महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये काँग्रेसला झटका, वरिष्ठ नेत्यांनी धरला भाजपचा हात

मेहसाणा: लोकसभा निवडणुकीआधी साधारण प्रत्येक राज्यात काँग्रेस पक्षाला मोठमोठे झटके बसत आहेत. राज्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडल्याची बातमी अद्याप शांत झालेली नसतानाच काँग्रेससाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे.


गेल्या काही दिवसांपूर्वी आमदारपदाचा राजीनामा देणाऱ्या वरिष्ठ नेत्यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये या नेत्याला त्या परिसरातील संकटमोचक असे म्हटले जाते. प्रदेश भाजपा अध्यक्ष सीआर पाटील यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रामात माजी आमदार सीजे चावडा यांनी आपल्या समर्थकांसह औपचारिक पद्धतीने भाजपमध्ये प्रवेश केला.


गुजरातच्या बिजापूर येतून माजी आमदार चावडा यांनी १९ जानेवारी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. सीजे चावडा बिजापूर येथून काँग्रेसच्या तिकीटावर निवडून येत होते. त्यांनी राज्य काँग्रेसच्या विविध पदांवर काम केले आहे. २०१९मध्ये ते लोकसभा निवडणुकीत अमित शाह यांच्याविरोधात गांधीनगर मतदारसंघातून निवडणूक लढले होते. तेथे ते ५.५७ लाख अंतरांच्या मतांनी हरले होते.


बीजापूरमध्ये नाथालाल पटेल यांनीही काँग्रेसचा हात सोडला होता. ते म्हणाले की जनतेची सेवा कऱण्यासाठी ते भाजपमध्ये सामील होतील. त्यांना पंतप्रधान मोदींच्या विकास यात्रेचा भाग बनायचे आहे.
Comments
Add Comment

यंदाच्या दिवाळीत स्वदेशी वस्तूंची मागणी वाढली

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे केलेले आवाहन प्रभावी ठरत आहे. करवा चौथ, दिवाळी

करूर चेंगराचेंगरी प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाचा १३ ऑक्टोबरला निर्णय

चेन्नई : करूर येथील चेंगराचेंगरीच्या घटनेच्या स्वतंत्र चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर १३ ऑक्टोबर रोजी

सर्वसामान्यांसाठी नवा परवडणारा 5G स्मार्टफोन, सॅमसंग गॅलेक्सी M17 5G

सॅमसंग गॅलेक्सी M17 5G फक्त ₹12,499 पासून, दमदार फीचर्स आणि 6 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स  मुंबई : सॅमसंगने भारतात आपला

अतिरेक्यांना पकडण्याची ती पद्धत चुकली, चिदंबरम यांचे धक्कादायक वक्तव्य

नवी दिल्ली : अतिरेकी भिंद्रनवाला आणि समर्थक शस्त्रसाठा घेऊन शिखांच्या पवित्र सुवर्ण मंदिरात लपले होते. या

Diwali 2025 : Elite Marque कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली सलग ९ दिवसांची सुट्टी !

दिवाळीत ईमेल बंद ठेवा, मिठाई खा आणि निवांत झोपा – सीईओ रजत ग्रोवर यांचा सल्ला नवी दिल्ली : दिवाळीच्या सणाला बहुतेक

भारत - बांगलादेश सीमेवर बीएसएफची मोठी कारवाई, २० किलो सोनं जप्त !

नवी दिल्ली : भारत - बांगलादेश सीमेलगत वाढत्या तस्करीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीमा सुरक्षा दल (BSF) तैनात