Manoj Jarange Patil : साल्हेर किल्ल्याजवळ माझ्यासोबत घातपाताचा प्रकार

आजपासून पुन्हा बेमुदत उपोषण सुरु करताना मनोज जरांगेंनी सांगितला 'तो' प्रसंग


जालना : मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) सुरु असलेल्या आंदोलनाला महिने उलटले तरी समाधानकारक निर्णय हाती आलेला नाही. याबाबत राज्य सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारच्या अध्यादेशाचा मराठा समाजाला जोपर्यंत लाभ होत नाही तोपर्यंत उपोषण सुरु राहणार, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.


विशेष म्हणजे आपले उपोषण आता कठोर असणार असून, या काळात आपण ना पाणी घेणार, ना उपचार घेणार अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. मराठा समाजाला सरकारने दिलेल्या राजपत्रित अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर व्हावे यासाठी आपण उपोषण करत असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. याचवेळी बोलतांना जरांगे यांनी आपल्या अंगावर गाडी घालून, अपघात झाल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न झाला होता. पोलिसांनी त्या वाहनचालकाला ताब्यात देखील घेतले होते, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ओएसडी यांना माहिती दिली असल्याचे जरांगे म्हणाले आहेत.



मनोज जरांगेंनी सांगितला 'तो' घातपाताचा किस्सा


मनोज जरांगे म्हणाले की, 'आम्हाला भीती असून देखील आम्ही सांगत नाही. आमच्यासोबत ७ वेळा अशा घटना घडल्या, मात्र याबाबत आम्ही कुठेच जाही सांगत नाही. साल्हेर किल्ल्याजवळ आमच्या गाडीवर टेम्पो आला होता, पण आम्ही सरंक्षणाची मागणी केली नाही. तसेच आमच्यासोबत घातपाताचा प्रकार घडला म्हणून देखील कुठे सांगितले नाही', हे बोलताना जरांगेंचा रोख छगन भुजबळांकडे होता.


पुढे ते म्हणाले, आम्ही साल्हेर किल्ल्यावर गेलो होतो. सर्व गाड्या खाली लावण्यात येतात. मात्र, वरती अचानक कुठूनतरी एक पिकअप तिथे आले. मला त्यावेळी ते लक्षात आले नाही. पण दर्शन करत असतांना पोलीस लवकर चला म्हणून गरबड करत असल्याने मला शंका आली. त्यामुळे खाली काहीतरी घडलं असल्याचे मला जाणवले. पण पोलिसांनी नेमकं काय घडलं याबाबत मला कळूच दिले नाही. पण, पिकअप सारखी एक गाडीचे ब्रेक खराब झाले म्हणून जोरात वरून खाली आली. प्रचंड वेगाने आलेली ही गाडी आमच्या अंगावर आली असती तर आमचा भुगा झाला असता. पण एकाने जोराने आवाज दिल्याने लोकं उड्या मारून बाजूला पडले.


पोलिसांनी त्या गाडीच्या चालकाला पकडले असता, त्याने कोणाचातरी नवा घेऊन मला पिकअप घालण्याचे सांगण्यात आल्याचं म्हटले. हा सर्व प्रकार खरं आहे की खोटा आहे याबाबत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ओएसडीकडे केली असल्याचे जरांगे म्हणाले.

Comments
Add Comment

Fairness Cream : धक्कादायक! गोरं करणारी क्रीम ठरतेय धोकादायक; क्रीम वापरल्याने होतोय कायमचा किडणी किंवा गंभीर त्वचाविकार

- डॉक्टरांनी महत्वाची बातमी Fairness Cream : गोरं दिसण्याच्या हव्यासापोटी फेयरनेस क्रीमचा सर्रास वापर करणाऱ्यांसाठी

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ; ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

अमरावती : समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली  आहे. महामार्ग जेवढा सोईस्कर आणि सुखकर

Raigad Ropeway: रायगडावर जाणे होणार स्वस्त! रोपवेचे तिकीट ३५० रुपयांवरून ५०-१०० रुपयांपर्यंत कमी होणार

रायगड : किल्ले रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने रायगडावर नवीन रोपवे

Ketan Agrawal Murder Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट; लोहगडावर सिया गोयलकडून पोलिसांनी केले सीन रिक्रिएशन

पुणे : पुण्यातील (Pune) उद्योजक केतन अग्रवाल हत्या (Ketan Agrawal Murder) प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू असून पुणे ग्रामीण

Rajgad Accident : राजगडाच्या वाटेवर भीषण अपघात! पाबे घाटात मिनी बस २५ फूट दरीत कोसळली; दोन पर्यटकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

पुणे : किल्ले राजगड (Rajgad Fort) येथे पर्यटनासाठी (Tourism) निघालेल्या मुंबईतील अंधेरी येथील पर्यटकांच्या मिनी बसचा (Mini Bus) पुणे

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी