मीरा भाईंदरमध्ये मराठ्यांचा गुलाल उधळत जल्लोष

मीरा रोड - मनोज जरांगे पाटील गेल्या अनेक दिवसांपासून मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन करत होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करून शुक्रवारी पहाटे अध्यादेश काढले. यामुळे मराठ्यांच्या लढ्याला मोठं यश मिळाल आहे.

सकल मराठा समाज, मिरा भाईंदर यांनी लढ्याला यश मिळाल्याबद्दल शनिवारी सायंकाळी ढोल ताश्याच्या तालात काशिमीरा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ एकत्र येऊन महाराजांना अभिवादन करत एकमेकांना पेढे वाटत , गुलाल उधळत जल्लोष साजरा केला आहे.

मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी सराटी अंतरवाली येथून पायी चालत नवी मुंबई वाशी येथे पोहोचले. त्यावेळी सरकारने मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलनासाठी येऊ नये अशी विनंती केली. जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करत शनिवारी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी - नवी मुंबई या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थितीत विजयी सभा पार पडली आहे.

एका सामान्य घरातला सुशिक्षित तरुण प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर समाजकारणात-राजकारणात काय किमया घडवू शकतो ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मनोज जरांगे पाटील आहेत असे मराठा समाजच्या वतीने सांगितले जात आहे. याचा आनंद साजरा करण्यासाठी सकल मराठा समाज , मीरा भाईंदर यांनीही काशी मीरा येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.
Comments
Add Comment

Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार! रविवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरींचा अंदाज; २५ जिल्ह्यांना येलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात रविवारचा दिवस पावसाळी ठरण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील २५

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली