Mumbai-Goa Highway : सावित्री पुलावर टायर फुटून बसला भीषण आग; सुदैवाने जिवीत हानी नाही

Share

महाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Goa Highway) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी (Ratnagiri) येथून मुंबईकडे (Mumbai) जाणाऱ्या औदुंबर छाया ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसने अचानक पेट घेतला. बसच्या उजव्या बाजूकडील मागील टायर फुटून आग लागल्याने संपूर्ण गाडी जळून खाक झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान चालकाने प्रसंगावधान राखून गाडीतील १९ प्रवासी व अन्य कर्मचारी मॅनेजरना सुखरूप बाहेर काढले. दरम्यान या घटनेची माहिती समजताच महाड एमआयडीसी पोलीस ठाणे तसेच एमआयडीसी फायर स्टेशनने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळविले.

याचवेळी या संबंधित कंपनीची रत्नागिरीकडे जाणारी बस या मार्गावर असताना त्या गाडीतून परतीच्या प्रवासासाठी अपघातग्रस्त गाडीतील प्रवाशांना पोलिसांनी बसवून मुंबईला पाठवल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी मारुती आंधळे यांनी दिली.

सुमारे सात वर्षांपूर्वी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावित्री नदीवरील पूल कोसळल्याने झालेल्या दुर्दैवी अपघातामध्ये ४० पेक्षा जास्त प्रवाशांना प्राण गमवावे लागले होते. काल मध्यरात्री झालेल्या या अपघातानंतर सात वर्षांपूर्वीच्या या कटू आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. या अपघाताच्या घटनेमुळे सावित्री पूल पुन्हा एकदा चर्चेमध्ये आला.

Recent Posts

Mithun Chakraborty : “पश्चिम बंगाल हातून निसटोय”- मिथुन चक्रवर्ती

कोलकाता : वक्फ दुरुस्ती विधेयकावरून पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचारावर भाजप नेते आणि सुप्रसिद्धी अभिनेता मिथुन…

8 minutes ago

Nashik News : नाशिककरांची उन्हाच्या चटक्यांमुळे सिग्नलवर थांबण्याची दमछाक!

नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…

2 hours ago

Amruta Khanvilkar: आलेच मी…’, या सईच्या गाण्यावर अमृता खानविलकर थिरकली!

नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…

2 hours ago

Beed : बीडचा पाणी प्रश्न सोडवणार, गहिनीनाथ गडाला तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…

2 hours ago

Cold Water Benefits : थंड पाण्याने चेहरा धुतल्यास होतील ‘हे’ फायदे!

निरोगी त्वचा असणे ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र, निरोगी आणि सुंदर दिसणाऱ्या त्वचेची योग्य काळजी…

3 hours ago

Pune News : स्मार्ट पुण्यात बनावट कपड्यांचा सुळसुळाट!

पुणे : चितळे प्रकरण ताजे असतानाच पुण्यामध्ये ब्रँडेड कंपन्यांच्या नावे बनावट कपडे विकल्याची माहिती समोर…

3 hours ago