Rajyasabha Election : राज्यसभेसाठी भाजपकडून 'या' नेत्यांची नावे पोहोचली दिल्लीत!

  208

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावाचाही समावेश


कोणाच्या गळ्यात पडणार उमेदवारीची माळ?


मुंबई : लोकसभा निवडणुकींसाठी (Loksabha Election) राजकीय पक्ष (Political Parties) कामाला लागले असतानाच राज्यसभा निवडणुकाही (Rajyasabha Election) समोर येऊन ठाकल्या आहेत. येत्या २७ फेब्रुवारी रोजी राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार असून, यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील पाच जागा महायुतीच्या (Mahayuti) वाट्याला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पाच जागांपैकी तीन जागा भाजपच्या (BJP) वाट्याला येणार आहेत.


भाजपकडून राज्यसभेसाठी ९ उमेदवारांच्या नावाची यादी समोर आली आहे. ही यादी दिल्लीला पाठवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातून भाजपकडून राज्यसभेसाठी कुणाला उमेदवारी मिळणार याचा अंतिम निर्णय दिल्लीत होणार आहे.


भाजपकडून दिल्लीला पाठवण्यात आलेल्या यादीत नारायण राणे (Narayan Rane), विनोद तावडे, पंकजा मुंडे (Pankaja Munde), विजया राहटकर, अमरीश पटेल, माधव भंडारी, चित्रा वाघ (Chitra Wagh), हर्षवर्धन पाटील आणि संजय उपाध्याय यांची नावे आहेत. त्यामुळे या नऊ नेत्यांपैकी कोणाच्या गळ्यात राज्यसभेच्या उमेदवारीची माळ पडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती