Maharashtra NCC : महाराष्ट्राच्या एनसीसीने केली हॅटट्रिक; मिळवला ‘हा’ बहुमान!

Share

नवी दिल्ली : महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स अर्थातच एनसीसीने (NCC) यंदा पुन्हा एकदा महाराष्ट्राची (Maharashtra) मान उंचावली आहे. महाराष्ट्राच्या एनसीसीने देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला आहे. तसेच ‘प्रधानमंत्री बॅनर’ (Prime Minister Banner) हा प्रतिष्ठित पुरस्कार सलग तिसऱ्यांदा पटकावत हॅटट्रिक केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते काल २७ जानेवारी रोजी महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नवी दिल्ली येथील कॅन्टॉनमेंट भागातील करीअप्पा मैदानावर एनसीसी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘प्रधानमंत्री बॅनर’ २०२३-२४ च्या विजेत्या आणि उपविजेत्यासह एनसीसीच्या बेस्ट कॅडेट्सला देखील गौरविण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांच्यासह अनेक मान्यवर येथे उपस्थित होते.

यावेळी १२२ कॅडेटचा सहभाग असलेल्या महाराष्ट्र एनसीसी संचालनालयास पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्र एनसीसीची कॅडेट काजल सातपुते, नचिकेत मेश्राम, खुशी झा, विवेक गांगुर्डे यांच्यासह संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंद्र सिंग यांनी प्रधानमंत्री बॅनर स्विकारले.

देशातील एकूण १७ एनसीसी महासंचालनालयाच्या डिसेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२३ मधील विविध स्तरावरील मुल्यांकन तसेच यावर्षी १ ते २७ जानेवारी दरम्यान दिल्लीत आयोजित प्रजासत्ताक दिन शिबिरातील विविध स्पर्धांतील सर्वोत्तम कामगिरीच्या आधारावर आज ‘प्रधानमंत्री बॅनर’ चा बहुमान विजेत्या व उपविजेत्या संचालनालयास प्रदान करण्यात आला. यावेळी, नागपूरच्या रिमाउंट व वेटेरिनरी स्काड्रन कॅडेटने सर्वोत्कृष्ट टेंट पेगर ट्रॉफी जिंकली.

महाराष्ट्राला सात वर्षानंतर सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बॅनर

महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाला यापूर्वी एकूण १९ वेळा प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान मिळाला आहे. राज्याने मुसंडी घेत मागील दोन वर्षांपासून प्रधानमंत्री बॅनरचा मान पटकाविला होता. यावर्षीही महाराष्ट्राने हा बहुमान मिळविल्याने राज्याने तब्बल आठ वर्षाने सलग तीन वर्षे प्रधानमंत्री बॅनर पटकावत उत्तम कामगिरी केली आहे.

महिनाभर चाललेल्या शिबिरात छात्रसैनिकांनी कवायती, राजपथ संचलन, पंतप्रधानांना मानवंदना, पंतप्रधानांच्या रॅलीचे नियोजन, फ्लॅग एरिया ब्रीफिंग आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. संपूर्ण शिबिरात सर्व स्पर्धांमध्ये तुकडीच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीमुळे एनसीसी महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट संचालनालयाचा मान मिळाला.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

7 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

8 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

8 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

9 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

9 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

10 hours ago