Badlapur Fire News : बदलापूरच्या केमिकल कंपनीत भीषण आग! एकाचा मृत्यू तर चारजण जखमी

  104

बदलापूर : बदलापूरच्या (Badlapur) खरवई या भागात असलेल्या व्ही. के. केमिकल कंपनीत (Chemical Company) आज भीषण आग (Fire News) लागली. या घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला तर चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरु केले. जे कामगार जखमी अवस्थेत होते त्यांना बाहेर काढून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.


व्ही. के. केमिकल कंपनीत रासायनिक केमिकलवर प्रक्रिया केली जात होती. दरम्यान, आज पहाटे पाचच्या दरम्यान स्फोट झाले. या स्फोटामुळे कंपनी पेटली. हे स्फोट इतके भयंकर होते की चार ते पाच किलोमीटर अंतरावर त्याचे हादरे बसले. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला. इतर चार कामगार गंभीर अवस्थेत जखमी झाले आहेत.


या कंपनीच्या बाहेर दोन टेम्पो उभे होते. या टेम्पो मधील केमिकल मध्ये प्रथम आग लागली. त्यानंतर ही आग कंपनीमध्ये पसरली असं कंपनीतील कामगारांचं म्हणणं आहे. अंबरनाथ आनंद नगर एमआयडीसी मधील अग्निशमन दल ताबडतोब घटनास्थळी दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आले.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या