Leopard Attack : अहमदनगरमध्ये बिबट्याचा उच्छाद; दहा दिवसांत दोन चिमुरड्यांचा घेतला जीव

बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची पथके दाखल


अहमदनगर : अहमदनगरच्या (Ahmednagar) लोणी परिसरात एका बिबट्याने (Leopard) दहशत माजवली आहे. मागील दहा दिवसांत या बिबट्याच्या हल्ल्यामुळे दोन चिमुरड्यांचा जीव गेला आहे. बिबट्याच्या या मुक्त संचारामुळे लोणी गावातील अनेक वाड्या आणि वस्त्यांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.


लोणी गावात १५ जानेवारी रोजी १५ वर्षांच्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यानंतर २ दिवसांपूर्वी लोणी जवळीलच सादतपूर येथील एका मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी लोणी गाव आणि परिसरात जवळपास १६ पिंजरे लावण्यात आले आहेत. तसेच नाशिक आणि पुणे येथून आलेल्या रेस्क्यू टीम श्वान पथक आणि ड्रोनच्या माध्यमातून या बिबट्याचा शोध घेत आहेत. राज्यातून दोन पथके सध्या लोणी गावात दाखल झाली आहेत.


या बिबट्याला जेरबंद करण्यात यावे यासाठी वनविभागाची पथकेही दाखल झाली आहेत. त्यामुळे आता हा बिबट्या कधीपर्यंत जेरबंद होणार हाच प्रश्न इथल्या नागरिकांना पडला आहे. तसेच या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण देखील असल्याने लवकरात लवकर हा बिबट्या जेरबंद व्हावा अशी मागणी गावकरी करत आहेत.



महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे हे लोणी गाव


राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचे हे लोणी गाव आहे. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत झालेल्या मुलांच्या कुटुंबियांची भेट महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली. तसेच त्यांचे सांत्वन करत बिबट्याला पकडण्यासाठी विशेष सूचना देखील देण्यात आल्या आहेत.



नगर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये वाढ


नगर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्यामध्ये वाढ होत चालल्याचं चित्र आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यासाठी स्वतंत्र रेस्क्यू टीम तयार करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी देण्यात आलाय. तसेच ही टीम तयार करण्याचा प्रस्ताव पाठवण्याचा आदेश देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. बिबट्याचा संचार असलेल्या भागामध्ये शेतीच्या कामासाठी रात्रीच्या ऐवजी दिवास वीज देता येईल का याविषयी देखील प्रस्ताव महावितरणाकडे पाठवण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.


Comments
Add Comment

Intelligence Bureau : पालघरमध्ये 'इंटेलिजन्स ब्युरो'साठी हक्काची जागा

- महसूल विभागाचा मोठा निर्णय; वसईत कार्यालय आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा मुंबई : पालघर जिल्ह्याच्या

Cyclone Shelter Center in Dapoli : दापोली तालुक्यातील चक्रीवादळ निवारा केंद्रासाठी महसूलकडून विनामूल्य जागा

मुंबई : कोकण किनारपट्टीवरील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला

Onion processing industry: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा प्रक्रिया उद्योगास चालना देणार - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळून स्पर्धात्मक दर मिळावा,

Industries Minister Dr. Uday Samant : पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती - उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केळापूर तालुक्यातील मौजे

Industries Minister Dr. Uday Samant - 'एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित करणार : उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी

Ashok Kharat : 'लक्ष्मण' ते भोंदूबाबा 'अशोक खरात'; ४० वर्षांपूर्वीच गावकऱ्यांनी दिला होता बेदम चोप!

अहिल्यानगर : महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या अशोक खरात याच्या कृत्यांची मुळं चाळीस