Mahesh Manjrekar : महेश मांजरेकरांच्या नव्या चित्रपटात झळकणार श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले

काय आहे चित्रपटाचे नाव?


मुंबई : काही दिवसांपूर्वी सौम्य हृदयविकाराचा (Mild heart attack) आल्याने प्रचंड चर्चेत आलेला प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आता कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या आगामी सिनेमात तो प्रमुख भूमिका साकारणार आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ (Hi Anokhi gath) या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. यात श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले (Gauri Ingavale) यांच्या प्रमुख भूमिका असून या चित्रपटाची कथा, पटकथा महेश मांजरेकर यांची आहे.


गौरी इंगवलेने याआधीही महेश मांजरेकरांच्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तिचा 'पांघरुण' हा चित्रपट गाजला होता. शिवाय तिने 'कुटुंब' चित्रपटात देखील मुख्य भूमिका साकारली होती. यानंतर ती आता ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटात झळकणार आहे. ‘ही अनोखी गाठ’ च्या निमित्ताने महेश मांजरेकर आणि श्रेयस तळपदे ही जोडी पहिल्यांदा एकत्र येत आहेत.





दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणतात, ‘झी स्टुडिओजसोबत याआधीही अनेकदा काम केले असून पुन्हा एकदा नवा चित्रपट घेऊन आलो आहे. श्रेयस आणि गौरी यांची केमिस्ट्री पाहणं औस्तुक्याचे ठरेल. हळूहळू चित्रपटातील गोष्टी समोर येतीलच.’’


झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी म्हणतात, “झी स्टुडिओज नेहमीच प्रेक्षकांसाठी दर्जेदार चित्रपट घेऊन येते. झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर हे एक समीकरण झालं आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी एक आगळीवेगळी प्रेमकहाणी घेऊन येण्यास आम्ही सज्ज झालो आहोत.” चित्रपटाचे संवाद गणेश मतकरी यांचे आहेत. हा चित्रपट १ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये