Sameer Wankhede : ‘ईडी’कडून मनी लाँड्रिंगप्रकरणी वानखेडेंविरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली : एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) आता ईडीच्या रडारवर आले आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगानेच ईडीने हा गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने वानखेडे आणि इतरांविरुद्ध कार्डिलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणी भ्रष्टाचार आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला होता.


बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ऑक्टोबर २०२१ मध्ये अमली पदार्थ प्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र कालांतराने त्याला क्लीन चीट देण्यात आली होती. या प्रकरणानंतर वानखेडे यांच्यावर मात्र अनेक आरोप केले जात होते.





याप्रकरणी समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयने मागील वर्षी मे महिन्यात गु्न्हा दाखल केला होता. त्यानंतर आता ईडीनेही गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर समन्स पाठवून त्यांना चौकशीसाठीही बोलवण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे. ईडीच्या या कारवाईविरोधात समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे समजते.


कॉर्डेलिया क्रूज शिपवर रेव्ह पार्टी सुरू असताना तिथे अंमली पदार्थ असल्याची माहिती वानखेडेंच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून त्यांनी या शिपवर धाड टाकली होती. ऑक्टोबर २०२१ मध्ये कार्डिलिया क्रूजवर छापा टाकला गेला त्यावेळी समीर वानखेडे मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) मध्ये झोनल डायरेक्टर या पदावर कार्यरत होते. यावेळी आर्यन खान याला ड्रग्स प्रकरणातून मुक्त करण्यासाठी त्यांनी शाहरुख खानकडे लाच मागितल्याचा आरोप असून समीर वानखेडे यांच्यासह आणखी चार जणांवर ठपका ठेवण्यात आला होता.


सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआर प्रकरणात समीर वानखेडे यांची आधीच चौकशी झाली आहे. वानखेडे यांनी सीबीआयचे आरोप फेटाळून लावले होते. सीबीआयकडून कारवाई न होण्याबाबत याअगोदरच उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांना दिलासा दिलेला आहे. मात्र आता ते ईडीच्या रडारवर आले आहेत.

Comments
Add Comment

महावितरणचा 'आयपीओ' येणार - उत्पन्न वाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी केली सूचना; 'कॉर्पोरेट गव्हर्नन्स' चा अंमल करणार

मुंबई : ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या बाजारपेठेचा लाभ उठवित महावितरणने आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) आणत

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :