Unseasonal rain : अवकाळी पावसाने आणली शेतक-यांवर संक्रांत

कांदा, हरभरा पीकावर परिणाम तर गव्हाचे पीक झाले आडवे


संतोष टेमक


शनिशिंगणापुर : ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) कांदा, हरभरा व गहु पिकांना चांगलाच फटका बसला आहे. गेल्या आठवडाभरापासुन ढगाळ वातावरणामुळे पिकांवर मावा, तुडतुडे, करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने बळीराजा चिंतेत पडला आहे.


अतिवृष्टी, गारपीट व अवेळी आलेल्या पावसामुळे शेतीचे तंत्र बिघडत असल्यामुळे एकप्रकारे शेतक-यांवर संक्रांत आल्याने शेतक-यांमध्ये नैराश्य दिसून येत आहे. एकीकडे खते, बियाणे, औषधे, मशागतीचे वाढलेले दर आणि दुसरीकडे शेतमालांचे पडलेले दर यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.


नेवासा तालुक्यातील नेवासा, करजगाव, पानेगाव, सोनई, खरवंडी, हिंगोणी, भेंडा, कुकाणा, चांदा, वडाळा आदी परिसरात वा-यासह अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.


"मोठ्या जिकरीने व पोटच्या मुलाप्रमाणे वाढवलेला गहु अवकाळीने पुर्णपणे झोपला आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. पीक विमाही काढलेला असुन पंचनामा करून पुर्ण भरपाई द्यावी." - शरद सोनवणे, शेतकरी, हिंगोणी

Comments
Add Comment

मंत्री छगन भुजबळ उद्या नाशिकमध्ये सोबत घेऊन येणार स्व.अजितदादा पवार यांचा अस्थिकलश

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या येवला आणि नाशिकमध्ये सर्व पक्षीय शोक सभेचे आयोजन शोकसभेवेळी

Pune Police Bharti : पुणेकरांसाठी मोठी बातमी! अखेर पोलीस भरतीचे बिगुल वाजले; 'या' तारखेपासून चाचणीला सुरुवात

पुणे : पुणे शहराच्या सीमांचा विस्तार आणि झपाट्याने वाढणारी लोकसंख्या पाहता, पुणे पोलीस दलावर पडणारा ताण कमी

Jayant Patil : अजित दादांची 'ती' इच्छा अधुरीच...राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत जयंत पाटलांचा मोठा खुलासा!

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी

Amravati News : आयआरबीची मलमपट्टी, प्रवाशांच्या जिवाशी खेळ! नांदगाव पेठमध्ये भरवस्तीत उड्डाण पुलाचे काँक्रिट कोसळले

अमरावती : राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव पेठ येथे आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या (IRB) निकृष्ट कामाचा नमुना

Sunetra Pawar : मी सुनेत्रा अजित पवार...उद्या राज्याला मिळणार पहिली महिला उपमुख्यमंत्री ?

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील आकस्मिक निधनामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात मोठी

Sunil Tatkare : सुनेत्रा पवार आणि मुलांशी चर्चा करूनच उपमुख्यमंत्रिपदावर होणार शिक्कामोर्तब; सुनील तटकरेंनी दिले स्पष्ट संकेत

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये