Manoj Jarange Patil : सैराटमुळे घराघरांत पोहोचलेला अभिनेता आता दिसणार मनोज जरांगेंवरील संघर्षयोद्धा चित्रपटात!

मोहन जोशी, जयवंत वाडकर, सुरभी हांडे... अशी तगडी स्टारकास्ट!


जालना : मराठा समाजासाठी (Maratha Samaj) उपोषण करुन मराठा समाजाला कायमस्वरुपी आरक्षण (Maratha Reservation) मिळवून देण्याच्या ध्यासाने झपाटलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या कारकीर्दीवर आता चित्रपट येणार आहे, हे सर्वश्रुत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगचा मुहूर्तदेखील जालना येथील आंतरवाली सराटी येथे पार पडला. याच ठिकाणी मराठा समाजाच्या संघर्षाची मालिका सुरु झाली व मनोज जरांगेंनी उपोषण केले होते. 'संघर्षयोद्धा' (Sangharsh yoddha)या चित्रपटात रोहन पाटील हा नवोदित अभिनेता मनोज जरांगे यांची भूमिका साकारणार आहे.


संघर्षयोद्धा या चित्रपटाविषयी आता एक विशेष बाब समोर आली आहे. काही वर्षांपूर्वी जगभरात धुमाकूळ घातलेल्या मराठी चित्रपट सैराटमधून (Sairat) घराघरातच पोहोचलेला अभिनेता संघर्षयोद्धा चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटात सल्ल्या म्हणजेच परशाचा जवळचा मित्र ही महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेख (Arbaj Shaikh) संघर्षयोद्धा चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. सोशल मीडियावर चित्रपटाच्या शूटिंग मुहूर्ताच्या वेळचा फोटो शेअर करत त्याने ही माहिती दिली आहे.





अरबाजने या फोटोला कॅप्शन दिलं आहे की, "राज्यभर चर्चेत असणारा चित्रपट संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात मी महत्वाची भूमिका बजावत असून या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका बजावत असणारे रोहन पाटील यांच्या सोबतचा हा शूट लोकेशनचा फोटो." अरबाजने शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.



कोण आहेत कलाकार मंडळी?


गोवर्धन दोलताडे यांनी 'संघर्षयोद्धा' या चित्रपटाची कथा आणि निर्मिती केली आहे. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद सुधीर निकम यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, जयवंत वाडकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या २६ एप्रिल २०२४ रोजी 'संघर्षयोद्धा' हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केलं आहे.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा