Ashadhi Wari : आषाढी वारीत 'संवाद वारी'द्वारे रोजगार हमी योजनेची जनजागृती; मंत्री भरत गोगावले यांचा सहभाग

पंढरपूर येथे आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो वारकऱ्यांपर्यंत केंद्र सरकारच्या व्ही.बी.जी. रामजी – विकसित भारत रोजगार हमी योजनेची माहिती पोहोचवण्यासाठी रोजगार हमी विभागाकडून 'संवाद वारी' अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत वाखरी येथे चित्ररथ, पथनाट्य आणि पोवाड्याच्या माध्यमातून योजनेची माहिती देण्यात आली. या उपक्रमाला राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत शेठ गोगावले यांनी भेट देत कलाकार आणि विभागाच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. (Ashadhi Wari)



यावेळी मंत्री गोगावले यांनी पथनाट्याचा प्रयोग पाहिला, कलाकारांचा सत्कार केला आणि त्यांच्या जनजागृतीच्या कार्याचे अभिनंदन केले. त्यानंतर त्यांनी वारीतील वारकऱ्यांना स्वतः माहितीपत्रके वाटून रोजगार हमी योजनेबाबत माहिती दिली. (Bharat Gogawale)

माध्यमांशी बोलताना मंत्री गोगावले म्हणाले की, विकसित भारत 2047 या संकल्पनेत ग्रामीण विकास, रोजगारनिर्मिती आणि शाश्वत विकासाला महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचवण्यासाठी संवाद वारी अभियान सुरू करण्यात आले आहे. पुण्यापासून सुरू झालेला हा जनजागृतीचा प्रवास गेल्या 13 ते 14 दिवसांपासून विविध ठिकाणी सुरू असून आता तो पंढरपूर परिसरात पोहोचला आहे. (Padharpur)





मंत्री गोगावले यांनी सांगितले की, पूर्वीच्या रोजगार हमी योजनेचे रूपांतर आता व्ही.बी.जी. रामजी – विकसित भारत रोजगार हमी योजनेत करण्यात आले आहे. या योजनेत रोजगाराचे दिवस 100 वरून 125 करण्यात आले असून कामांची संख्या 266 वरून 318 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच मजुरीचा दर 317 रुपये करण्यात आला असून तो आणखी वाढविण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.

'काम केल्यानंतर लगेच दाम' हे या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य असल्याचे सांगत त्यांनी वेळेत मजुरी, शाश्वत रोजगार, वैयक्तिक लाभाच्या योजना आणि ग्रामीण विकासाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट केले. रोजगार उपलब्ध न झाल्यास बेरोजगार भत्त्याचीही तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच घरकुल योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. ( Employment Guarantee Scheme)

या कार्यक्रमाला पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके, उपजिल्हाधिकारी अंजली मरुड, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत मोरे, अतुल राजुरकर तसेच रोजगार हमी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

 
Comments
Add Comment

Sukhbir Singh Badal Attack : धक्कादायक! नांदेडमध्ये पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला; सुरक्षा कर्मचारीही जखमी

नांदेड : शिरोमणी अकाली दलाचे  (Shiromani Akali Dal) राष्ट्रीय अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल (Sukhbir Singh

Moshi Building Collapse : मोशी दुर्घटनेत पतीचा मृत्यू; महिन्याभरात पत्नीसोबत घडला असा प्रकार...

पिंपरी-चिंचवड : मोशी कचरा डेपो दुर्घटनेत (Pune Moshi) पतीचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या महिन्याभरात 23 वर्षीय पत्नीने गळफास

Crime News : धुळे जिल्हा परिषदेचा फिटर खासगी एजंटसह जळगाव एसीबीच्या जाळ्यात

Crime News : जळगाव एसीबीकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षकांची सुरक्षा रक्षक मंडळात नोंदणी करण्यासह

Nagpur Accident News : नागपुरात भीषण अपघात; ट्रकची कारला धडक, 11वीच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

नागपूर : नागपूरच्या कलमाना परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात 11वीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा

Jalgaon Crime News : खाऊचे आमिष अन् अल्पवयीन मुलीवर वर्षभर अत्याचार ; चार संशयितांना अटक

Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून

Ahilyanagar : हृदयद्रावक ! भीषण अपघातात उद्योजकासह दोघांचा जागीच मृत्यू ; परिसरात हळहळ

Ahilyanagar : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर शिरूर बायपासजवळ मंगळवारी भीषण अपघाताची घटना घडली. मंगळवारी सायंकाळी कंटेनर,