Rajyasabha Election : राज्यसभेसाठी भाजपकडून 'या' नेत्यांची नावे पोहोचली दिल्लीत!

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावाचाही समावेश


कोणाच्या गळ्यात पडणार उमेदवारीची माळ?


मुंबई : लोकसभा निवडणुकींसाठी (Loksabha Election) राजकीय पक्ष (Political Parties) कामाला लागले असतानाच राज्यसभा निवडणुकाही (Rajyasabha Election) समोर येऊन ठाकल्या आहेत. येत्या २७ फेब्रुवारी रोजी राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार असून, यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील पाच जागा महायुतीच्या (Mahayuti) वाट्याला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पाच जागांपैकी तीन जागा भाजपच्या (BJP) वाट्याला येणार आहेत.


भाजपकडून राज्यसभेसाठी ९ उमेदवारांच्या नावाची यादी समोर आली आहे. ही यादी दिल्लीला पाठवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातून भाजपकडून राज्यसभेसाठी कुणाला उमेदवारी मिळणार याचा अंतिम निर्णय दिल्लीत होणार आहे.


भाजपकडून दिल्लीला पाठवण्यात आलेल्या यादीत नारायण राणे (Narayan Rane), विनोद तावडे, पंकजा मुंडे (Pankaja Munde), विजया राहटकर, अमरीश पटेल, माधव भंडारी, चित्रा वाघ (Chitra Wagh), हर्षवर्धन पाटील आणि संजय उपाध्याय यांची नावे आहेत. त्यामुळे या नऊ नेत्यांपैकी कोणाच्या गळ्यात राज्यसभेच्या उमेदवारीची माळ पडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या