PM Modi: दिवसभरात केवळ ३.३० तास झोपतात पीएम मोदी, संध्याकाळी ६ नंतर जेवण नाही, लंचदरम्यान केला खुलासा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(pm narendra modi) शुक्रवारी नव्या संसद भवनाच्या कँटीनमध्ये विविध खासदारांसह दुपारचे जेवण केले. या दरम्यान पंतप्रधान मोदींनी खासदारांसह आपले अनुभव शेअर केले.


पंतप्रधान मोदींसोबत लंच करणारे खासदार आणि केंद्रीय मंत्री एल मुरूगन यांनी यादरम्यान दावा केला. त्यांनी मीडियाशी बोलताना मुरुगन म्हणाले, आजचा दिवस स्पेशल ठरला. आठ खासदारांना पंतप्रधान मोदींसोबत लंच करण्याची संधी मिळाली. हे खासदार विविध पक्षांचे होते. या दरम्यान पंतप्रधान मोदींनी आपल्या दिनचर्येबद्दल सांगितले की ते केवळ ३.३० तास झोपतात.


एल मुरूगन पुढे म्हणाले की पंतप्रधान मोदींनी सांगितले की ते संध्याकाळी ६ नंतर जेवण करत नाही. आमच्या जेवणात पनीरची भाजी, डाळ, भात, खिचडी आणि तिळाची मिठाई होती. लंचनंतर पंतप्रधान मोदींनी बिल दिले.


 


खरंतर, पंतप्रधान मोदींसोबत लंच करणाऱ्यांमध्ये बिजू जनता दलाचे सस्मित पात्रा, रिव्हॉल्यूशनरी सोशलिस्ट पार्टीचे एनके प्रेमचंद्रन, तेलुगु देशम पार्टीचे राम मोहन नायडू, बहुजन समाज पार्टीचे रितेश पांडे आणि हीना गावितसह भाजपच्या काही नेत्यांसोबत दुपारचे जेवण केले.



काय म्हणाले पंतप्रधान मोदी?


पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले, दुपारी शानदार जेवणाचा आनंद घेतला. विविध पक्ष आणि भारताच्या विविध भागांतील खासदारांनी हे आणखी खास बनवले. त्यांना धन्यवाद..


पंतप्रधान मोदींनी यासोबत लंचदरम्यानचे काही फोटोही शेअर केले. संसदेचे हिवाळी अधिवेशन सत्र शनिवारी संपत आहे. एप्रिल मेमध्ये संभाव्य लोकसभा निवडणुकीच्या आधी संसदेचे हे शेवटचे अधिवेशन आहे.

Comments
Add Comment

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या

सीमा सुरक्षा दल राबवणार 'ऑपरेशन सर्द हवा', घुसखोरांना दिसताक्षणी ठार करणार

श्रीनगर : सीमा सुरक्षा दल (Border Security Force / BSF) सीमेवर जम्मू काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सर्द हवा' आणि राजस्थानमध्ये 'ऑपरेशन कोल्ड