महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये काँग्रेसला झटका, वरिष्ठ नेत्यांनी धरला भाजपचा हात

मेहसाणा: लोकसभा निवडणुकीआधी साधारण प्रत्येक राज्यात काँग्रेस पक्षाला मोठमोठे झटके बसत आहेत. राज्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडल्याची बातमी अद्याप शांत झालेली नसतानाच काँग्रेससाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे.


गेल्या काही दिवसांपूर्वी आमदारपदाचा राजीनामा देणाऱ्या वरिष्ठ नेत्यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये या नेत्याला त्या परिसरातील संकटमोचक असे म्हटले जाते. प्रदेश भाजपा अध्यक्ष सीआर पाटील यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रामात माजी आमदार सीजे चावडा यांनी आपल्या समर्थकांसह औपचारिक पद्धतीने भाजपमध्ये प्रवेश केला.


गुजरातच्या बिजापूर येतून माजी आमदार चावडा यांनी १९ जानेवारी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. सीजे चावडा बिजापूर येथून काँग्रेसच्या तिकीटावर निवडून येत होते. त्यांनी राज्य काँग्रेसच्या विविध पदांवर काम केले आहे. २०१९मध्ये ते लोकसभा निवडणुकीत अमित शाह यांच्याविरोधात गांधीनगर मतदारसंघातून निवडणूक लढले होते. तेथे ते ५.५७ लाख अंतरांच्या मतांनी हरले होते.


बीजापूरमध्ये नाथालाल पटेल यांनीही काँग्रेसचा हात सोडला होता. ते म्हणाले की जनतेची सेवा कऱण्यासाठी ते भाजपमध्ये सामील होतील. त्यांना पंतप्रधान मोदींच्या विकास यात्रेचा भाग बनायचे आहे.
Comments
Add Comment

भटका कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्यास पीडित कुटुंबीयांना मिळणार ५ लाखांची भरपाई

गंभीर जखमींना ५ हजार रुपयांची आर्थिक मदत, सरकारचा मोठा निर्णय कर्नाटक : भटका कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्यास

'पाकिस्तानचा देशव्यापी घातपाताचा कट उधळला; दिल्ली स्फोटावर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

मुंबई : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत दहशतवादी हल्ला करुन अनेक निरपराध

हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवाद्यांच्या कारवायांना लागली घरघर, एकाचवेळी ३७ नक्षलवादी आले शरण

नवी दिल्ली : शरण या आणि नक्षलवाद्यांच्या भावी योजनांची तसेच तयारीची माहिती देऊन सरकारी योजनांचा लाभ घ्या अथवा

‘तिरुपती’च्या २० कोटी लाडूंसाठी वापरले ‘भेसळयुक्त’ तूप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): तिरुपती मंदिरात भेसळयुक्त तूप वापरून अंदाजे २० कोटी लाडू तयार करण्यात आले होते.

दिल्ली क्राईम ब्रँचची धडक कारवाई, आयएसआयशी संबंधित ४ आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करांना अटक

नवी दिल्ली: दिल्ली गुन्हे शाखेने पाकिस्तानी आयएसआयशी जोडलेल्या आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करीच्या टोळीतील चार

कोट्यावधींच्या सायबर फसवणुकीचा दिल्ली पोलिसांकडून पर्दाफाश; गुन्हेगारीचे मुळ उद्ध्वस्त करणाच्या हेतूने कारवाई

मुंबई : दिल्ली पोलिसांनी गेल्या ४८ तासांत मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हेगारीविरोधात मोहीम राबवत शेकडो फसवणूक