Unseasonal rain : अवकाळी पावसाने आणली शेतक-यांवर संक्रांत

Share

कांदा, हरभरा पीकावर परिणाम तर गव्हाचे पीक झाले आडवे

संतोष टेमक

शनिशिंगणापुर : ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) कांदा, हरभरा व गहु पिकांना चांगलाच फटका बसला आहे. गेल्या आठवडाभरापासुन ढगाळ वातावरणामुळे पिकांवर मावा, तुडतुडे, करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने बळीराजा चिंतेत पडला आहे.

अतिवृष्टी, गारपीट व अवेळी आलेल्या पावसामुळे शेतीचे तंत्र बिघडत असल्यामुळे एकप्रकारे शेतक-यांवर संक्रांत आल्याने शेतक-यांमध्ये नैराश्य दिसून येत आहे. एकीकडे खते, बियाणे, औषधे, मशागतीचे वाढलेले दर आणि दुसरीकडे शेतमालांचे पडलेले दर यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

नेवासा तालुक्यातील नेवासा, करजगाव, पानेगाव, सोनई, खरवंडी, हिंगोणी, भेंडा, कुकाणा, चांदा, वडाळा आदी परिसरात वा-यासह अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

“मोठ्या जिकरीने व पोटच्या मुलाप्रमाणे वाढवलेला गहु अवकाळीने पुर्णपणे झोपला आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. पीक विमाही काढलेला असुन पंचनामा करून पुर्ण भरपाई द्यावी.” – शरद सोनवणे, शेतकरी, हिंगोणी

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

3 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

3 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

4 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

5 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

5 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

5 hours ago