PM Modi: दिवसभरात केवळ ३.३० तास झोपतात पीएम मोदी, संध्याकाळी ६ नंतर जेवण नाही, लंचदरम्यान केला खुलासा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(pm narendra modi) शुक्रवारी नव्या संसद भवनाच्या कँटीनमध्ये विविध खासदारांसह दुपारचे जेवण केले. या दरम्यान पंतप्रधान मोदींनी खासदारांसह आपले अनुभव शेअर केले.


पंतप्रधान मोदींसोबत लंच करणारे खासदार आणि केंद्रीय मंत्री एल मुरूगन यांनी यादरम्यान दावा केला. त्यांनी मीडियाशी बोलताना मुरुगन म्हणाले, आजचा दिवस स्पेशल ठरला. आठ खासदारांना पंतप्रधान मोदींसोबत लंच करण्याची संधी मिळाली. हे खासदार विविध पक्षांचे होते. या दरम्यान पंतप्रधान मोदींनी आपल्या दिनचर्येबद्दल सांगितले की ते केवळ ३.३० तास झोपतात.


एल मुरूगन पुढे म्हणाले की पंतप्रधान मोदींनी सांगितले की ते संध्याकाळी ६ नंतर जेवण करत नाही. आमच्या जेवणात पनीरची भाजी, डाळ, भात, खिचडी आणि तिळाची मिठाई होती. लंचनंतर पंतप्रधान मोदींनी बिल दिले.


 


खरंतर, पंतप्रधान मोदींसोबत लंच करणाऱ्यांमध्ये बिजू जनता दलाचे सस्मित पात्रा, रिव्हॉल्यूशनरी सोशलिस्ट पार्टीचे एनके प्रेमचंद्रन, तेलुगु देशम पार्टीचे राम मोहन नायडू, बहुजन समाज पार्टीचे रितेश पांडे आणि हीना गावितसह भाजपच्या काही नेत्यांसोबत दुपारचे जेवण केले.



काय म्हणाले पंतप्रधान मोदी?


पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले, दुपारी शानदार जेवणाचा आनंद घेतला. विविध पक्ष आणि भारताच्या विविध भागांतील खासदारांनी हे आणखी खास बनवले. त्यांना धन्यवाद..


पंतप्रधान मोदींनी यासोबत लंचदरम्यानचे काही फोटोही शेअर केले. संसदेचे हिवाळी अधिवेशन सत्र शनिवारी संपत आहे. एप्रिल मेमध्ये संभाव्य लोकसभा निवडणुकीच्या आधी संसदेचे हे शेवटचे अधिवेशन आहे.

Comments
Add Comment

जयपूर SMS हॉस्पिटलच्या ICU मध्ये भीषण आग, ६ रुग्णांचा मृत्यू

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूर येथील सवाई मानसिंह (SMS) हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरच्या न्यूरो आयसीयू (ICU)

दार्जिलिंगमध्ये भूस्खलनाने हाहाकार; २३ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उत्तर बंगालच्या दौऱ्यावर

दार्जिलिंग: पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या भीषण

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन