Narayan Rane : ‘माझ्यावर टीका करतात, ठाकरेंनी सिंधुदुर्गसाठी काय केले ते सांगावे’

Share

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आवाहन

सिंधुनगरी : तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येतात व माझ्यावर टीका टिपणी करून जातात पण त्यांनी या जिल्ह्यासाठी काय केले! जिल्ह्याच्या विकासासाठी काय धोरण राबविले ते त्यांनी सांगावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिले आहे.

सिंधुनगरी येथील शरद कृषी भवनामध्ये केंद्रीय खादी ग्रामोद्योग मंत्रालयामार्फत नवउद्योजक व बचत गटांना मार्गदर्शन करणारी कार्यशाळा केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत शनिवारी झाली. त्यावेळी श्री. राणे बोलत होते.

कोकणी वैभव असलेला सिंधुदुर्ग जिल्हा काही वर्षांपूर्वी दरडोई उत्पन्नात फारच मागे होता. आताची परिस्थिती पाहता दरडोई उत्पन्नामध्ये सिंधुदुर्ग पुढे गेला आहे. जिल्ह्यातील एक तृतीयांश जमीन शेती बागायती खाली आहे. परंतु दोन तृतीयांश जमीन पडीक आहे. पडीक जमिनीचा वापर करून उद्योजकांनी केरळ, आसाम राज्यातील उद्योग व्यवसायाप्रमाणे उद्योग करावेत. स्वतःचे उत्पन्न वाढविताना येथील उद्योग व्यवसायाला चालना देऊन सिंधुदुर्ग जिल्हा श्रीमंत करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन या निमित्ताने नारायण राणे यांनी केले.

मी राजकारणात असलो तरी ९०च्या दशकापासून माझा सुरू केलेला साधा हॉटेल व्यवसाय आता पंचतारांकित हॉटेलपर्यंत पोचविला आहे. माझे स्वतःचे व्यवसाय सांभाळत असतानाही या जिल्ह्यातील नागरिकांनी मला प्रेम दिले, आदर केला. राजकारणात विविध पदावर काम करण्याची मला प्रेरणा दिली. याच कृतज्ञतेच्या भावनेतून पुण्या मुंबईसारख्या शहरात हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, इंजिनियर कॉलेज सुरु न करता या जिल्ह्यात सुरू करून जिल्ह्यातील नागरिकांना महत्त्वाच्या सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या.

आपण मुख्यमंत्री असताना या जिल्ह्यात एकाच वेळी २८ पुल निर्माण करून नागरिकांना मोठी सुविधा निर्माण केली होती. हा जिल्हा कायमचा टँकर मुक्त करण्यासाठी जिल्ह्यातील धरणांवर विशेष लक्ष देत ती कामे पूर्ण झाली व हा जिल्हा कायमचा टँकर मुक्त केला. हे या जिल्ह्यातील नागरिकांसाठी मी केलेले काम आहे, असेही नारायण राणे म्हणाले.

भाडोत्री माणसांकडून टीका म्हणजे मर्दानगी नव्हे

भास्कर जाधव सारखे भाडोत्री माणसे आणून टीका करणे म्हणजे मर्दानगी नव्हे! भास्कर जाधव जेव्हा निवडणुकीला उभे होते तेव्हा निवडणुकीसाठी माझ्याकडे पैसे मागितले व त्यावेळी मी त्यांना पंधरा लाख दिले. तेही त्यांनी मला परत न करता माझ्यावरच टीका करणे हे अति झाले आहे. त्याचा बंदोबस्त आपण करूच, असा इशाराही नारायण राणे यांनी दिला.

Tags: narayan rane

Recent Posts

कोकणातील माकडे व वानरांचे निर्बीजीकरण करणार!

निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…

32 minutes ago

६४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण सोडत जाहीर

गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…

44 minutes ago

SRH vs MI, IPL 2025: सनरायजर्स हैदराबादचे मुंबईला १४४ धावांचे आव्हान, क्लासेनची जबरदस्त खेळी

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स…

1 hour ago

पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार!

राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…

1 hour ago

IPL सामन्यात काळी पट्टी बांधून उतरले खेळाडू, चिअरलीडर्स गायब…पहलगाम हल्ल्यानंतर झाले हे बदल

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…

2 hours ago

अधिकाऱ्यांनी पूर्व परवानगीशिवाय कार्यालय सोडल्यास होणार निलंबनाची कारवाई

मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…

2 hours ago