Tata Group : परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी टाटा समूह पुढे सरसावला

  127

'इतक्या' लाखांपर्यंत देणार शैक्षणिक कर्ज


मुंबई : अनेक विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण (Foreign education) घेण्याची इच्छा व कुवत असूनही आर्थिक समस्यांमुळे (Financial Problemes) परदेशात जाणे शक्य होत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी टाटा समूह (Tata Group) पुढे सरसावला आहे. टाटा समूहातील प्रमुख आर्थिक सेवा कंपनी, टाटा कॅपिटल लि.ने देशात आणि परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शंभर टक्के कर्ज देणारी शैक्षणिक कर्ज योजना (Educational Loan Scheme) दाखल केली आहे.


भारतासह अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जर्मनी, सिंगापूर आणि दुबईमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित, व्यवस्थापन व व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये पदवी, पदव्यूत्तर शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे कर्ज मिळणार आहे. विद्यार्थ्यांना ७५ लाख रुपयांपर्यंतचे तारण मुक्त कर्ज आणि दोन कोटी रुपयांपर्यंतचे सुरक्षित कर्ज किंवा शिक्षणासाठीच्या संपूर्ण खर्चाची रक्कम कर्जरुपाने मिळेल.


टाटा कॅपिटल विद्यार्थ्यांना प्रवेश-पूर्व मंजुरी पत्र देणार आहे, त्यामुळे त्यांना प्रवेश सुरक्षित करण्यासाठी आपली अर्ज प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात मदत मिळेल. स्पर्धात्मक व्याजदरांव्यतिरिक्त टाटा कॅपिटलच्या शैक्षणिक कर्जामध्ये विद्यार्थ्यांना कर्ज परतफेडीचे लवचिक पर्याय मिळणार आहेत, त्यामुळे त्यांना आपल्या अभ्यासाच्या काळात परतफेड करणेही सोपे जाईल. कर्जासाठी ऑनलाइन अर्जही करता येईल, ही प्रक्रियाही सहजसुलभ असल्याचे कंपनीने म्हटले आहे.



उच्च शिक्षणाच्या आड येणाऱ्या सामाजिक-आर्थिक अडचणी दूर करण्याचे उद्दिष्ट


या योजनेविषयी माहिती देताना कंपनीचे मुख्य ऑपरेटिंग अधिकारी विवेक चोपडा म्हणाले, विश्वास आणि पारदर्शकता हे नेहमीच आमच्या व्यवसायाचे सर्वांत मजबूत आधारस्तंभ आहेत. पारंपरिक आर्थिक मदतीच्या पलीकडे जाऊन शैक्षणिक कर्जामध्ये ट्युशन फीपासून प्रवास आणि वैद्यकीय खर्चापर्यंतच्या सर्व पैलूंचा समावेश आहे. उच्च शिक्षणाच्या आड येणाऱ्या सामाजिक-आर्थिक अडचणी दूर करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या शैक्षणिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या संधी मिळाव्यात अशी आमची इच्छा आहे.

Comments
Add Comment

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे

पाकिस्तानमधून आरडीएक्सने राम मंदिर उडवण्याचा मेसेज; गुन्हा दाखल

बीड : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्री राम मंदिर उडवण्याचा मेसेज थेट पाकिस्तानातून बीड जिल्ह्यातील एका तरुणाला

इंडिगोच्या विमानात कानशिलात! पॅनिक अटॅक आलेला तरुण बेपत्ता!

मुंबई : मुंबईहून कोलकात्याकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाइटमध्ये एक धक्कादायक घटना घडली. पॅनिक अटॅकचा