Vasai Crime News : आधी अपहरण मग हत्या करुन मृतदेह रस्त्यावर फेकून आरोपी फरार!

वसईतील धक्कादायक प्रकार


वसई : गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये (Crime cases) प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. यातील एकेक गुन्हा ऐकून थरकाप उडतो. वसई विभागातून देखील अशीच एक धक्कादायक घटना (Vasai Crime News) समोर आली आहे. अंगावर शहारे आणणार्‍या या घटनेत नऊ ते दहा जणांच्या टोळक्याने २७ वर्षीय मुलाचे अपहरण केले, त्याची हत्या केली आणि नंतर त्याचा मृतदेह रस्त्यावर फेकून आरोपी फरार झाले. काल उघड झालेल्या या घटनेमुळे वसई शहरात एकच खळबळ उडाली आहे.


पूर्ववैमनस्यातून या तरुणाची वसईत हत्या करण्यात आली. दोन रिक्षांमधून आलेल्या ९ ते १० जणांच्या टोळक्याने तरुणाचं अपहरण करुन हत्या केल्याचं उघड झालं आहे. हत्येच्या घटनेनं वसई शहर पुरतं हादरुन गेलं आहे. माणसं जमवून, अपहरण करून, निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपींच्या तपासासाठी पोलीस आयुक्तालयातही गुन्हे शाखेच्या चार आणि पेल्हार पोलीस ठाण्याच्या तीन टीम अशा एकूण सात टीम रवाना झाल्या आहेत.



नेमकं काय घडलं?


सुधीर सिंह (वय २७) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून, हा तरुण कांदिवली येथे राहणारा आहे. ५ वर्षांपूर्वी हा तरुण नालासोपाऱ्यात राहत होता. गुरुवारी सुधीर सिंग हा त्याचा मित्र वैभव मिश्रा याच्यासोबत नालासोपारा पूर्व वालईपाडा उपाध्याय नगर चाळीत रूम बघण्यासाठी आला होता. गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ९ ते १० जणांचं टोळकं दोन रिक्षात भरून आलं. गौराईपाडा पार्किंगच्या मोकळ्या जागेत या टोळक्यानं लाकडी दांडे, धारदार हत्यारानं सर्वात आधी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर जखमी अवस्थेत त्याला रिक्षात घालून, गावराईपाडा नाक्यावर नेऊन फेकून दिलं आणि सर्व आरोपी तिथून फरार झाले.


रात्री साडेबाराच्या सुमारास मयताच्या मित्राने पेल्हार पोलिसांना याची माहिती दिली असता, पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांनी तात्काळ गुन्हे प्रकटीकरण पथकाची टीम पाठवून शोध घेतला असता, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तरुणाचा मृतदेह नालासोपारा पूर्व गावराईपाडा येथे आढळून आला.


दरम्यान, आरोपींनी पूर्ववैमनस्यातून अपहरण करून तरुणाची हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. दोघांची ओळख पटली असून लवकरच आरोपी पकडण्यात येतील, असं आश्वासन पोलिसांच्या वतीने देण्यात आलं आहे.

Comments
Add Comment

राज्यातील बांगलादेशी घुसखोरांना दणका! राज्य सरकारचे मोठे पाऊल, रेशनकार्ड पडताळणीचे आदेश

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढत चालली आहे. याकरता राज्यभरात

‘एमयुएचएस’ च्‍या कुलगुरूपदी डॉ. अजय चंदनवाले

नाशिक : राज्‍य शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची नियुक्‍ती ‘महाराष्‍ट्र

“मोदी मिशन हे पुस्तक पुढच्या पिढीला प्रेरणा देणारं”, 'मोदीज् मिशन' मधील काही भाग पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना

मुंबई :“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘मोदीज् मिशन’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे आणि संग्रहित

मुंबईनजिक बांधणार देशातील सर्वाधिक लांबीची भिंत! पण यामागचे कारण काय?

मुंबई : पालघर जिल्ह्यात बांधले जाणारे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या बंदरात

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

पुण्याच्या NDA मध्ये गूढ! एकाच आठवड्यात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू: नेमकं चाललंय तरी काय?

पुणे : पुण्यातील खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (NDA) पोहण्याचा सराव करत