आमदार बैठकीसाठी उपस्थित नसल्याने काँग्रेसमध्येही फोडाफोडीचा खेळ होणार का? याची चर्चा रंगली आहे.


नुकतीच काँग्रसेच्या मातब्बर नेत्यांपैकी एक असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रसेची अनेक वर्षांची साथ सोडली आणि भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यांच्याबरोबर मराठवाड्यातील काही आमदार देखील काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे. असं झालं तर लोकसभा निवडणुकीपूर्वी हा काँग्रेससाठी प्रचंड मोठा धक्का असणार आहे.


काँग्रसेच्या कालच्या बैठकीला केवळ २५ आमदार उपस्थित होते. राज्यसभेसाठी काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली. २०२२ मध्ये राज्यसभा निवडणुकीतही त्यांनाच उमेदवारी देण्यात आली होती, पण दगाफटका झाल्याने त्यांचा पराभव झाला होता.


दरम्यान, आज देखील काँग्रेस आमदारांची विधानभवनात सकाळी साडेनऊला बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीत, तरी सर्व काँग्रेस आमदार उपस्थित राहतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून