Ram Lalla Pranpratishtha : पंतप्रधान मोदींच्या हस्ते अयोध्येत रामलल्लाची मूर्ती विराजमान!

हिंदूंची पाचशे वर्षांची प्रतिक्षा संपली!


नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा (Ram Lalla Pran pratishtha) सोहळा पार पडला आणि हिंदूंची (Hindu) गेल्या पाचशे वर्षांची प्रतिक्षा संपली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते विधीवत प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. हा अभूतपूर्व सोहळ्याचे लाखो लोकांकडून थेट प्रक्षेपण पाहण्यात आले. ठिकठिकाणी रामजन्माचा जल्लोष साजरा करण्यात येत आहे.


प्राणप्रतिष्ठेवेळी पंतप्रधान मोदींसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल हे देखील गर्भगृहात उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यात राजकीय नेत्यांसोबतच सामाजिक क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, कला क्षेत्र व आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता.


गणेशपूजनाने या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली. त्यानंतर १२ वाजून २९ मिनिटांनी हा प्राण प्रतिष्ठा विधी संपन्न झाला. ८४ सेकंदाच्या अभिजात सुक्ष्म मुहूर्तावर हा विधी संपन्न झाला. प्राणप्रतिष्ठा संपन्न झाल्यानंतर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अयोध्येतील राम मंदिरावर पुष्पवर्षाव करण्यात आला.


Comments
Add Comment

बिहार विधानसभा निवडणुकील बिगुल आज वाजणार ?

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाची आज (सोमवार ६ ऑक्टोबर २०२५) संध्याकाळी चार वाजता दिल्लीत विज्ञान भवन येथे पत्रकार

मध्य प्रदेशात कफ सिरप प्रकरणात ११ मुलांच्या मृत्यूनंतर डॉक्टरला अटक

मृतांच्या नातेवाइकांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर भोपाळ (वृत्तसंस्था): छिंदवाडा जिल्ह्यातील पारसिया भागात कफ

जयपूर SMS हॉस्पिटलच्या ICU मध्ये भीषण आग, ६ रुग्णांचा मृत्यू

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूर येथील सवाई मानसिंह (SMS) हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरच्या न्यूरो आयसीयू (ICU)

दार्जिलिंगमध्ये भूस्खलनाने हाहाकार; २३ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उत्तर बंगालच्या दौऱ्यावर

दार्जिलिंग: पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या भीषण

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७