Board Exams : परिक्षेला वेळ पुरत नाही? चिंता नको, दहावी-बारावीच्या बोर्डाने घेतला 'हा' मोठा निर्णय!

कॉपीमुक्त परिक्षांसाठी भरारी पथकांची संख्याही वाढवणार


मुंबई : दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा (10th and 12th Board Exams) म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावर एक जरी चूक झाली तरी ती बराच काळ सलत राहते. अनेकदा विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला असून व उत्तर येत असूनही लिहायला मात्र वेळ पुरत नाही, त्यामुळे हातचे मार्क गमवावे लागतात. यासाठीच दहावी-बारावीच्या बोर्डाने विद्यार्थ्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. यंदाच्या वर्षापासून परिक्षांसाठी दहा मिनिटे वाढीव वेळ देण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर अर्धा तास आधी उपस्थित राहणे गरजेचे आहे.


अनेक पालक व विद्यार्थ्यांनी पेपर लिहिण्यासाठी वेळ पुरत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. उत्तरे भरमसाठ असल्याने विद्यार्थ्यांना उत्तर येत असूनही लिहिण्यास मात्र वेळ कमी पडत होता. त्यामुळे विद्यार्थी हित लक्षात घेवून व पालक- विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून परीक्षेत विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरसाठी दहा मिनिटे जास्त दिली जाणार आहेत. पण, हा वाढीव वेळ पेपरच्या शेवटी असणार आहे. पेपर सुरू होण्यापूर्वी किमान अर्धा तास विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर हजर राहणे बंधनकारक आहे.


बोर्डाच्या नवीन बदलानुसार यंदा दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी सरमिसळ पद्धत असणार आहे. अनेक शाळांनी आपले विद्यार्थी एकाच परीक्षा केंद्रावर येतील, असा प्रयत्न केला. पण, बोर्डाच्या नवीन नियमानुसार ते शक्य झाले नसल्याने शाळांची चिंता वाढली आहे. परीक्षेवेळी वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे देखील सांगण्याचे प्रकार थांबविण्याच्या दृष्टीने बोर्डाकडून तगडे नियोजन सुरू आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथकांची वाढ केली जाणार असून प्रत्येक केंद्रावर बैठे पथक असेल. त्यांच्या माध्यमातून परीक्षेवेळी होणारे गैरप्रकार थांबविले जाणार आहेत.


इयत्ता बारावीची बोर्डाची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा १ ते २२ मार्च या काळात होणार आहे.

Comments
Add Comment

Anil Ambani : अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; ईडीनंतर सीबीआयकडून कार्यालय आणि निवासस्थानी शोधमोहीम सुरु

केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने म्हणजेच सीबीआयने मेसर्स रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या विरोधात दुसरा गुन्हा नोंदवला

महानगरपालिकेच्या सर्वच कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’चे पूर्ण राष्ट्रीय गीत वाजणार, सभागृहात केला ठराव मंजूर

मुंबई: भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात प्रेरणादायी आणि शक्तीशाली नारा ठरलेल्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय

मुंबई महापालिकेची सर्व परिपत्रके मराठीतूनच काढा; भाजपचे स्वीकृत नगरसेवक प्रविण छेडा यांची सभागृहात मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेचे कामकाज हे शंभर टक्के मराठीतून असतानाही आजही कामगारां विषयांच्या तसेच इतर बाबींची

महापालिका सभागृहात गुंजणार ‘जय जय महाराष्ट्र माझा’; महापालिका सभागृहात एकमताने ठराव मंजूर

मुंबई: महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत असलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताची धून आता

महापालिका शाळांमध्ये वर्षातून दोनदा भरवा विज्ञान प्रदर्शन

मुंबई : विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला वाव देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेले ‘विज्ञान

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या