PM Modi: दिवसभरात केवळ ३.३० तास झोपतात पीएम मोदी, संध्याकाळी ६ नंतर जेवण नाही, लंचदरम्यान केला खुलासा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(pm narendra modi) शुक्रवारी नव्या संसद भवनाच्या कँटीनमध्ये विविध खासदारांसह दुपारचे जेवण केले. या दरम्यान पंतप्रधान मोदींनी खासदारांसह आपले अनुभव शेअर केले.


पंतप्रधान मोदींसोबत लंच करणारे खासदार आणि केंद्रीय मंत्री एल मुरूगन यांनी यादरम्यान दावा केला. त्यांनी मीडियाशी बोलताना मुरुगन म्हणाले, आजचा दिवस स्पेशल ठरला. आठ खासदारांना पंतप्रधान मोदींसोबत लंच करण्याची संधी मिळाली. हे खासदार विविध पक्षांचे होते. या दरम्यान पंतप्रधान मोदींनी आपल्या दिनचर्येबद्दल सांगितले की ते केवळ ३.३० तास झोपतात.


एल मुरूगन पुढे म्हणाले की पंतप्रधान मोदींनी सांगितले की ते संध्याकाळी ६ नंतर जेवण करत नाही. आमच्या जेवणात पनीरची भाजी, डाळ, भात, खिचडी आणि तिळाची मिठाई होती. लंचनंतर पंतप्रधान मोदींनी बिल दिले.


 


खरंतर, पंतप्रधान मोदींसोबत लंच करणाऱ्यांमध्ये बिजू जनता दलाचे सस्मित पात्रा, रिव्हॉल्यूशनरी सोशलिस्ट पार्टीचे एनके प्रेमचंद्रन, तेलुगु देशम पार्टीचे राम मोहन नायडू, बहुजन समाज पार्टीचे रितेश पांडे आणि हीना गावितसह भाजपच्या काही नेत्यांसोबत दुपारचे जेवण केले.



काय म्हणाले पंतप्रधान मोदी?


पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले, दुपारी शानदार जेवणाचा आनंद घेतला. विविध पक्ष आणि भारताच्या विविध भागांतील खासदारांनी हे आणखी खास बनवले. त्यांना धन्यवाद..


पंतप्रधान मोदींनी यासोबत लंचदरम्यानचे काही फोटोही शेअर केले. संसदेचे हिवाळी अधिवेशन सत्र शनिवारी संपत आहे. एप्रिल मेमध्ये संभाव्य लोकसभा निवडणुकीच्या आधी संसदेचे हे शेवटचे अधिवेशन आहे.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च