Manoj Jarange Patil : सैराटमुळे घराघरांत पोहोचलेला अभिनेता आता दिसणार मनोज जरांगेंवरील संघर्षयोद्धा चित्रपटात!

मोहन जोशी, जयवंत वाडकर, सुरभी हांडे... अशी तगडी स्टारकास्ट!


जालना : मराठा समाजासाठी (Maratha Samaj) उपोषण करुन मराठा समाजाला कायमस्वरुपी आरक्षण (Maratha Reservation) मिळवून देण्याच्या ध्यासाने झपाटलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या कारकीर्दीवर आता चित्रपट येणार आहे, हे सर्वश्रुत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगचा मुहूर्तदेखील जालना येथील आंतरवाली सराटी येथे पार पडला. याच ठिकाणी मराठा समाजाच्या संघर्षाची मालिका सुरु झाली व मनोज जरांगेंनी उपोषण केले होते. 'संघर्षयोद्धा' (Sangharsh yoddha)या चित्रपटात रोहन पाटील हा नवोदित अभिनेता मनोज जरांगे यांची भूमिका साकारणार आहे.


संघर्षयोद्धा या चित्रपटाविषयी आता एक विशेष बाब समोर आली आहे. काही वर्षांपूर्वी जगभरात धुमाकूळ घातलेल्या मराठी चित्रपट सैराटमधून (Sairat) घराघरातच पोहोचलेला अभिनेता संघर्षयोद्धा चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटात सल्ल्या म्हणजेच परशाचा जवळचा मित्र ही महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेख (Arbaj Shaikh) संघर्षयोद्धा चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. सोशल मीडियावर चित्रपटाच्या शूटिंग मुहूर्ताच्या वेळचा फोटो शेअर करत त्याने ही माहिती दिली आहे.





अरबाजने या फोटोला कॅप्शन दिलं आहे की, "राज्यभर चर्चेत असणारा चित्रपट संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात मी महत्वाची भूमिका बजावत असून या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका बजावत असणारे रोहन पाटील यांच्या सोबतचा हा शूट लोकेशनचा फोटो." अरबाजने शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.



कोण आहेत कलाकार मंडळी?


गोवर्धन दोलताडे यांनी 'संघर्षयोद्धा' या चित्रपटाची कथा आणि निर्मिती केली आहे. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद सुधीर निकम यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, जयवंत वाडकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या २६ एप्रिल २०२४ रोजी 'संघर्षयोद्धा' हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केलं आहे.

Comments
Add Comment

कार्तिकी एकादशीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे, जाणून घ्या वेळापत्रक

सोलापूर: वारकऱ्यांसाठी कार्तिकी एकादशी महत्त्वाची असते. याच पंढरपूरच्या कार्तिकी

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज, नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त

ठाणे (वार्ताहर) : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा नोव्हेंबरपासून जूनअखेरपर्यंत तब्बल ६८ विवाह

"शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचेपर्यंत आमचा प्रयत्न सुरूच राहील" : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळमुक्तच नाही तर, हरित माणदेशाच्या दिशेने मार्गक्रमण! सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फलटण,

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे