Bharat Jodo Nyay Yatra : भारत जोडो यात्रेच्या मार्गात बदल करणं पडलं महागात; आसाममध्ये तक्रार दाखल!

'गांधी कुटुंबच सर्वात भ्रष्ट' आसामच्या मुख्यमंत्र्यांची टीका


मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'च्या (Bharat Jodo Nyay Yatra) विरोधात गुरुवारी आसाम (Assam) पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिलेली नसतानाही यात्रेच्या मार्गात बदल केल्याने पोलिसांनी ही तक्रार दाखल केली आहे. ही यात्रा शहरांच्या मध्यभागातून न काढता त्यासाठी पर्यायी मार्ग वापरा, हट्ट धरण्यात आला तर पोलिसांची फौज देखील तयार असेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता. मात्र त्याचे पालन न झाल्याने या यात्रेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान ही यात्रा आता नागालँडमधून आसाममध्ये पोहचली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने काँग्रेसकडून ही यात्रा देशभरात आयोजित केली आहे. मात्र, आसाममध्ये या यात्रेला चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे इतर राज्यांतही यात्रा आयोजित करताना काँग्रेसच्या अडचणी वाढणार आहेत.


आसाममध्ये यात्रा रवाना होताच राहुल गांधी यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांच्याविरोधात वक्तव्य केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, कदाचित देशातलं सर्वात भ्रष्ट सरकार आणि सगळ्यात भ्रष्ट मुख्यमंत्री या राज्यात आहे. यावर हिमंता बिस्वा सरमा यांनीही तितकेच जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, 'गांधी कुटुंबच देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब आहे. ही राहुल गांधींची ‘न्याय यात्रा’ नसून ‘मियाँ यात्रा’ आहे. जिथे जिथे मुस्लिम आहेत तिथे ते जातात', अशी टीका त्यांनी केली. 'मियां' हा मूलतः आसाममधील बंगाली भाषिक मुस्लिमांसाठी वापरला जाणारा अपमानास्पद शब्द आहे.

Comments
Add Comment

जम्मू काश्मीरमधील किश्तवाडमध्ये दोन दहशतवादी ठार, दहशतवाद्यांचा तळ केला उद्ध्वस्त

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील किश्तवाडमध्ये चतरू भागात सुरक्षा पथक आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. सुरक्षा

कौतुकास्पद! भारतीय वंशाच्या महिलेची मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या सीईओपदी नियुक्ती

भारतीय वंशाच्या आशा शर्मा यांची मायक्रोसॉफ्टच्या गेमिंग विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून तमिळनाडूमधून सहा आतंकवाद्यांना अटक

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलीस स्पेशल सेलने तमिळनाडूमधून सहा संशयित

Srinagar Accident : सीआरपीएफच्या बंकर वाहनाचा अपघात; सात जवान जखमी

जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाणारे बुलेटप्रूफ बंकर वाहन कालव्यामध्ये

AI Impact Summit 2026 ची सांगता; तब्बल ८८ देश आणि संघटनांनी केली घोषणापत्रावर स्वाक्षरी

नवी दिल्ली : दिल्लीतील भारत मंडपममध्ये आयोजित इंडिया एआय इम्पॅक्ट समिट-२०२६ ची सांगता झाली. यावेळी इंडिया एआय

भारत-ब्राझील द्विपक्षीय व्यापार करारावर शिक्कामोर्तब

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष लुला यांच्यातील चर्चेनंतर ट्रेड डीलवर स्वाक्षरी नवी दिल्ली  : भारत आणि