मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या (Bharat Jodo Nyay Yatra) विरोधात गुरुवारी आसाम (Assam) पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिलेली नसतानाही यात्रेच्या मार्गात बदल केल्याने पोलिसांनी ही तक्रार दाखल केली आहे. ही यात्रा शहरांच्या मध्यभागातून न काढता त्यासाठी पर्यायी मार्ग वापरा, हट्ट धरण्यात आला तर पोलिसांची फौज देखील तयार असेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता. मात्र त्याचे पालन न झाल्याने या यात्रेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान ही यात्रा आता नागालँडमधून आसाममध्ये पोहचली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने काँग्रेसकडून ही यात्रा देशभरात आयोजित केली आहे. मात्र, आसाममध्ये या यात्रेला चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे इतर राज्यांतही यात्रा आयोजित करताना काँग्रेसच्या अडचणी वाढणार आहेत.
आसाममध्ये यात्रा रवाना होताच राहुल गांधी यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांच्याविरोधात वक्तव्य केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, कदाचित देशातलं सर्वात भ्रष्ट सरकार आणि सगळ्यात भ्रष्ट मुख्यमंत्री या राज्यात आहे. यावर हिमंता बिस्वा सरमा यांनीही तितकेच जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘गांधी कुटुंबच देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब आहे. ही राहुल गांधींची ‘न्याय यात्रा’ नसून ‘मियाँ यात्रा’ आहे. जिथे जिथे मुस्लिम आहेत तिथे ते जातात’, अशी टीका त्यांनी केली. ‘मियां’ हा मूलतः आसाममधील बंगाली भाषिक मुस्लिमांसाठी वापरला जाणारा अपमानास्पद शब्द आहे.
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…