Congress : काँग्रेसही फुटणार? महत्त्वाच्या बैठकीला १२ आमदारांची अनुपस्थिती

मुंबई : सध्या सर्वच राजकीय पक्ष (Political Parties) राज्यसभा (RajyaSabha) आणि लोकसभा निवडणुकींची (Loksabha Elections) तयारी करत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील सर्व सहा जागांवरील उमेदवार जाहीर झाले आहेत. काँग्रेसचा उमेदवार (Congress candidate) ठरवण्यासाठी काल विधानभवनात काँग्रेस आमदारांची महत्वाची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, एकूण आमदारांपैकी १२ आमदार बैठकीसाठी उपस्थित नसल्याने काँग्रेसमध्येही फोडाफोडीचा खेळ होणार का? याची चर्चा रंगली आहे.


नुकतीच काँग्रसेच्या मातब्बर नेत्यांपैकी एक असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रसेची अनेक वर्षांची साथ सोडली आणि भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यांच्याबरोबर मराठवाड्यातील काही आमदार देखील काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे. असं झालं तर लोकसभा निवडणुकीपूर्वी हा काँग्रेससाठी प्रचंड मोठा धक्का असणार आहे.


काँग्रसेच्या कालच्या बैठकीला केवळ २५ आमदार उपस्थित होते. राज्यसभेसाठी काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली. २०२२ मध्ये राज्यसभा निवडणुकीतही त्यांनाच उमेदवारी देण्यात आली होती, पण दगाफटका झाल्याने त्यांचा पराभव झाला होता.


दरम्यान, आज देखील काँग्रेस आमदारांची विधानभवनात सकाळी साडेनऊला बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीत, तरी सर्व काँग्रेस आमदार उपस्थित राहतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद