Sameer Wankhede : ‘ईडी’कडून मनी लाँड्रिंगप्रकरणी वानखेडेंविरोधात गुन्हा दाखल

  146

नवी दिल्ली : एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) आता ईडीच्या रडारवर आले आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगानेच ईडीने हा गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने वानखेडे आणि इतरांविरुद्ध कार्डिलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणी भ्रष्टाचार आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला होता.


बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ऑक्टोबर २०२१ मध्ये अमली पदार्थ प्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र कालांतराने त्याला क्लीन चीट देण्यात आली होती. या प्रकरणानंतर वानखेडे यांच्यावर मात्र अनेक आरोप केले जात होते.





याप्रकरणी समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयने मागील वर्षी मे महिन्यात गु्न्हा दाखल केला होता. त्यानंतर आता ईडीनेही गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर समन्स पाठवून त्यांना चौकशीसाठीही बोलवण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे. ईडीच्या या कारवाईविरोधात समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे समजते.


कॉर्डेलिया क्रूज शिपवर रेव्ह पार्टी सुरू असताना तिथे अंमली पदार्थ असल्याची माहिती वानखेडेंच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून त्यांनी या शिपवर धाड टाकली होती. ऑक्टोबर २०२१ मध्ये कार्डिलिया क्रूजवर छापा टाकला गेला त्यावेळी समीर वानखेडे मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) मध्ये झोनल डायरेक्टर या पदावर कार्यरत होते. यावेळी आर्यन खान याला ड्रग्स प्रकरणातून मुक्त करण्यासाठी त्यांनी शाहरुख खानकडे लाच मागितल्याचा आरोप असून समीर वानखेडे यांच्यासह आणखी चार जणांवर ठपका ठेवण्यात आला होता.


सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआर प्रकरणात समीर वानखेडे यांची आधीच चौकशी झाली आहे. वानखेडे यांनी सीबीआयचे आरोप फेटाळून लावले होते. सीबीआयकडून कारवाई न होण्याबाबत याअगोदरच उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांना दिलासा दिलेला आहे. मात्र आता ते ईडीच्या रडारवर आले आहेत.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.