Ram Lalla Pranpratishtha : पंतप्रधान मोदींच्या हस्ते अयोध्येत रामलल्लाची मूर्ती विराजमान!

हिंदूंची पाचशे वर्षांची प्रतिक्षा संपली!


नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा (Ram Lalla Pran pratishtha) सोहळा पार पडला आणि हिंदूंची (Hindu) गेल्या पाचशे वर्षांची प्रतिक्षा संपली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते विधीवत प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. हा अभूतपूर्व सोहळ्याचे लाखो लोकांकडून थेट प्रक्षेपण पाहण्यात आले. ठिकठिकाणी रामजन्माचा जल्लोष साजरा करण्यात येत आहे.


प्राणप्रतिष्ठेवेळी पंतप्रधान मोदींसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल हे देखील गर्भगृहात उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यात राजकीय नेत्यांसोबतच सामाजिक क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, कला क्षेत्र व आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता.


गणेशपूजनाने या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली. त्यानंतर १२ वाजून २९ मिनिटांनी हा प्राण प्रतिष्ठा विधी संपन्न झाला. ८४ सेकंदाच्या अभिजात सुक्ष्म मुहूर्तावर हा विधी संपन्न झाला. प्राणप्रतिष्ठा संपन्न झाल्यानंतर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अयोध्येतील राम मंदिरावर पुष्पवर्षाव करण्यात आला.


Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च