Sadavrate On Raj Thackeray: राज ठाकरेंना अटक करा, सदावर्तेंची मागणी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात Adv. गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्यांना अटक करण्याची मागणी केलीय. राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा टोलविरोधात हाक दिली आहे. त्यांनी अवाजवी टोल वसुलीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर राज्यभर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. विशेष म्हणजे पनवेल, वाशी, मुलुंड या टोलनाक्यांवर मनसैनिक ठाण मांडून आहेत.


मनसेच्या कार्यकर्त्यांनी अनेक वाहनांना टोल न भरु देता सोडून दिलं. याच मुद्द्याच्या विरोधात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. राज ठाकरे यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी सदावर्ते मुंबईतल्या शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. टोल नाका जाळण्याची भाषा करणाऱ्या राज ठाकरेंना तातडीने अटक करा अशी लेखी तक्रार त्यांनी केलीय. तसंच मुलुंड टोल नाका जाळल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सदावर्ते यांनी केली आहे.


काय म्हणाले सदावर्ते?


'हिंदू राष्ट्र भारत हमारा' असं मानणारं आमचं संघटन आहे. मराठी, गुजराती, तमिळ, तेलुगू सगळ्यांसाठी महाराष्ट्र-मुंबई एकत्र नांदण्यासाठी आहे. पोलोचे खेळाडू कधीतरी बाहेर येऊन बोलतात.


महाराष्ट्रात अशी हिंसा आणि राज ठाकरेंची दादागिरी चालवून घेणार नाही. डंके की चोट पे सांगत आहोत… काही झालं तर राज ठाकरेच जबाबदार आहेत.


तुम्ही पोलोचे खेळाडू असाल, पाहुणे कलाकारांसारखे येत असाल.. महाराष्ट्राला पाहुण्या कलाकारांची गरज नाही.


Comments
Add Comment

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार

Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरायला फक्त सहा दिवस उरले, शरद पवार राज्यसभा लढवणार की नाही?

मुंबई: येत्या १६ मार्चला राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील

Maharashtra Village: राज्य सरकारकडून सहा ग्रामपंचायतींचा सन्मान केला जाणार; कोकणातील 'हे' गाव पहिल्या क्रमांकावर

मुंबई: गावाचा विकास हाच देशाचा विकास असं म्हटलं जातं. सध्या आपल्या देश लोकल ते ग्लोबल अशा मार्गाने काम करीत आहे.